शहरं
Join us  
Trending Stories
1
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
2
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
3
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
4
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
5
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
6
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
7
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
8
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
9
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
10
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
11
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
12
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
13
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
14
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
15
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
16
'अमेरिका रशियन तेल खरेदीची परवानगी देतो; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
17
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
18
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
19
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
20
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?

येरळा नदीवरील पुलाची पुन्हा मलमपट्टी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:40 IST

मायणी : मायणी-निमसोड मार्गावरील मोराळे गावाजवळ असलेल्या येरळा नदीवरील पुलाच्या दुरुस्तीच्या नावाखाली पुन्हा मलमपट्टी सुरू असून, मलमपट्टीऐवजी या पुलाची ...

मायणी : मायणी-निमसोड मार्गावरील मोराळे गावाजवळ असलेल्या येरळा नदीवरील पुलाच्या दुरुस्तीच्या नावाखाली पुन्हा मलमपट्टी सुरू असून, मलमपट्टीऐवजी या पुलाची उंची वाढवून पाणी योग्य पद्धतीने निचरा होण्याची गरज निर्माण आहे.

मायणी-निमसोड मार्गावरील मोराळे गावाच्या हद्दीमध्ये असलेल्या येरळा नदी पात्रातील पुलाची उंची अतिशय कमी आहे. तसेच या पुलावरून नदी पात्राच्या दोन्ही बाजूस जाणाऱ्या पाण्याच्या प्रवाहालाही योग्य पद्धतीचा निचरा होत नाही. त्यामुळे प्रत्येक वर्षी येरळा धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर धरणाच्या सांडव्यावरून पडणाऱ्या पाण्याचा प्रवाह वाढला की या नदीपात्रातील हा मोराळे पूल किती दिवस पाण्याखाली असतो.

अनेक दिवस पूल पाण्याखाली राहिल्यामुळे व येरळा धरणातून येणाऱ्या पाण्याच्या मोठ्या प्रवाहामुळे प्रत्येक वर्षी या पुलाला धोका निर्माण होतो तसेच या पुलाचा काही भाग खचत असतो किंवा वाहून जात असतो. सप्टेंबर, ऑक्टोबर २०१९ मध्ये झालेल्या अवकाळी पावसामध्ये या पुलावरून महिनाभर पाणी वाहत होते. या वाहणाऱ्या पाण्यामुळे पुलाचा बराचस भाग वाहून गेला होता. त्यावेळीही संबंधित विभागाकडून या पुलाची डागडुजी व मलमपट्टी करण्यात आली होती.

गतवर्षी जुलै-ऑगस्टमध्ये या परिसरामध्ये समाधानकारक पाऊस झाल्याने येरळा धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर धरणाच्या सांडव्यावरून पाण्याचा प्रवाह येरळा नदी पात्रात येऊ लागल्याने या नदीपात्रात असलेला मोराळे पूल पुन्हा एक महिन्याहून अधिक काळ पाण्याखाली होता अधिक काळ पाणी पुलावरून वाहत असल्याने मुलाचा २०१९ मध्ये डागडुजी केलेला भाग वाहून गेला तर नव्याने या पुलाची भिंतही खचते त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक झाला होता.

पुलावरील पाण्याचा प्रवाह कमी झाल्यानंतर संबंधित विभागाने या पुलाचे थोडीफार डागडुजी केली. मात्र अनेक दिवस पुलावरून पाणी वाहत असल्याने याचा बराचसा भाग खचल्यासारखा झाला होता या खचलेल्या भागाची दुरुस्ती संबंधित विभागाने पुन्हा सुरू केली आहे. मात्र या पुलाची प्रत्येकवर्षी मलमपट्टी न करता या पुलाची उंची वाढवून गरजेचे आहे तसेच येरळ धरणातून येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाला योग्य वाट देणे गरजेचे आहे. त्यासाठी उत्तर-दक्षिण पाणी पुलाखालून कशा पद्धतीने व योग्य प्रमाणात

जाईल यासाठी पुरेशी व्यवस्था करणे गरजेचे आहे.

(चौकट)

प्रवाशांची मोठी अडचण...

सलग दोन वर्षे येरळा धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. त्यामुळे दोन वर्षांत सुमारे तीन महिन्यांहून अधिक काळ हा पूल पाण्याखाली होता. त्यामुळे मायणी-निमसोड, औंध, सातारा मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी अडचण झाली होती. त्यामुळे या पुलाची उंची वाढवणे गरजेचे आहे.

०३ मायणी

मायणी-निमसोड मार्गावरील येरळा नदीवरील पुलाची दोन वर्षांत तिसऱ्यांदा मलमपट्टी सुरू आहे. (छाया: संदीप कुंभार)