शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

गुदगे वाड्यात ‘भाऊबंदकी’!

By admin | Updated: May 25, 2016 00:32 IST

मायणी अर्बन निवडणूक : सचिन गुदगे यांचा राजकीय उदय; जोरदार उलथापालथ होण्याची शक्यता

संदीप कुंभार -- मायणी -खटाव तालुक्याची अर्थवाहिनी समजल्या जाणाऱ्या दि मायणी अर्बन बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथील गुदगे वाड्यातील दोन सख्ख्या भावांचा संघर्ष चव्हाट्यावर आला आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने सचिन गुदगे यांच्या सक्रिय राजकारणाचा उदय होत असल्याने ही निवडणूक खटाव-माण तालुक्यांच्या राजकारणाला नवी दिशा देणारी ठरणार आहे.खटाव तालुक्याच्या राजकारणामध्ये गुदगे वाड्याचे मोठे महत्त्व आहे. दिवंगत भाऊसाहेब गुदगे यांनी १९८५ पासून सलग वीस वर्षे तालुक्याचे प्रतिनिधीत्व केले. याच दरम्यान त्यांचे मोठे सुपुत्र सुरेंद्र गुदगे यांच्या सक्रिय राजकारणात प्रवेश झाला होता. १९९२ मध्ये त्यांनी प्रथम पंचायत समितीच्या सदस्य पदापासून सुरुवात केली होती. तेव्हापासून ते आजपर्यंत ते खटाव तालुक्याच्या राजकारणात सक्रिय आहेत.मागील १५ वर्षांपूर्वी त्यांनी मायणी अर्बन बँकेची सूत्रे आपल्या हातात घेतली व को-आपरेटीव्ह क्षेत्रातील नामांकणाच्या यादीमध्ये बँकेची घोडदौड कायम ठेवली.२००७ मध्ये मायणी जिल्हा परिषद गट स्वत:च्या ताकदीवर निवडून आपला व आजपर्यंत स्वत:कडेच ठेवण्यात ते यशस्वी झालेआहेत. दरम्यानच्या काळामध्ये गुदगे वाड्यामध्ये बरिचशी राजकीय उलथापालथ घडली, परंतु ती बाहेर येत नसल्यामुळे दोघा बंधूंमध्ये नेमका कोणत्या घटनांवरून संघर्ष निर्माण झाला आहे. हे कळू शकत नव्हते; पण आज सुरेंद्र गुदगे व सचिन गुदगे यांनी स्वतंत्रपणे आपली भूमिका स्पष्ट केली. सुरेंद्र गुदगे यांनी मायणी येथे कार्यकर्त्यांच्या बैठकीत बँक चांगल्या स्थितीमध्ये असल्याने आज अनेकांचा बँकेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलल्याचे सांगितले.‘मी बँकेचा अध्यक्ष झाल्यानंतर प्रथम बँकेत १७ टक्के एनपीएमध्ये असणारी बँक आज पाचच्या आसपास आणलेली आहे. मायणी व वडूज येथे बँकेची स्वमालकीची इमारत उभी करून बँकेची स्थावर मालमत्ता ही वाढवून सभासदांना दहा टक्के लाभांश दिला आहे. बँक सुस्थितीत असल्यामुळे विरोधक बँक घेण्याचा प्रयत्न करत आहे.’-सुरेंद्र गुदगेमायणी अर्बन बँक अध्यक्ष व काही निवडक कार्यकर्त्यांच्या हातातील बाहुले बनलेली आहे. म्हणून मी आज या निवडणुकीमध्ये सक्रिय सहभाग घेतलेला आहे व ही निवडणूक मी माझ्या आई यांच्या मार्गदर्शनाखाली लढवित आहे. आज बँकेच्या १०० कोटींच्यावर ठेवी हव्या होत्या; पण अध्यक्षांच्या हुकुमशाहीमुळे ठेवी वाढल्या नाहीत.- सचिन गुदगे खटाव-माणचे राजकारण ढवळणारमायणी अर्बन निवडणूक सचिन गुदगे यांच्या सक्रिय राजकारणाची सुरुवात करून देणारी ठरत आहे. तसेच या निवडणुकीनंतर खटाव, माणच्या राजकारणावरही याचा परिणाम होणार असल्याने या निवडणुकीकडे या दोन्ही तालुक्यांसह जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेले आहे.