शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
2
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
3
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
4
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती
5
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
6
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
7
Video: चालत्या ट्रेनमध्ये मारहाण अन् चोरीचा प्रयत्न; अभिनेत्रीसोबत घडली धक्कादायक घटना
8
इराण जे सांगतोय ते भारत आणि चीन होऊच देणार नाहीत, दोघंही मोठे व्यापारी; अमेरिकेचं गणित समजून घ्या?
9
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
10
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
11
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
12
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
13
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
14
केंद्र सरकार सीमा व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करणार; महाराष्ट्रातील खासदाराने केली होती मागणी
15
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
16
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
17
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
18
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
19
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा

नव्या वर्षात पुलांच्या कामाची ‘उड्डाणे’!

By admin | Updated: December 11, 2015 01:00 IST

शेंद्रे ते शिरवळपर्यंत १२ पुलांना डेडलार्ईन : रखडलेल्या कामांना अखेर मुहूर्त; सेवारस्त्यांची कामेही युद्धपातळीवर सुरू

प्रदीप यादव---सातारा -पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील प्रवास कमी वेळेत आणि सुरक्षित व्हावा, यासाठी सहापदरीकरणाच्या कामाबरोबरच उड्डाणपुलांची कामेही सुरू करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यात शेंद्रे ते पारगावपर्यंतच्या टप्प्यात १२ उड्डाणपुलांचे नियोजन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने केले आहे. काही पुलांची कामे या ना त्या कारणाने रखडली आहेत. परंतु नवीन वर्षात रखडलेल्या सर्व पुलांची कामे सुरू होणार असून कामाची ‘डेडलाईन’ही निश्चित झालेली आहे, अशी माहिती ‘भूसंपादन’चे उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (न्हाय) सहापदरीकरणाच्या कामाबरोबरच उड्डाणपुलांचे काम सुरू केल्याने एक ना धड भाराभर चिंध्या, अशी अवस्था सध्या पाहायला मिळत आहे. सर्वच ठिकाणची कामे अपूर्णावस्थेत असल्यामुळे आणि रस्त्यांची दुरवस्था झाल्यामुळे महामार्ग नको, पायवाट परवडली, असे म्हणण्याची वेळ वाहनधारक व प्रवाशांवर आली आहे. कामाचे योग्य नियोजन नसल्यामुळे सर्वत्र बोजवारा उडाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मात्र, येणाऱ्या अडचणी मार्गी लावल्याने २०१६ या नवीन वर्षात बहुतांश कामे मार्गी लागणार आहेत.सातारा जिल्ह्यात शेंद्रे ते खंडाळा-पारगाव या टप्प्यात एकूण १२ उड्डाणपुलांचे काम हाती घेण्यात आले आहे. यामध्ये शेंद्रे, शिवराज पेट्रोलपंप, वाडेफाटा, लिंब फाटा, आनेवाडी, उडतारे, पाचवड, भुर्इंज, जोशीविहीर, बोपेगाव, सुरूर-वेळे, पारगाव (भोर फाटा) आणि केसुर्डी फाटा याठिकाणी उड्डाण पूल उभारण्यात येणार आहेत. गेल्या पाच ते सहा वर्षांपासून महामार्गावर उड्डाणपुलांची कामे सुरू आहेत. मात्र, अद्याप बहुतांशी कामे अपूर्णावस्थेत आहेत. वाहतुकीचा बोजवारा उडाल्याने आणि महामार्ग ‘मृत्यूचा मार्ग’ बनल्याने स्थानिक नागरिकांसह प्रवासी, वाहनधारकांमधून संताप व्यक्त होत आहे. ‘न्हाय’च्या ढिसाळ नियोजनामुळे आजपर्यंत अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहेत. येणाऱ्या नवीन वर्षांत तरी ‘न्हाय’ने कामाचे योग्य नियोजन करून एक-एक काम मार्गी लावावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. शिरवळ, खंडाळ्यातील सेवारस्त्यांचे रूंदीकरणमहामार्गाच्या सहापदरीकरणाच्या कामामुळे रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण शिरवळ आणि खंडाळा शहरातील सेवारस्त्यांचे रुंदीकरण करणार असून याचे काम जानेवारी २०१६ मध्ये सुरू करणार आहे. यासाठीची सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.खंबाटकी घाटातील रस्त्याचेही रुंदीकरणपुण्याहून सातारकडे येताना वाहनचालकांना खंबाटकीचा अवघड घाट चढून यावे लागते. घाटातील रस्ता अरुंद असल्यामुळे अनेकदा कंटेनर अडकून वाहतूक कोंडीची समस्या उद्भवते. घाटरस्ता अवघड असल्यामुळे अपघाताचे प्रमाणही जास्त आहे. यावर तोडगा म्हणून महामार्ग प्राधिकरणाने खंबाटकी घाटातील रस्त्याचे रुंदीकरण करण्याचे काम हाती घेतले आहे. मार्च २०१६ पर्यंत तीन महिन्यांत हे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे.घाटातील मंदिराचा वाद मिटायला हवा खंबाटकी घाटरस्त्याचे रुंदीकरण करताना घाटातील खामजाई देवीचे मंदिर इतरत्र हलवावे लागणार आहे. त्यासाठी या मंदिराचा वाद मिटणे गरजेचे आहे. रस्त्यापासून आतल्या बाजूस मंदिरासाठी मोठी जागा देण्याचे नियोजन झाले आहे. तसेच याठिकाणी पाण्याची सोयही केली जाणार आहे. मात्र, शिवसैनिकांचा मंदिर हलविण्यास विरोध आहे.