शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

विरोधक एकत्र लढले तर भाजपचा पराभव : राहुल मखरे 

By नितीन काळेल | Updated: February 10, 2024 20:29 IST

सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत अ‍ॅड. मखरे बोलत होते.

सातारा : आताची लोकसभा निवडणूक ही भारतासाठी महत्वाची ठरणार आहे. यातूनच देशात लोकशाही राहणार की नाही हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे सर्व विरोधकांनी एकत्र येऊन निवडणूक लढली तर भाजप सत्तेवरच येणार नाही,’ असा दावा बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव अ‍ॅड. राहुल मखरे यांनी केला.

सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत अ‍ॅड. मखरे बोलत होते. बहुजन मुक्ती पार्टीची पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बैठक झाल्यानंतर ही पत्रकार परिषद झाली. यावेळी प्रदेशाध्यक्ष श्रीकांत होवाळ, प्रदेश सचिव तुषार मोतलिंग, अमोल लोंढे, आर. आर. पाटील, सागर सुतार आदी उपस्थित होते.

अ‍ॅड. मखरे म्हणाले, बहुजन मुक्ती पार्टीची देशातील ३२ राज्यात कार्यकर्त्यांची फळी आहे. आताच्या लोकसभा निवडणुकीच्यादृष्टीने साताऱ्यात बैठक झाली. या बैठकीत निवडणुकीच्या रणनितीवर चर्चा झाली. त्याचबरोबर आताची लोकसभा निवडणूक देशासाठी महत्वाची आहे. कारण, देशात जात-धर्माच्या नावाने विशिष्ट लोकांकडून द्वेष पसरविण्याचे काम सुरू आहे. त्यातच भाजपचे सरकार देशात आपली सत्ता येणार नाही म्हणून इडी आणि इतर शासकीय यंत्रणांचा वापर करत आहे. 

यासाठी आताच्या लोकसभा निवडणुकीत देशातील सर्व विरोधक एकत्र आलेतर भाजपच्या खासदारांची संख्या शंभरच्या आत येईल. त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीबाबत आताच सर्व्हे समोर आणले जात आहेत. ४०० हून अधिक जागा मिळणार म्हणून सांगितले जात आहे. कोणाला न विचारताच हे सर्व्हे होत आहेत. यातून लोकांची मानसिकता बदलण्याचे काम सुरू असल्याचे दिसत आहे. 

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपा