शहरं
Join us  
Trending Stories
1
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
2
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
3
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
4
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
5
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
6
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
7
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
8
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
9
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
10
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
11
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
12
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
13
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
14
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
15
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
16
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
17
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
18
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
19
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
20
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
Daily Top 2Weekly Top 5

जळी, स्थळी वर्षानुवर्षे हातबॉम्ब राहतात जिवंत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:37 IST

कऱ्हाड : कोयना नदीपात्रात आढळलेले बॉम्ब साठ वर्षांपूर्वी बनविलेले असल्याचे समजताच अनेकांच्या भुवया उंचावल्या. एवढ्या वर्षांपूर्वीचे बॉम्ब पाण्यात राहुनही ...

कऱ्हाड : कोयना नदीपात्रात आढळलेले बॉम्ब साठ वर्षांपूर्वी बनविलेले असल्याचे समजताच अनेकांच्या भुवया उंचावल्या. एवढ्या वर्षांपूर्वीचे बॉम्ब पाण्यात राहुनही जिवंत कसे, असा प्रश्नच अनेकांना पडला. मात्र, हातबॉम्ब वर्षानुवर्षे कोणत्याही परिस्थितीत ‘अ‍ॅक्टिव्ह’ राहू शकतात, असा खुलासा पोलिसांनी केला आहे. आता तांबवेत आढळलेल्या ‘त्या’ बॉम्बचा साठ वर्षांतील प्रवास शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

प्लास्टिक वगळता पृथ्वीवर कायमस्वरूपी काही टिकत नाही, असं म्हणतात. कोणतीही वस्तू विशिष्ट कालावधीनंतर पूर्णपणे नष्ट होते. किमान वस्तूच्या निष्क्रियतेला तरी हमखास सुरुवात होत असते. मात्र, बॉम्ब सहजासहजी आणि हलक्यात नष्ट होत नसतात, असे बॉम्बशोधक आणि नाशक पथकात काम केलेले निवृत्त पोलीस उपअधीक्षक संभाजी पाटील यांच म्हणणे आहे. बॉम्बसाठी वापरण्यात येणारा धातू विशिष्ट प्रकारचा असतो. त्याला वर्षानुवर्षे पाण्यात ठेवले तरी लवकर गंज चढत नाही. तसेच उच्च तापमानाशिवाय तो वितळतही नाही; पण गंज चढून अथवा वितळल्यानंतरही त्यातील दारूगोळा पेट घेतोच. त्यामुळे हलकासा का होईना, त्याचा स्फोट होतोच होतो, असे संभाजी पाटील यांनी सांगितले.

तांबवेत नदीपात्रामध्ये आढळलेले बॉम्ब किती दिवस पाण्यात राहिले, हे सांगता येत नाही. मात्र, ते खड्ड्यात पुरून स्फोट करूनच नष्ट करावे लागले. कोणताही हातबॉम्ब अशाच पद्धतीने नष्ट करावा लागतो, असेही निवृत्त पोलीस उपअधीक्षक संभाजी पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.

- कोट

सैन्यदलात वापरल्या जाणाऱ्या हँडग्रेनेडमध्ये ‘हाय एक्स्प्लोझिव्ह’ असते. ‘फायरिंग पिन’ काढल्याशिवाय त्याचा स्फोट होत नाही. ते नष्ट करण्यासाठीही स्फोट हा एकच पर्याय असतो. कित्येक वर्ष हे बॉम्ब ‘अ‍ॅक्टिव्ह’ राहू शकतात. वातावरणाचा त्यांवर कसलाही परिणाम होत नाही.

- संभाजी पाटील

निवृत्त पोलीस उपअधीक्षक

- चौकट

कसे होते ‘ते’ बॉम्ब..?

तांबवेत तीन हातबॉम्ब आढळले होते. या तिन्ही बॉम्बचा आकार अंडाकृती होता. लाल, हिरवा रंग आणि आयताकृती खाचा होत्या. तिन्ही बॉम्ब लोखंडी होते. तसेच त्यावर एक क्रमांकही लिहिलेला होता. हा क्रमांक पोलिसांच्या तपासाला दिशा देणारा ठरला आहे.

- चौकट

हादरवून टाकणारा स्फोट

बॉम्बशोधक आणि नाशक पथकाने तांबवेत आढळलेले तिन्ही बॉम्ब खड्ड्यात पुरून फोडले. त्यावेळी त्यांचा मोठा स्फोट होऊन हादरवून टाकणारा आवाज झाला होता. साठ वर्षांनंतरही ते बॉम्ब पूर्णपणे ‘अ‍ॅक्टिव्ह’ होते, हे त्यावरून दिसून येते.

- चौकट

कोठून आले ते शोधलं, आता कोणी आणले, याचा तपास !

तांबवेत आढळलेले बॉम्ब भारतीय संरक्षण विभागाच्या खडकी-पुणे येथील आयुध निर्माण फॅक्टरीमध्ये १९६१ साली बनविले गेले आहेत. त्यांचा सैन्यदलाला पुरवठा झाला असल्याची माहितीही पोलीस तपासातून समोर आली आहे. आता सैन्यदलातील ते बॉम्ब तांबवेच्या कोयना नदीपात्रापर्यंत कोणी आणले, याचा शोध पोलिसांना घ्यावा लागणार आहे.

फोटो : २३केआरडी०१

कॅप्शन : तांबवेत आढळलेले बॉम्ब.