शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

विरोधक एकत्र लढले तर भाजपचा पराभव : राहुल मखरे 

By नितीन काळेल | Updated: February 10, 2024 20:29 IST

सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत अ‍ॅड. मखरे बोलत होते.

सातारा : आताची लोकसभा निवडणूक ही भारतासाठी महत्वाची ठरणार आहे. यातूनच देशात लोकशाही राहणार की नाही हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे सर्व विरोधकांनी एकत्र येऊन निवडणूक लढली तर भाजप सत्तेवरच येणार नाही,’ असा दावा बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव अ‍ॅड. राहुल मखरे यांनी केला.

सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत अ‍ॅड. मखरे बोलत होते. बहुजन मुक्ती पार्टीची पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बैठक झाल्यानंतर ही पत्रकार परिषद झाली. यावेळी प्रदेशाध्यक्ष श्रीकांत होवाळ, प्रदेश सचिव तुषार मोतलिंग, अमोल लोंढे, आर. आर. पाटील, सागर सुतार आदी उपस्थित होते.

अ‍ॅड. मखरे म्हणाले, बहुजन मुक्ती पार्टीची देशातील ३२ राज्यात कार्यकर्त्यांची फळी आहे. आताच्या लोकसभा निवडणुकीच्यादृष्टीने साताऱ्यात बैठक झाली. या बैठकीत निवडणुकीच्या रणनितीवर चर्चा झाली. त्याचबरोबर आताची लोकसभा निवडणूक देशासाठी महत्वाची आहे. कारण, देशात जात-धर्माच्या नावाने विशिष्ट लोकांकडून द्वेष पसरविण्याचे काम सुरू आहे. त्यातच भाजपचे सरकार देशात आपली सत्ता येणार नाही म्हणून इडी आणि इतर शासकीय यंत्रणांचा वापर करत आहे. 

यासाठी आताच्या लोकसभा निवडणुकीत देशातील सर्व विरोधक एकत्र आलेतर भाजपच्या खासदारांची संख्या शंभरच्या आत येईल. त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीबाबत आताच सर्व्हे समोर आणले जात आहेत. ४०० हून अधिक जागा मिळणार म्हणून सांगितले जात आहे. कोणाला न विचारताच हे सर्व्हे होत आहेत. यातून लोकांची मानसिकता बदलण्याचे काम सुरू असल्याचे दिसत आहे. 

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपा