शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

बाजारपेठेचा अभ्यास करून व्यवसाय उभारावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:15 IST

रहिमतपूर : ‘व्यवसाय करून मिळणाऱ्या पैशापेक्षा बँकेत एफडी करून जास्त पैसे मिळत असतील तर तो व्यवसाय काय कामाचा? व्यवसाय ...

रहिमतपूर : ‘व्यवसाय करून मिळणाऱ्या पैशापेक्षा बँकेत एफडी करून जास्त पैसे मिळत असतील तर तो व्यवसाय काय कामाचा? व्यवसाय करायचाच असेल तर बाजारपेठेचा परिपूर्ण अभ्यास करून शेतकऱ्यांनी व्यवसाय सुरू करावा,’ असे प्रतिपादन राज्याचे कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी केले.

कोरेगाव तालुक्यातील पिंपरी येथील क्रांतिसिंह नाना पाटील शेतकरी विकास समिती संचलित सातारा ॲॅग्रीकल्चर फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या विविध उपक्रमांना धीरज कुमार यांनी भेट दिली. यावेळी ते बोलत होते. यावेळी विभागीय कृषी सहसंचालक दशरथ तांबाळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जिल्हा कृषी अधीक्षक गुरुदत्त काळे, तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब शेळके, प्रकल्प संचालक अशोक देसाई, कृषी पर्यवेक्षक अर्जुन भोसले, शंकर कणसे, आप्पासाहेब पवार, अंकुश पवार, विनायक जाधव उपस्थित होते.

बचत गटाच्या माध्यमातून उभारण्यात आलेला गांडूळ खत प्रकल्प, रोपवाटिका प्रकल्प, कृषी सेवा केंद्र, कृषी गटाच्या अद्ययावत केलेल्या रेकॉर्डची पाहणी व प्रस्तावित असलेल्या सुमारे नऊ कोटी रुपये किमतीच्या सेंद्रिय गूळ पावडर प्रकल्पाची माहिती शंकर कणसे यांच्याकडून धीरज कुमार यांनी घेतली.

धीरज कुमार म्हणाले, ‘लोकांना एकत्रित करून बचत गटाच्या माध्यमातून विविध प्रकल्प उभारत असताना कृषी विभागाशी विश्वासार्हता निर्माण करणे गरजेचे आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनीही गरजेच्या वेळी बांधावर जाऊन काम करण्याची तयारी ठेवावी. विकेल ते टिकेल, प्रोसेसिंग प्रक्रिया उद्योग, शेतकऱ्यांना थेट ग्राहकासोबत जोडण्यावर आमचा कल आहे. नवीन मूल्य साखळी कशी निर्माण करायची, शेतीमालाची किंमत कशी वाढवायची व मधले टप्पे कमी करून थेट शेतीमाल लोकांच्यापर्यंत कसा पोहोचवायचा यासाठी कृषी विभाग प्रयत्न करत आहे.बचत गट व गटशेतीच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या प्रकल्पाला पुरेसा निधी उपलब्ध करून दिला जात आहे. शेतकऱ्यांच्या कुठल्याही प्रकल्पाला निधीची कमतरता जाणवणार नाही.’

फोटो : ०५पिंपरी

पिंपरी, ता. कोरेगाव येथील शेतीपूरक विविध उपक्रमांची माहिती शंकर कणसे यांच्याकडून धीरज कुमार यांनी घेतली. (छाया : जयदीप जाधव)