शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

‘कृषी’च्या कामांवर बहिष्कार; सातारा कृषी कर्मचारी संघटनांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 23:07 IST

सातारा : एका व्यक्तीच्या पूर्वगृहदूषित भूमिका व दुराग्रहामुळे वारंवार तपासण्या, चौकशांना सामोरे जावे लागत असल्याने कर्मचाºयांचे मनोधैर्य खचले आहे.

ठळक मुद्देतपासण्यांचा फेरा कोणताही गंभीर गैरव्यवहार आढळून आला नाही.

सातारा : एका व्यक्तीच्या पूर्वगृहदूषित भूमिका व दुराग्रहामुळे वारंवार तपासण्या, चौकशांना सामोरे जावे लागत असल्याने कर्मचाºयांचे मनोधैर्य खचले आहे. याचा निषेध म्हणून कृषी विभागातील अधिकारी व कर्मचाºयांनी जलयुक्त शिवार व मृदासंधारणाच्या कामावर बहिष्कार घातला आहे, अशी माहिती विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी पत्रकार परिषदेत दिली.

याबाबत जिल्हाधिकाºयांकडेही तक्रार करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. जिल्ह्यामध्ये केंद्र व राज्य पुरस्कृत योजनेंतर्गत विविध मृदा व जलसंधारण योजनांची कामे करण्यात आली आहेत. त्या सर्व कामांची एकूण १० त्रयस्थ शासकीय, अशासकीय संस्थांमार्फत तपासणी करण्यात आली आहे. त्याचा अहवालही प्रशासनाला सादर झाला आहे. या तपासणीमध्ये कोतणताही आक्षेपार्ह अथवा गंभीर गैरव्यवहार झाल्याचे निदर्शनास आले नाही, हा अहवाल महसूल विभागाकडे उपलब्ध आहे.

दरम्यान, विलास शंकर यादव यांनी जिल्ह्यातील कृषी विभागातील मृदा व जलसंधारण कामांमध्ये गैरव्यवहार झाल्याची तक्रार कृषी विभागाच्या आयुक्तांकडे केली होती. आयुक्तालयाच्या दक्षता विभागाने त्यांच्या तक्रारीनुसार कामांची तपासणी केली. त्यात कोणताही गंभीर गैरव्यवहार आढळून आला नाही. त्यानंतरही यादव यांनी वारंवार अर्ज करून तपासणीची मागणी केली. वारंवार कागदपत्रे काढावी लागत असून, शासनाने दिलेली उद्दिष्ट्ये पूर्ण करत असताना अडथळे येत आहेत. कृषी विभागातील कर्मचारी प्रचंड तणावाखाली आहेत. दरम्यान, कृषी विभागाच्या अधिकाºयांनी केलेल्या खुलाशावर शासनाने ६ महिने होऊनही काहीही निर्णय घेतला नाही. या पार्श्वभूमीवर कामांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

यावेळी जिल्हा कृषी उपअधीक्षक जी. व्ही. काळे, उपविभागीय कृषी अधिकारी विजय माईनकर, कृषी पर्यवेक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील जाधव, कृषी सहायक संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनोद पुजारी, प्रकाश सूर्यवंशी, प्रभाकर पाटील, प्रकाश राठोड, संदीप केवटे, व्ही. एन. भुजबळ, तुषार जाधव, सुनील साळुंखे, आर. ए. कांबळे, जी. यू. डोईफोडे, डी. जी. वज्रशेट्टी, विनोद नलावडे, शिवाजी चौगुले, आर. एच. शिंदे, अनिल महामुलकर, वाय. ए. काटे उपस्थित होते.एकाच लाभार्थीचे ३०० माहिती अर्जविलास यादव व त्यांच्या कुटुंबीयांना कृषी विभागामार्फत विविध योजनांचे १० लाख ९२ हजार इतके अनुदान दिले आहे. फळबाग लागवड योजनेत रोपे, कलमे यांची लागवड न करता फक्त अनुदानाची मागणी केली आहे. अनुदान प्राप्त होत नसल्याने तक्रारी दाखल केल्या आहेत, एकाच व्यक्तीचे ३०० अर्ज कृषी विभागाकडे दाखल झाले आहेत. संबंधिताने रोजगार हमी योजनेतील फळबाग लागवड, फळबाग पुनर्जीवन अनुदान, पॅक हाऊस अनुदान, ठिबक सिंचनमधील अनुदान, शेततळे अंतर्गत अनुदान, अशा विविध प्रकारांतील अनुदान मिळविले आहे, असे कृषी अधिकारी व कर्मचाºयांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :agricultureशेतीSatara areaसातारा परिसर