शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
4
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
5
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
6
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
7
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
8
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
9
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
10
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
11
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
12
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
13
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
14
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
15
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
16
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
17
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
18
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
19
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
20
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?

येरळा नदीवरील पुलाची पुन्हा मलमपट्टी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:40 IST

मायणी : मायणी-निमसोड मार्गावरील मोराळे गावाजवळ असलेल्या येरळा नदीवरील पुलाच्या दुरुस्तीच्या नावाखाली पुन्हा मलमपट्टी सुरू असून, मलमपट्टीऐवजी या पुलाची ...

मायणी : मायणी-निमसोड मार्गावरील मोराळे गावाजवळ असलेल्या येरळा नदीवरील पुलाच्या दुरुस्तीच्या नावाखाली पुन्हा मलमपट्टी सुरू असून, मलमपट्टीऐवजी या पुलाची उंची वाढवून पाणी योग्य पद्धतीने निचरा होण्याची गरज निर्माण आहे.

मायणी-निमसोड मार्गावरील मोराळे गावाच्या हद्दीमध्ये असलेल्या येरळा नदी पात्रातील पुलाची उंची अतिशय कमी आहे. तसेच या पुलावरून नदी पात्राच्या दोन्ही बाजूस जाणाऱ्या पाण्याच्या प्रवाहालाही योग्य पद्धतीचा निचरा होत नाही. त्यामुळे प्रत्येक वर्षी येरळा धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर धरणाच्या सांडव्यावरून पडणाऱ्या पाण्याचा प्रवाह वाढला की या नदीपात्रातील हा मोराळे पूल किती दिवस पाण्याखाली असतो.

अनेक दिवस पूल पाण्याखाली राहिल्यामुळे व येरळा धरणातून येणाऱ्या पाण्याच्या मोठ्या प्रवाहामुळे प्रत्येक वर्षी या पुलाला धोका निर्माण होतो तसेच या पुलाचा काही भाग खचत असतो किंवा वाहून जात असतो. सप्टेंबर, ऑक्टोबर २०१९ मध्ये झालेल्या अवकाळी पावसामध्ये या पुलावरून महिनाभर पाणी वाहत होते. या वाहणाऱ्या पाण्यामुळे पुलाचा बराचस भाग वाहून गेला होता. त्यावेळीही संबंधित विभागाकडून या पुलाची डागडुजी व मलमपट्टी करण्यात आली होती.

गतवर्षी जुलै-ऑगस्टमध्ये या परिसरामध्ये समाधानकारक पाऊस झाल्याने येरळा धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर धरणाच्या सांडव्यावरून पाण्याचा प्रवाह येरळा नदी पात्रात येऊ लागल्याने या नदीपात्रात असलेला मोराळे पूल पुन्हा एक महिन्याहून अधिक काळ पाण्याखाली होता अधिक काळ पाणी पुलावरून वाहत असल्याने मुलाचा २०१९ मध्ये डागडुजी केलेला भाग वाहून गेला तर नव्याने या पुलाची भिंतही खचते त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक झाला होता.

पुलावरील पाण्याचा प्रवाह कमी झाल्यानंतर संबंधित विभागाने या पुलाचे थोडीफार डागडुजी केली. मात्र अनेक दिवस पुलावरून पाणी वाहत असल्याने याचा बराचसा भाग खचल्यासारखा झाला होता या खचलेल्या भागाची दुरुस्ती संबंधित विभागाने पुन्हा सुरू केली आहे. मात्र या पुलाची प्रत्येकवर्षी मलमपट्टी न करता या पुलाची उंची वाढवून गरजेचे आहे तसेच येरळ धरणातून येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाला योग्य वाट देणे गरजेचे आहे. त्यासाठी उत्तर-दक्षिण पाणी पुलाखालून कशा पद्धतीने व योग्य प्रमाणात

जाईल यासाठी पुरेशी व्यवस्था करणे गरजेचे आहे.

(चौकट)

प्रवाशांची मोठी अडचण...

सलग दोन वर्षे येरळा धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. त्यामुळे दोन वर्षांत सुमारे तीन महिन्यांहून अधिक काळ हा पूल पाण्याखाली होता. त्यामुळे मायणी-निमसोड, औंध, सातारा मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी अडचण झाली होती. त्यामुळे या पुलाची उंची वाढवणे गरजेचे आहे.

०३ मायणी

मायणी-निमसोड मार्गावरील येरळा नदीवरील पुलाची दोन वर्षांत तिसऱ्यांदा मलमपट्टी सुरू आहे. (छाया: संदीप कुंभार)