शहरं
Join us  
Trending Stories
1
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
2
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
3
एका सल्ल्यासाठी ₹११ कोटी! पीकेंच्या कमाईचे आकडे पाहून चक्रावून जाल; ₹९८ कोटी दान केले...
4
'त्या नारी शक्तीचे एक उदाहरण...', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्राला प्रस्तावना लिहिली
5
प्रशांत किशोर यांची 3 वर्षांची कमाई बघून थक्क व्हाल, जन सूरज पक्षाला डोनेट केले तब्बल 98 कोटी!
6
अरेरे! लहान वयात केस पिकले, नारळाच्या तेलात 'हे' मिसळा; चिंता सोडा, पांढऱ्या केसांना टाटा करा
7
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
8
'हे' मेड इन इंडिया मॅसेजिंग अ‍ॅप घेणार WhatsApp ची जागा? दुर्गम भागातील लोकांना होणार फायदा?
9
एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन...
10
ऑटो कंपन्यांचे पाकिस्तानातून पलायन! सरकारकडून सेकंड हॅन्ड गाड्यांना आयात करण्यासाठी परवानगी
11
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
12
वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 
13
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
14
सणासुदीच्या काळात सावध राहा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?
15
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
16
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
17
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
18
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
19
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
20
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप

पराभवाचा वचपा काढण्यासाठी चढाओढ !

By admin | Updated: December 31, 2016 21:59 IST

सत्ता बदल होणार का ? : मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू; अनेकांची प्रतिष्ठा पणाला

सूर्यकांत निंबाळकर --आदर्की --हिंगणगाव जिल्हा परिषद मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सारिका धैर्यशील अनपट यांनी राष्ट्रीय काँग्रेसच्या विमलताई प्रल्हादराव साळुंखे-पाटील यांचा निसटता पराभव करून राष्ट्रीय काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात खिंडार पाडले. हिंगणगाव जिल्हा परिषद मतदार यांनी दुसरा तरडगाव मतदारसंघ निवडल्यास धैर्यशील ऊर्फ दत्ता अनपट यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळेल तर राष्ट्रीय काँग्रेसचे प्रल्हादराव साळुंखे-पाटील गत पराभवाचा वचपा काढण्यासाठी रिंगणात उतरल्यास निवडणूक चुरशीची होणार असल्याची चर्चा राजकीय गोटात सुरू आहे. फलटण तालुक्यातील हिंगणगाव जिल्हा परिषद मतदार संघातील गावे दुष्काळी होती. त्यावेळी राष्ट्रीय काँग्रेसचे नेते माजी आमदार चिमणराव कदम, माजी खासदार हिंदुराव नाईक-निंबाळकर, साखरवाडीच्या न्यू शुगरचे सर्वेसर्वा प्रल्हादराव साळुंखे-पाटील यांचे वर्चस्व होते; पण ३१ डिसेंबर ११ रोजी आदर्कीच्या माळावर पाणी पूजन झाले. अन् दुष्काळी भागातील शेतकरी वर्गाने रामराजे नाईक-निंबाळकर यांना साथ देण्याचा निर्णय घेतला.जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका जाहीर झाल्या. साखरवाडी गटात संजीवराजे नाईक-निंबाळकर विरुद्ध प्रल्हादराव साळुंखे-पाटील अशी लढत तर हिंगणगाव जिल्हा परिषद मतदार संघात त्यांच्या पत्नी विमलताई साळुंखे-पाटील तर मुलगा धनंजय साळुंखे-पाटील पंचायत समिती निवडणुकीत त्यामुळे प्रचार यंत्रणाचे लक्ष साखरवाडी मतदार संघात गुंतली. त्यामुळे बालेकिल्ल्यात दुर्लक्ष झाले. त्याचा परिणाम मतदानावर झाला. त्यामुळे प्रल्हादराव साळुंखे-पाटील यांचा सिंह गेला अन् धनंजय पाटील पंचायत समितीवर निवडून येऊन सुरवडीचा गड राखला. पाच वर्षे जिल्हा परिषद सदस्या सारिका अनपट यांच्या माध्यमातून धैर्यशील ऊर्फ दत्ता अनपट यांनी मतदार संघात संधीचे सोने करून राष्ट्रवादी व रामराजे नाईक-निंबाळकर, संजीवराजे निंबाळकर यांचे निष्ठावंतपणे काम केल्याने कोट्यवधीचा निधी मतदार संघात खर्च केला. राष्ट्रीय काँग्रेसचे नेते प्रल्हादराव साळुंखे-पाटील यांनी प्रत्येक गावात वैयक्तिक ताकदीवर कार्यकर्त्याला ताकद देऊन सत्ता असो वा नसो हिंगणगाव मतदार संघावर पकड ठेवली आहे. सुरवडी पंचायत समिती गणात गेली २० वर्षे काँग्रेसची सत्ता आहे तर हिंगणगाव पंचायत समिती गणावर राष्ट्रवादी पक्षाची सत्ता आहे. परंतु हिंगणगाव जिल्हा परिषद मतदार संघावर मात्र प्रत्येक पाच वर्षांनी सत्ता बदल होत आहे. त्यामुळे यावेळची निवडणूक चुरशीची होणार असल्याची चर्चा आहे. हिंगणगाव जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीचे संजीवराजे नाईक-निंबाळकर, धैर्यशील ऊर्फ दत्ता अनपट, विलासराव झणझणे, डॉ. पद्मराज भोईटे, विलासराव धुमाळ, अनिल भोईटे, विलासराव नलवडे इच्छुक आहेत. इच्छुक उमेदवारांची संख्या वाढतेयराष्ट्रीय काँग्रेसचे प्रल्हादराव साळुंखे-पाटील, धनंजय साळुंखे, सुरेश भोईटे, सुरेश साक्षे इच्छुक आहेत. भाजप सुरेश निंबाळकर, हणमंत नलवडे, विशाल झणझणे.हिंगणगाव पंचायत समिती गण राष्ट्रवादी : लतिका अनपट, योगिता झणझणे, स्वाती भोईटे, पुष्पा तानाजी धुमाळ तर राष्ट्रीय काँग्रेस सीमा भोईटे इच्छुक आहेत.सुरवडी गण ओबीसी महिलेसाठी राखीव आहे. यामधून प्रियांका सरक, मजूंषा भोसले, विद्या अंकुश देवकर इच्छुक आहेत. शिवसेना जिल्हा परिषदसाठी हणमंत बासर तर रासप तर्फे खंडेराव धरक इच्छुक आहेत.