शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

साताऱ्यात पाणीटंचाई; रिकामी भांडी घेऊन नागरिक रस्त्यावर

By सचिन काकडे | Updated: March 6, 2024 16:57 IST

सातारा : सातारा शहरात गेल्या काही दिवसांपासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या टंचाईने त्रस्त झालेल्या यादोगोपाळ पेठेतील रहिवाशांनी ...

सातारा : सातारा शहरात गेल्या काही दिवसांपासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या टंचाईने त्रस्त झालेल्या यादोगोपाळ पेठेतील रहिवाशांनी बुधवारी सकाळी रिकामी भांडी रस्त्यावर मांडून रास्ता रोको केला. या आंदोलनाची माहिती मिळताच पालिकेतील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन वितरण व्यवस्थेतील तांत्रिक अडचणी दूर करण्याचे आश्वासन नागरिकांना दिले.सातारा शहरात उन्हाचा तडाखा सुरू झालेला असताना पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. त्यातही पालिकेकडून आठवड्यातून दोन दिवस पाणी कपात सुरू करण्यात आली आहे. या कपातीमुळे नागरिक आधीच हैराण झाले असताना कास योजनेच्या मुख्य जलवाहिनीला गळती लागत असल्याने शहराचा पाणीपुरवठा  वारंवार विस्कळीत होत आहे. पालिकेचा टँकर वेळेत मिळत नसल्याने नागरिकांना खासगी टँकरचा आधार घ्यावा लागत आहे.गेल्या काही दिवसांपासून यादोगोपाळ पेठेतील गोल मारुती मंदिर परिसर, बोकील बोळ तसेच काशी विश्वेश्वर मंदिर परिसर येथील नागरिकांना तीव्र टंचाईला सामोरे जावे लागत आहे. सलग चार दिवसांपासून नळाला पाणीच न आल्याने संतप्त झालेल्या यादोगोपाळ पेठेतील महिलांनी बुधवारी सकाळी रस्त्यावर भांडी मांडून पालिकेच्या ढिसाळ कारभाराबद्दल संताप व्यक्त केला. यादोगोपाळ पेठेला गुरुकुल टाकीमधून पाणीपुरवठा केला जातो. या टाकीची क्षमता दहा लाख लिटर इतकी आहे. परंतु ही टाकी पूर्ण क्षमतेने भरत नसल्याने भागातील नागरिकांना केवळ १५ ते २० मिनिटे पाणी मिळते. जलवाहिनी व व्हॉल्व्हला लागलेल्या गळतीमुळे हे पाणी देखील मिळणे बंद झाले आहे. सातत्याने पाठपुरावा करूनही पाणीपुरवठा विभागाच्या कामकाजात कोणताही फरक न पडल्याने नागरिकांना आंदोलनाची भूमिका स्वीकारावी लागली. सुमारे अर्धा तास हे आंदोलन सुरू होते.या आंदोलनाची माहिती मिळताच पाणीपुरवठा विभागाचे संदीप सावंत तसेच शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पाणी वितरण व्यवस्थेतील सर्व अडचणी दूर केल्या जातील, नागरिकांना पुरेशा दाबाने पाणी देण्यात येईल, अत्यावश्यक ठिकाणी टँकर सुरू केले जातील, असे आश्वासन यावेळी देण्यात आले. यानंतर आंदोलन स्थगित झाले. या आंदोलनात माजी नगरसेवक धनंजय जांभळे यांच्या नेतृत्वाखाली महिला व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWaterपाणी