शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान-सौदी अरेबियात डील, भारताची पहिली प्रतिक्रिया; "आम्ही देशहिताचं रक्षण करण्यासाठी..."
2
कर्नाटकमध्ये मतचोरीचा डाव काँग्रेसवरच उलटला, आमदार संशायाच्या भोवऱ्यात, हायकोर्टाने निकाल रद्द केला
3
दीड कोटींच्या जमिनीवर सगळ्यांचा डोळा; सावत्र भावांनी कट रचला, ८ लाख दिले तरी प्लॅन कसा फसला?
4
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
5
फक्त ५००० रुपयांच्या कर्जातून उभारले १३,५०० कोटींचे साम्राज्य! तुमच्या घरातही वापरली जाते 'ही' वस्तू
6
BAN vs AFG Live Streaming : अफगाणिस्तानसमोर मोठं चॅलेंज! लढत श्रीलंकेविरुद्ध अन् चितपट करायचंय बांगलादेशला! जाणून घ्या समीकरण
7
महामार्गावर अचानक भूस्खलन, पळाले म्हणून थोडक्यात वाचले भाजप खासदार; व्हिडीओ केला शेअर
8
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
9
पहिल्याच प्रयत्नात नीरज पोहोचला अंतिम फेरीत; जागतिक अजिंक्यपद : सचिन यादवही ठरला पात्र
10
तासाभराचं नाट्य, बहिष्काराची धमकी, ६ ईमेल आणि..., पाकिस्तान असा आला वठणीवर, त्या बैठकीत काय घडलं?
11
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
12
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
13
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
14
Share Market: US Fed च्या निर्णयानंतर देशांतर्गत शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स ३०० अंकांनी वधारला; 'या' शेअर्समध्ये तेजी
15
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
16
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
17
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
18
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
19
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
20
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर

सांगली-साताऱ्यातून भाजपची माघार

By admin | Updated: November 6, 2016 00:28 IST

विधान परिषद निवडणूक : कॉँग्रेस बंडखोराचा अर्ज कायम; मुख्य लढत मोहनराव कदम व शेखर गोरे यांच्यातच

सांगली : विधानपरिषद निवडणुकीत शनिवारी काँग्रेसचे मोहनराव कदम आणि राष्ट्रवादीचे शेखर गोरे यांच्या थेट लढतीवर शिक्कामोर्तब होत असताना काँग्रेसमधील विशाल पाटील गटाचे बंडखोर उमेदवार शेखर माने यांनी माघारीचे नाट्य घडवून रिंगणात अर्ज कायम ठेवला. दुसरीकडे भाजपने कमी संख्याबळाचे कारण सांगत मैदानातून माघार घेतली. कदम-दादा गटातील वाद संपुष्टात आणण्यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेली शिष्टाई असफल ठरल्याने तिरंगी लढतीची चिन्हे दिसत आहेत. सांगली-सातारा विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेसने जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम यांची उमेदवारी जाहीर केली. त्याचवेळी वसंतदादांचे नातू विशाल पाटील यांच्या गटाने महापालिकेतील काँग्रेसचे नगरसेवक शेखर माने यांचा अर्ज दाखल केला. अधिकृत उमेदवार निश्चित झाल्यानंतरही माने यांचा अर्ज तसाच ठेवण्यात आला. अर्ज माघारीची अंतिम मुदत शनिवारी दुपारी तीनपर्यंत होती. त्यामुळे सकाळी अकरापासून बंडखोर गटाला शांत करण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांनी हालचाली सुरू केल्या. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे दूत म्हणून आलेले आमदार आनंदराव पाटील आणि शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी विशाल पाटील यांच्याशी चर्चा केली. त्यांची शिष्टाई कामी येत नसल्याचे लक्षात आल्यानंतर याबाबतची माहिती चव्हाण यांना देण्यात आली. चव्हाण यांनी दूरध्वनीवरून विशाल पाटील यांच्याशी संपर्क साधला. काँग्रेसअंतर्गत वाद निर्माण होणे पक्षाच्या हिताचे नाही. त्यामुळे पक्षीय आदेश म्हणून अर्ज मागे घ्यावा, असे चव्हाण यांनी त्यांना सांगितले. पाटील यांनीही अर्ज मागे घेण्याचे मान्य केले. त्यानंतर माघार नाट्यास सुरुवात झाली. शेखर माने अर्ज मागे घेणार म्हणून कदम गट तसेच अन्य काँग्रेस नेत्यांचा जीव भांड्यात पडला. दुपारी अडीचला बैठक संपल्यानंतर माने यांना अर्ज मागे घेण्याची सूचना देण्यात आली. मात्र त्यांनी माघारीचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्याकडे ३ वाजून २ मिनिटांनी सादर केला! गायकवाड यांनी माघारीची मुदत संपल्याचे स्पष्ट करून अर्ज स्वीकारला नाही. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना माने यांनी निवडणूक लढवायची की पाठिंबा द्यायचा, याबाबत पुनर्विचार सुरू असल्याचे स्पष्ट करून संभ्रम निर्माण केला. काँग्रेसमधील बंडखोरी कायम राहिल्याने पक्षांतर्गत चिंता वाढली आहे.दुसरीकडे भाजपने कमी संख्याबळाचे कारण सांगत माघार घेतली. निवडणूक रिंगणात आता काँग्रेसचे मोहनराव कदम, राष्ट्रवादीचे शेखर गोरे, काँग्रेसचे बंडखोर शेखर माने आणि अपक्ष मोहनराव गुलाबराव कदम यांचे अर्ज राहिले आहेत. (प्रतिनिधी)माझा पाठिंबा, मानेंची नाराजीपत्रकारांशी बोलताना विशाल पाटील म्हणाले की, पृथ्वीराज चव्हाण यांच्या आदेशाचा आदर करून आम्ही उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, शेखर माने यांची अजूनही नाराजी आहे. ती स्वाभाविक आहे. अधिकृत उमेदवार म्हणून मोहनराव कदम यांच्याबरोबर असलो, तरी माने यांची नाराजी दूर करावी लागेल. माने यांची बंडखोरी नाही. अजूनही मतदानाला वेळ आहे, तोपर्यंत आम्ही माने यांची नाराजी दूर करू शकतो. राजकारणात भाऊबंदकी असते!कदम गटाला शह म्हणून माने यांनी अर्ज दाखल केलेला नाही. राजकारणात महत्त्वाकांक्षा असू शकतात. भाऊबंदकीसुद्धा असते. मी चुलत भावाच्या विरोधात लढलो आहे. त्यामुळे राजकारणात या गोष्टी नव्या नाहीत. तरीही पक्षाच्या विरोधात जाऊन राजकारण कधीही केलेले नाही. विधानपरिषदेच्या निवडणुकीतही ते होणार नाही, असे विशाल पाटील म्हणाले. वाद मिटलेला आहे...आमदार आनंदराव पाटील म्हणाले की, पक्षांतर्गत वाद आता संपुष्टात आला आहे. शेखर माने यांचा उमेदवारी अर्ज तांत्रिक कारणाने राहिला आहे. लवकरच ते पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या बाजूने भूमिका स्पष्ट करतील, याची खात्री आहे. बंडखोरीचा प्रश्न उरलेला नाही. कॉँग्रेस एकसंधपणेच ही निवडणूक लढवेल. राष्ट्रवादीतच अधिक मतभेद आहेत. त्याचा फायदा कॉँग्रेसला मिळणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांची संख्या : १८असे आहे मतदानएकूण मतदान ५७०सातारा ३०४सांगली २६६महिला २८४पुरुष २८६रिंगणातील उमेदवार मोहनराव श्रीपती कदम (काँग्रेस), मोहनराव गुलाबराव कदम (अपक्ष), शेखर भगवानराव गोरे (राष्ट्रवादी), शेखर माने (काँग्रेस बंडखोर)माघार घेतलेले उमेदवारआ. प्रभाकर घार्गे (अपक्ष), अरुण लाड (अपक्ष), किशोर धुमाळ (अपक्ष), युवराज बावडेकर (भाजप)दुसरे मोहनराव कदमकोरेगाव तालुक्यातीलसातारा : विधान परिषदेसाठी उमेदवार म्हणून शेवटपर्यंत टिकून राहिलेले मोहनराव गुलाबराव कदम हे कोरेगाव तालुक्यातील देऊरचे आहेत. काँग्रेसचे उमेदवार मोहनराव श्रीपतराव कदम यांच्या नावाशी साधर्म्य असणारे देऊरचे कदम शिक्षक असून, अर्ज भरल्यापासून गावात कुणाला दिसलेच नसल्याची चर्चा सुरू झाली आहे. तसेच त्यांच्या मोबाईलवरही संपर्क होऊ शकत नाही. दरम्यान, त्यांनी सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज भरल्याचेही गावात कुणाला ठाऊक नव्हते. त्यांचा शोध घेत परजिल्ह्यातील कार्यकर्ते, नेते गावात आल्यानंतर मात्र हे उमेदवार असल्याचा साक्षात्कार गावकऱ्यांना झाला.