शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
3
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
4
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
5
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
6
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
7
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
8
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
9
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
10
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
11
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
12
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
13
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
14
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
15
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
16
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
17
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
18
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
19
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
20
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले

बाजारपेठेचा अभ्यास करून व्यवसाय उभारावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:15 IST

रहिमतपूर : ‘व्यवसाय करून मिळणाऱ्या पैशापेक्षा बँकेत एफडी करून जास्त पैसे मिळत असतील तर तो व्यवसाय काय कामाचा? व्यवसाय ...

रहिमतपूर : ‘व्यवसाय करून मिळणाऱ्या पैशापेक्षा बँकेत एफडी करून जास्त पैसे मिळत असतील तर तो व्यवसाय काय कामाचा? व्यवसाय करायचाच असेल तर बाजारपेठेचा परिपूर्ण अभ्यास करून शेतकऱ्यांनी व्यवसाय सुरू करावा,’ असे प्रतिपादन राज्याचे कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी केले.

कोरेगाव तालुक्यातील पिंपरी येथील क्रांतिसिंह नाना पाटील शेतकरी विकास समिती संचलित सातारा ॲॅग्रीकल्चर फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या विविध उपक्रमांना धीरज कुमार यांनी भेट दिली. यावेळी ते बोलत होते. यावेळी विभागीय कृषी सहसंचालक दशरथ तांबाळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जिल्हा कृषी अधीक्षक गुरुदत्त काळे, तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब शेळके, प्रकल्प संचालक अशोक देसाई, कृषी पर्यवेक्षक अर्जुन भोसले, शंकर कणसे, आप्पासाहेब पवार, अंकुश पवार, विनायक जाधव उपस्थित होते.

बचत गटाच्या माध्यमातून उभारण्यात आलेला गांडूळ खत प्रकल्प, रोपवाटिका प्रकल्प, कृषी सेवा केंद्र, कृषी गटाच्या अद्ययावत केलेल्या रेकॉर्डची पाहणी व प्रस्तावित असलेल्या सुमारे नऊ कोटी रुपये किमतीच्या सेंद्रिय गूळ पावडर प्रकल्पाची माहिती शंकर कणसे यांच्याकडून धीरज कुमार यांनी घेतली.

धीरज कुमार म्हणाले, ‘लोकांना एकत्रित करून बचत गटाच्या माध्यमातून विविध प्रकल्प उभारत असताना कृषी विभागाशी विश्वासार्हता निर्माण करणे गरजेचे आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनीही गरजेच्या वेळी बांधावर जाऊन काम करण्याची तयारी ठेवावी. विकेल ते टिकेल, प्रोसेसिंग प्रक्रिया उद्योग, शेतकऱ्यांना थेट ग्राहकासोबत जोडण्यावर आमचा कल आहे. नवीन मूल्य साखळी कशी निर्माण करायची, शेतीमालाची किंमत कशी वाढवायची व मधले टप्पे कमी करून थेट शेतीमाल लोकांच्यापर्यंत कसा पोहोचवायचा यासाठी कृषी विभाग प्रयत्न करत आहे.बचत गट व गटशेतीच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या प्रकल्पाला पुरेसा निधी उपलब्ध करून दिला जात आहे. शेतकऱ्यांच्या कुठल्याही प्रकल्पाला निधीची कमतरता जाणवणार नाही.’

फोटो : ०५पिंपरी

पिंपरी, ता. कोरेगाव येथील शेतीपूरक विविध उपक्रमांची माहिती शंकर कणसे यांच्याकडून धीरज कुमार यांनी घेतली. (छाया : जयदीप जाधव)