शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
2
'एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकेल'; अमेरिकेचा पाकिस्तानसोबत करार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
3
"काँग्रेसने संपूर्ण हिंदू समाजाची माफी मागावी..."; मालेगाव निकालावर CM फडणवीसांचं रोखठोक मत
4
बाईकचा चेसिस नंबर सापडलाच नाही! प्रज्ञा सिंह ठाकूर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून कशा सुटल्या?
5
Gold Silver Price 31 July 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावे लागणार; पाहा नवे दर
6
मला माझे ९०० रुपये परत हवेत; मालेगाव बॉम्बस्फोटात निर्दोष सुटलेल्या समीर कुलकर्णींची मागणी 
7
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण निकाल: सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता, कुणावर होते काय आरोप?
8
Upcoming Smartphones: विवो, रेडमीपासून ते गूगल पिक्सेलपर्यंत; ऑगस्टमध्ये पडणार स्मार्टफोनचा पाऊस!
9
पाकिस्तानी बॉर्डरजवळ विखुरलेल्या बांगड्यांचं सत्य काय?; भारताने शोधून काढलं दडलेलं रहस्य
10
मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निर्णयावर ओवेसी नाराज, मोदी सरकारवर केले गंभीर आरोप...
11
शिक्षण महागलं! "ABCD शिकवण्याचे २.५ लाख द्यायचे?"; लेकीची नर्सरीची फी पाहून आई शॉक
12
सावधान! AI मुळे 'या' नोकऱ्या धोक्यात? मायक्रोसॉफ्टच्या अभ्यासात धक्कादायक खुलासा, तुमची नोकरी सुरक्षित आहे का?
13
ट्रम्प यांचा भारतावरील टॅरिफ बॉम्ब अमेरिकन लोकांवरच उलटणार? औषधांच्या किंमती वाढण्याचा धोका
14
"राजकीय बदनामीच्या षड्यंत्राचा पर्दाफाश, काँग्रेसने हिंदूंची माफी मागावी", भाजपाचा हल्लाबोल
15
"हिंदू दहशतवादी नाही, शाहांचं विधान अन् आज कोर्टात आरोपींची निर्दोष सुटका हा फक्त योगायोग"
16
१७ वर्षांनी आरोपी निर्दोष सुटले, मग दोषी कुठे आहेत?; मालेगाव स्फोट खटल्याच्या निकालानंतर प्रश्नचिन्ह
17
धक्कादायक! ८ वर्षांच्या चिमुकल्याच्या गुप्तांगावर शिक्षिकेनं फवारलं कॉलीन; नालासोपाऱ्याच्या शाळेला टाळं
18
लॉर्ड्स मैदानावर खेळला शाहिद कपूर, इंग्लंडच्या माजी खेळाडूंसोबत शेअर केले Photo
19
Malegaon Blast Case Verdict : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष सुटताच प्रज्ञा सिंह भावूक, अश्रू अनावर, म्हणाल्या - 'भगवा जिंकला...'
20
मालेगाव बॉम्बस्फोट; कधी अन् कसा झाला? किती लोक मृत्यूमुखी पडले? जाणून घ्या पूर्ण टाईमलाईन

सांगली-साताऱ्यातून भाजपची माघार

By admin | Updated: November 6, 2016 00:28 IST

विधान परिषद निवडणूक : कॉँग्रेस बंडखोराचा अर्ज कायम; मुख्य लढत मोहनराव कदम व शेखर गोरे यांच्यातच

सांगली : विधानपरिषद निवडणुकीत शनिवारी काँग्रेसचे मोहनराव कदम आणि राष्ट्रवादीचे शेखर गोरे यांच्या थेट लढतीवर शिक्कामोर्तब होत असताना काँग्रेसमधील विशाल पाटील गटाचे बंडखोर उमेदवार शेखर माने यांनी माघारीचे नाट्य घडवून रिंगणात अर्ज कायम ठेवला. दुसरीकडे भाजपने कमी संख्याबळाचे कारण सांगत मैदानातून माघार घेतली. कदम-दादा गटातील वाद संपुष्टात आणण्यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेली शिष्टाई असफल ठरल्याने तिरंगी लढतीची चिन्हे दिसत आहेत. सांगली-सातारा विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेसने जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम यांची उमेदवारी जाहीर केली. त्याचवेळी वसंतदादांचे नातू विशाल पाटील यांच्या गटाने महापालिकेतील काँग्रेसचे नगरसेवक शेखर माने यांचा अर्ज दाखल केला. अधिकृत उमेदवार निश्चित झाल्यानंतरही माने यांचा अर्ज तसाच ठेवण्यात आला. अर्ज माघारीची अंतिम मुदत शनिवारी दुपारी तीनपर्यंत होती. त्यामुळे सकाळी अकरापासून बंडखोर गटाला शांत करण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांनी हालचाली सुरू केल्या. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे दूत म्हणून आलेले आमदार आनंदराव पाटील आणि शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी विशाल पाटील यांच्याशी चर्चा केली. त्यांची शिष्टाई कामी येत नसल्याचे लक्षात आल्यानंतर याबाबतची माहिती चव्हाण यांना देण्यात आली. चव्हाण यांनी दूरध्वनीवरून विशाल पाटील यांच्याशी संपर्क साधला. काँग्रेसअंतर्गत वाद निर्माण होणे पक्षाच्या हिताचे नाही. त्यामुळे पक्षीय आदेश म्हणून अर्ज मागे घ्यावा, असे चव्हाण यांनी त्यांना सांगितले. पाटील यांनीही अर्ज मागे घेण्याचे मान्य केले. त्यानंतर माघार नाट्यास सुरुवात झाली. शेखर माने अर्ज मागे घेणार म्हणून कदम गट तसेच अन्य काँग्रेस नेत्यांचा जीव भांड्यात पडला. दुपारी अडीचला बैठक संपल्यानंतर माने यांना अर्ज मागे घेण्याची सूचना देण्यात आली. मात्र त्यांनी माघारीचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्याकडे ३ वाजून २ मिनिटांनी सादर केला! गायकवाड यांनी माघारीची मुदत संपल्याचे स्पष्ट करून अर्ज स्वीकारला नाही. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना माने यांनी निवडणूक लढवायची की पाठिंबा द्यायचा, याबाबत पुनर्विचार सुरू असल्याचे स्पष्ट करून संभ्रम निर्माण केला. काँग्रेसमधील बंडखोरी कायम राहिल्याने पक्षांतर्गत चिंता वाढली आहे.दुसरीकडे भाजपने कमी संख्याबळाचे कारण सांगत माघार घेतली. निवडणूक रिंगणात आता काँग्रेसचे मोहनराव कदम, राष्ट्रवादीचे शेखर गोरे, काँग्रेसचे बंडखोर शेखर माने आणि अपक्ष मोहनराव गुलाबराव कदम यांचे अर्ज राहिले आहेत. (प्रतिनिधी)माझा पाठिंबा, मानेंची नाराजीपत्रकारांशी बोलताना विशाल पाटील म्हणाले की, पृथ्वीराज चव्हाण यांच्या आदेशाचा आदर करून आम्ही उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, शेखर माने यांची अजूनही नाराजी आहे. ती स्वाभाविक आहे. अधिकृत उमेदवार म्हणून मोहनराव कदम यांच्याबरोबर असलो, तरी माने यांची नाराजी दूर करावी लागेल. माने यांची बंडखोरी नाही. अजूनही मतदानाला वेळ आहे, तोपर्यंत आम्ही माने यांची नाराजी दूर करू शकतो. राजकारणात भाऊबंदकी असते!कदम गटाला शह म्हणून माने यांनी अर्ज दाखल केलेला नाही. राजकारणात महत्त्वाकांक्षा असू शकतात. भाऊबंदकीसुद्धा असते. मी चुलत भावाच्या विरोधात लढलो आहे. त्यामुळे राजकारणात या गोष्टी नव्या नाहीत. तरीही पक्षाच्या विरोधात जाऊन राजकारण कधीही केलेले नाही. विधानपरिषदेच्या निवडणुकीतही ते होणार नाही, असे विशाल पाटील म्हणाले. वाद मिटलेला आहे...आमदार आनंदराव पाटील म्हणाले की, पक्षांतर्गत वाद आता संपुष्टात आला आहे. शेखर माने यांचा उमेदवारी अर्ज तांत्रिक कारणाने राहिला आहे. लवकरच ते पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या बाजूने भूमिका स्पष्ट करतील, याची खात्री आहे. बंडखोरीचा प्रश्न उरलेला नाही. कॉँग्रेस एकसंधपणेच ही निवडणूक लढवेल. राष्ट्रवादीतच अधिक मतभेद आहेत. त्याचा फायदा कॉँग्रेसला मिळणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांची संख्या : १८असे आहे मतदानएकूण मतदान ५७०सातारा ३०४सांगली २६६महिला २८४पुरुष २८६रिंगणातील उमेदवार मोहनराव श्रीपती कदम (काँग्रेस), मोहनराव गुलाबराव कदम (अपक्ष), शेखर भगवानराव गोरे (राष्ट्रवादी), शेखर माने (काँग्रेस बंडखोर)माघार घेतलेले उमेदवारआ. प्रभाकर घार्गे (अपक्ष), अरुण लाड (अपक्ष), किशोर धुमाळ (अपक्ष), युवराज बावडेकर (भाजप)दुसरे मोहनराव कदमकोरेगाव तालुक्यातीलसातारा : विधान परिषदेसाठी उमेदवार म्हणून शेवटपर्यंत टिकून राहिलेले मोहनराव गुलाबराव कदम हे कोरेगाव तालुक्यातील देऊरचे आहेत. काँग्रेसचे उमेदवार मोहनराव श्रीपतराव कदम यांच्या नावाशी साधर्म्य असणारे देऊरचे कदम शिक्षक असून, अर्ज भरल्यापासून गावात कुणाला दिसलेच नसल्याची चर्चा सुरू झाली आहे. तसेच त्यांच्या मोबाईलवरही संपर्क होऊ शकत नाही. दरम्यान, त्यांनी सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज भरल्याचेही गावात कुणाला ठाऊक नव्हते. त्यांचा शोध घेत परजिल्ह्यातील कार्यकर्ते, नेते गावात आल्यानंतर मात्र हे उमेदवार असल्याचा साक्षात्कार गावकऱ्यांना झाला.