शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

पृथ्वीराज चव्हाणांसमोर भाजपचे तगडे आव्हान; पण तिरंगी लढतीवर अवलंबून

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2019 05:43 IST

पृथ्वीराज चव्हाण यांनी मागील निवडणुकीत तिरंगी लढतीत बाजी मारली असली तरी यावेळी भाजपकडून जोरदार लढत दिली जाण्याची शक्यता आहे.

- दीपक शिंदेसातारा : क-हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून पृथ्वीराज चव्हाण यांनी मागील निवडणुकीत तिरंगी लढतीत बाजी मारली असली तरी यावेळी भाजपकडून जोरदार लढत दिली जाण्याची शक्यता आहे. भाजपचे अतुल भोसले यांना महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ताकद दिल्यामुळे चव्हाण मतदारसंघातच अडकून पडण्याची शक्यता आहे.कºहाड दक्षिण मतदारसंघ आपल्याकडे राहावा, यासाठी चव्हाण यांनी चांगल्या पद्धतीने नियोजन केले आहे. मलकापूर नगरपालिका ताब्यात ठेवण्यात यश मिळविले. गत निवडणुकीत भाजपकडून लढलेल्या अतुल भोसले यांना पंढरपूर देवस्थान समितीच्या अध्यक्षपदी निवड करून राज्यपातळीवर काम करण्याची संधी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना विकासकामांसाठी निधी देऊन गेल्या पाच वर्षांपासून सतत ताकद देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर मतदारसंघात त्यांनी मोठे आव्हान निर्माण केले आहे. त्याबरोबरच आत्तापर्यंत काँग्रेस पक्षासोबत असलेले विलासराव पाटील-उंडाळकर यांचे पुत्र उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनीही यावेळी लढण्याचा निर्णय घेतला आहे.पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबतच त्यांनी मलकापूर नगरपालिका निवडणुकीत काम केले आहे. त्यामुळे यावेळी विधानसभेसाठी पृथ्वीराज चव्हाण यांनी थांबून काँग्रेसकडून आपल्याला संधी द्यावी, अशीत्यांची अपेक्षा आहे. रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून त्यांनी मतदारसंघात मोर्चेबांधणी केली आहे; पण, पृथ्वीराज चव्हाण काय निर्णय घेतात? यावर उंडाळकर यांना संधी मिळणार का? हे अवलंबून असेल.काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली नाही तरी ते अपक्ष म्हणून लढृू शकतात.>पाच वर्षांत काय घडले?मलकापूर नगरपालिका ही आपल्या ताब्यात असावी, यासाठी अतुल भोसले यांनी खूप प्रयत्न केले; पण पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पॅनेललाच या नगरपालिकेत यश मिळाले.पंचायत समिती उंडाळकर, बाळासाहेब पाटील यांच्या ताब्यात होती. ती अतुल भोसले यांनी घेण्याचा प्रयत्न केला; पण त्यामध्ये त्यांना यश आले नाही.शेती उत्पन्न बाजार समिती पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब पाटील यांच्या गटाकडे होती. ती उंडाळकरांनी पूर्ववत त्यांच्या ताब्यात घेतली.कºहाड जिल्हा करण्याचा प्रयत्न पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. नवी कार्यालये सुरू केली; पण त्यामध्ये त्यांना यश आले नाही.>निवडणूक २०१४पृथ्वीराज चव्हाण (काँग्रेस)७६,८३१ मतेविलासराव पाटील (अपक्ष - राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत)६०,४१३ मतेअतुल भोसले (भाजप)५८,६२१ मते>संभाव्य प्रतिस्पर्धीअतुल भोसले - भाजपउदयसिंह पाटील - अपक्ष>मुख्यमंत्री म्हणून मिळालेल्या संधीचे राज्यासह मतदारसंघाच्या विकास कामांकडे लक्ष दिले. अनेक सरकारी कार्यालये उभारली. अनेक प्रश्न मार्गी लावले. मात्र गेल्या पाच वर्षांत भाजप सरकारने केवळ घोषणाबाजी केली. लाखो युवकांना बेरोजगार केले.- पृथ्वीराज चव्हाण,माजी मुख्यमंत्री

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाण