शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
3
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
4
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
5
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
6
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
7
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
8
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
9
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
10
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
11
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
12
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
13
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
14
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
15
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
16
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
17
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
18
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
19
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
20
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल

जळी, स्थळी वर्षानुवर्षे हातबॉम्ब राहतात जिवंत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:37 IST

कऱ्हाड : कोयना नदीपात्रात आढळलेले बॉम्ब साठ वर्षांपूर्वी बनविलेले असल्याचे समजताच अनेकांच्या भुवया उंचावल्या. एवढ्या वर्षांपूर्वीचे बॉम्ब पाण्यात राहुनही ...

कऱ्हाड : कोयना नदीपात्रात आढळलेले बॉम्ब साठ वर्षांपूर्वी बनविलेले असल्याचे समजताच अनेकांच्या भुवया उंचावल्या. एवढ्या वर्षांपूर्वीचे बॉम्ब पाण्यात राहुनही जिवंत कसे, असा प्रश्नच अनेकांना पडला. मात्र, हातबॉम्ब वर्षानुवर्षे कोणत्याही परिस्थितीत ‘अ‍ॅक्टिव्ह’ राहू शकतात, असा खुलासा पोलिसांनी केला आहे. आता तांबवेत आढळलेल्या ‘त्या’ बॉम्बचा साठ वर्षांतील प्रवास शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

प्लास्टिक वगळता पृथ्वीवर कायमस्वरूपी काही टिकत नाही, असं म्हणतात. कोणतीही वस्तू विशिष्ट कालावधीनंतर पूर्णपणे नष्ट होते. किमान वस्तूच्या निष्क्रियतेला तरी हमखास सुरुवात होत असते. मात्र, बॉम्ब सहजासहजी आणि हलक्यात नष्ट होत नसतात, असे बॉम्बशोधक आणि नाशक पथकात काम केलेले निवृत्त पोलीस उपअधीक्षक संभाजी पाटील यांच म्हणणे आहे. बॉम्बसाठी वापरण्यात येणारा धातू विशिष्ट प्रकारचा असतो. त्याला वर्षानुवर्षे पाण्यात ठेवले तरी लवकर गंज चढत नाही. तसेच उच्च तापमानाशिवाय तो वितळतही नाही; पण गंज चढून अथवा वितळल्यानंतरही त्यातील दारूगोळा पेट घेतोच. त्यामुळे हलकासा का होईना, त्याचा स्फोट होतोच होतो, असे संभाजी पाटील यांनी सांगितले.

तांबवेत नदीपात्रामध्ये आढळलेले बॉम्ब किती दिवस पाण्यात राहिले, हे सांगता येत नाही. मात्र, ते खड्ड्यात पुरून स्फोट करूनच नष्ट करावे लागले. कोणताही हातबॉम्ब अशाच पद्धतीने नष्ट करावा लागतो, असेही निवृत्त पोलीस उपअधीक्षक संभाजी पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.

- कोट

सैन्यदलात वापरल्या जाणाऱ्या हँडग्रेनेडमध्ये ‘हाय एक्स्प्लोझिव्ह’ असते. ‘फायरिंग पिन’ काढल्याशिवाय त्याचा स्फोट होत नाही. ते नष्ट करण्यासाठीही स्फोट हा एकच पर्याय असतो. कित्येक वर्ष हे बॉम्ब ‘अ‍ॅक्टिव्ह’ राहू शकतात. वातावरणाचा त्यांवर कसलाही परिणाम होत नाही.

- संभाजी पाटील

निवृत्त पोलीस उपअधीक्षक

- चौकट

कसे होते ‘ते’ बॉम्ब..?

तांबवेत तीन हातबॉम्ब आढळले होते. या तिन्ही बॉम्बचा आकार अंडाकृती होता. लाल, हिरवा रंग आणि आयताकृती खाचा होत्या. तिन्ही बॉम्ब लोखंडी होते. तसेच त्यावर एक क्रमांकही लिहिलेला होता. हा क्रमांक पोलिसांच्या तपासाला दिशा देणारा ठरला आहे.

- चौकट

हादरवून टाकणारा स्फोट

बॉम्बशोधक आणि नाशक पथकाने तांबवेत आढळलेले तिन्ही बॉम्ब खड्ड्यात पुरून फोडले. त्यावेळी त्यांचा मोठा स्फोट होऊन हादरवून टाकणारा आवाज झाला होता. साठ वर्षांनंतरही ते बॉम्ब पूर्णपणे ‘अ‍ॅक्टिव्ह’ होते, हे त्यावरून दिसून येते.

- चौकट

कोठून आले ते शोधलं, आता कोणी आणले, याचा तपास !

तांबवेत आढळलेले बॉम्ब भारतीय संरक्षण विभागाच्या खडकी-पुणे येथील आयुध निर्माण फॅक्टरीमध्ये १९६१ साली बनविले गेले आहेत. त्यांचा सैन्यदलाला पुरवठा झाला असल्याची माहितीही पोलीस तपासातून समोर आली आहे. आता सैन्यदलातील ते बॉम्ब तांबवेच्या कोयना नदीपात्रापर्यंत कोणी आणले, याचा शोध पोलिसांना घ्यावा लागणार आहे.

फोटो : २३केआरडी०१

कॅप्शन : तांबवेत आढळलेले बॉम्ब.