शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
3
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
5
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
8
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
9
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
10
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
11
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
12
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
13
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
14
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
15
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
16
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
17
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
18
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
19
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

बाजारपेठेचा अभ्यास करून व्यवसाय उभारावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:15 IST

रहिमतपूर : ‘व्यवसाय करून मिळणाऱ्या पैशापेक्षा बँकेत एफडी करून जास्त पैसे मिळत असतील तर तो व्यवसाय काय कामाचा? व्यवसाय ...

रहिमतपूर : ‘व्यवसाय करून मिळणाऱ्या पैशापेक्षा बँकेत एफडी करून जास्त पैसे मिळत असतील तर तो व्यवसाय काय कामाचा? व्यवसाय करायचाच असेल तर बाजारपेठेचा परिपूर्ण अभ्यास करून शेतकऱ्यांनी व्यवसाय सुरू करावा,’ असे प्रतिपादन राज्याचे कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी केले.

कोरेगाव तालुक्यातील पिंपरी येथील क्रांतिसिंह नाना पाटील शेतकरी विकास समिती संचलित सातारा ॲॅग्रीकल्चर फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या विविध उपक्रमांना धीरज कुमार यांनी भेट दिली. यावेळी ते बोलत होते. यावेळी विभागीय कृषी सहसंचालक दशरथ तांबाळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जिल्हा कृषी अधीक्षक गुरुदत्त काळे, तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब शेळके, प्रकल्प संचालक अशोक देसाई, कृषी पर्यवेक्षक अर्जुन भोसले, शंकर कणसे, आप्पासाहेब पवार, अंकुश पवार, विनायक जाधव उपस्थित होते.

बचत गटाच्या माध्यमातून उभारण्यात आलेला गांडूळ खत प्रकल्प, रोपवाटिका प्रकल्प, कृषी सेवा केंद्र, कृषी गटाच्या अद्ययावत केलेल्या रेकॉर्डची पाहणी व प्रस्तावित असलेल्या सुमारे नऊ कोटी रुपये किमतीच्या सेंद्रिय गूळ पावडर प्रकल्पाची माहिती शंकर कणसे यांच्याकडून धीरज कुमार यांनी घेतली.

धीरज कुमार म्हणाले, ‘लोकांना एकत्रित करून बचत गटाच्या माध्यमातून विविध प्रकल्प उभारत असताना कृषी विभागाशी विश्वासार्हता निर्माण करणे गरजेचे आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनीही गरजेच्या वेळी बांधावर जाऊन काम करण्याची तयारी ठेवावी. विकेल ते टिकेल, प्रोसेसिंग प्रक्रिया उद्योग, शेतकऱ्यांना थेट ग्राहकासोबत जोडण्यावर आमचा कल आहे. नवीन मूल्य साखळी कशी निर्माण करायची, शेतीमालाची किंमत कशी वाढवायची व मधले टप्पे कमी करून थेट शेतीमाल लोकांच्यापर्यंत कसा पोहोचवायचा यासाठी कृषी विभाग प्रयत्न करत आहे.बचत गट व गटशेतीच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या प्रकल्पाला पुरेसा निधी उपलब्ध करून दिला जात आहे. शेतकऱ्यांच्या कुठल्याही प्रकल्पाला निधीची कमतरता जाणवणार नाही.’

फोटो : ०५पिंपरी

पिंपरी, ता. कोरेगाव येथील शेतीपूरक विविध उपक्रमांची माहिती शंकर कणसे यांच्याकडून धीरज कुमार यांनी घेतली. (छाया : जयदीप जाधव)