शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
4
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
5
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
6
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
7
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
8
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
9
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
10
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
11
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
12
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
13
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
14
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
15
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
16
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन
17
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
18
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
19
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
20
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!

कऱ्हाडात ‘वायफाय’ सेवेला अखेर ब्रेक

By admin | Updated: January 18, 2016 23:38 IST

जिल्हाधिकाऱ्यांकडून स्थगिती : पाच वर्षांतील सत्ताधाऱ्यांच्या मनमानीला दुसरी चपराक

कऱ्हाड : कऱ्हाड शहरातील लोकांच्या सोयीसाठी पालिकेतर्फे सुरू करण्यात आलेल्या वायफाय सुविधेच्या ठरावाला सुरुवातीपासूनच विरोध केला जात होता. वायफाय सेवा पुरविणाऱ्या कंपनीकडून जागेचे भाडे पालिकेला भरले जावे, तसेच वायफाय सेवेतून ग्राहकांना काही काळ मोफत सेवा दिली जावी, अशा अनेक मागण्या होत्या. मात्र, सेवेतील दराबाबत कसलीही माहिती न देता सेवा सुरू करण्यात आली. त्यामुळे याविरोधात पालिकेतील विरोधी आघाडीसह पक्षनेत्या स्मिता हुलवान यांनी विरोध दर्शविला तसेच शिवसेनेकडून प्रसंगी आंदोलनेही करण्यात आली. तरीही ठेकेदाराकडून काम सुरू ठेवले गेले असल्याने याबाबत लोकप्रतिनिधी व जनतेतून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्याने जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी सोमवारी वायफायच्या कामास स्थगिती देऊन याची चौकशी करण्याचे आदेश दिले.इस्लामपूरनंतर कऱ्हाड शहरात वायफाय सेवा सुरू करण्यासाठी कंपनीकडून कऱ्हाड पालिकेला पहिल्यांदा आलेल्या प्रस्तावाला त्याकाळच्या सत्ताधाऱ्यांकडून मंजुरी देण्यात आली होती. त्यानुसार शहरात जलद गतीने वायफायसेवा उभारण्यासाठी कामे सुरू करण्यात आली. कामे सुरू असताना सेवेबाबत कंपनीकडून कोणत्याही स्वरूपाची ठोस माहिती दिली जात नसल्याने याबाबत विरोधी आघाडीकडून कामांना विरोध केला गेला. त्या वायफायला विरोध करण्यासाठी शिवसेनाही पुढे आली. त्यातून शेवटपर्यंत पालिकेच्या विरोधी पक्षनेत्या स्मिता हुलवान यांनी या प्रकरणाचा पाठ पुरावा केला. तसेच या कामांची चौकशी करण्याबाबत शिवसेनेच्या वतीने पालिकेसमोर आंदोलनही करण्यात आले. त्यावेळी संबंधित वायफायच्या कामाची चौकशी करण्याची मागणी शिवसेनेने केली. यानंतर वायफाय सेवेचे काम बंद ठेवले जाईल, असे सर्वांना वाटू लागले. मात्र, त्यानंतरही हे काम कंपनीकडून सुरूच ठेवण्यात आले. मुख्याधिकारी यांनीही जोपर्यंत कामाबाबत संपूर्ण माहिती दिली जात नाही तोपर्यंत काम सुरू करू नये, अशा कंपनीच्या ठेकेदारास सूचनाही केल्या होत्या. मात्र, तरीही कंपनीकडून मुख्याधिकाऱ्यांना कोणताही खुलासा न देता काम सुरू ठेवले गेले. याबाबत अखेर ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर, नगरसेवक श्रीकांत मुळे व विरोधी पक्षनेत्या स्मिता हुलवान यांच्यासह नागरिकांनी सुरू असलेले काम बंद पाडले.वायफायसाठी रस्त्याकडेला करण्यात आलेल्या खोदकामामुळे शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. याचा शहरातील वाहतुकीवरही परिणाम होत असल्यामुळे यातून योग्य मार्ग काढण्यासाठी ठोस उपाययोजना करणे गरजेच्या होत्या. त्यातून अखेर सुरू झालेल्या वायफाय योजनेला महिना पूर्ण होण्याआधीच जिल्हाधिकाऱ्यांकडून स्थगिती देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)जनहिताविरोधी वायफायचा ठराव करण्यात आला. त्यामुळे जो काही पालिकेमध्ये गैरकारभार सुरू आहे. त्याला या निर्णयामुळे पायबंद बसला आहे. आता तरी इथून पुढे पालिकेत होणारे ठराव हे जनहितासाठी करण्यात यावेत, अशी आशा आहे. ज्यांना वाटते आमचाच फक्त अभ्यास आहे. त्यांना या निर्णयामुळे समजले असावे की, कोणाचा किती अभ्यास आहे.- स्मिता हुलवान, विरोधी पक्षनेत्या, कऱ्हाड पालिकापाच वर्षांत दुसरी स्थगितीगेल्या पाच वर्षांत सत्ताधाऱ्यांनी प्रस्तावित केलेल्या दोन कामांना जिल्हाधिकाऱ्यांकडून स्थगिती देण्यात आली आहे. रस्ता दुभाजकावरील ठराव व आता वायफायची योजना या दोन्ही ठरावात सत्ताधाऱ्यांनी पुढाकार घेतला होता. त्या दोन्ही मंजूर ठरावांना जिल्हाधिकाऱ्यांकडून पाच वर्षांत स्थगिती देण्यात आली आहे.