शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मध्य रेल्वेची ठाणे ते सीएसएमटी दरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद
2
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
3
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
4
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
5
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
6
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
7
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
8
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
9
'हिंदुस्तान झिदाबाद...' तिरंग्यासाठी लंडनमध्ये पाकिस्तानींशी भिडल्या भारतीय तरुणी, पाहा VIDEO
10
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...
12
LIC ची मोठी घोषणा! बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी; विलंब शुल्कातही मोठी सूट
13
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
14
रोनाल्डोचा साखरपुडा आणि सौदीचे ‘रहस्य’! स्थानिकांना वेगळा नियम आणि स्टारला वेगळा न्याय, का?
15
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
16
चिपळुणात वाशिष्ठी नदीने ओलांडली इशारा पातळी; पूरसदृश स्थितीमुळे कामाशिवाय घराबाहेर न पडण्याची सूचना
17
"२६ जुलैचा जलप्रलय, तुम्ही मला...", वीणा जामकरने सांगितली ज्योती चांदेकरांची भावुक आठवण
18
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
19
Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
20
"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी

.. तर शिवसेनेच्या विरोधात भाजपही बोलेल

By admin | Updated: November 15, 2015 23:43 IST

माधव भंडारी : महापालिका निवडणुकीत गप्प बसलो असतो तर मतदारांमध्ये संभ्रम झाला असता..

फलटण : ‘बिहार राज्याच्या निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश मिळाले नसले, तरी तेथील निवडणूक निकालाचा परिणाम आगामी काळात होणाऱ्या पश्चिम बंगाल व उत्तर प्रदेशाच्या निवडणुकांवर होणार नाही. आगामी काळात राज्यातील प्रश्नांबाबत शिवसेना नेते काही बोलणार असतील तर आम्हीही विरोधात बोलू,’ असा इशारा भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी दिला. दरम्यान, यावेळी त्यांनी महापालिका निवडणुकीत गप्प बसलो असतो तर मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला असता असेही स्पष्ट केले. फलटण तालुक्यातील पिंप्रद येथे महाराष्ट्र युवक व्यसनमुक्त कार्यालय इमारतीच्या उद्घाटनानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ‘कोल्हापूर, कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणूक प्रचारात नागरी प्रश्न व विकासाच्या मुद्द्यावर भाजपचे नेते बोलत असताना शिवसेनेने आमच्यावर टीका केली. आम्हालाही ‘सौ सोनार की एक लोहार की’ याप्रमाणे बोलावे लागले. आम्ही गप्प बसलो असतो तर मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला असता, असे स्पष्ट करून ते म्हणाले, ‘शिवसेना मित्र आहे म्हणूनच आम्ही मर्यादा पाळत आहोत. मात्र, ते काही बोलणार असतील तर आम्हीही विरोधात बोलण्यास मागे राहणार नाही.’‘बिहार निवडणुकीचे परिणाम अन्य कुठल्याही राज्याच्या निवडणुकांवर होणार नाहीत. बिहारमध्ये अपेक्षित यश न मिळाल्याच्या निकालाने पक्षांतर्गत कोणतीही धुसफूस नसून, पंतप्रधान नरेंद्र मोदी व पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली भाजपची घोडदौड सुरूच राहणार आहे.’भाजपचे सरकार केंद्र व राज्यात आल्यापासून विकासकामांना गती आली आहे. सामान्यांच्या हिताची अनेक कामे करायची आहेत. अशा स्थितीत काही पक्ष अपप्रचार करीत आहेत, असे सांगून भंडारी म्हणाले, ‘काँग्रेस व डाव्यांना भाजपचे अस्तित्व मान्य नाही. राज्यात १९७२ पेक्षाही भीषण दुष्काळ पडला आहे. अशा स्थितीत सरकारने २४ टीएमसी पाणी वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. राज्य शासनाने तुरडाळीच्या साठ्यावर धाडी घालून कारवाई करून दरवाढीवर नियंत्रण मिळवले. मात्र २०१२-१३ मध्ये तूरडाळीचे भाव २१० रुपये प्रतिकिलो होते. तत्कालीन सरकारला त्या वेळी डाळीचे भाव कमी करता आले नाहीत.’ (प्रतिनिधी)पालखी मार्गाचे काम लवकरच...आळंदी-पंढरपूर पालखी मार्गाच्या रुंदीकरणाचे काम केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या आदेशानुसार लवकरच सुरू होणार आहे. पंढरपूर येथील वाळवंटाचा प्रश्न न्यायालयाच्या आधीन राहून भाजप सरकारनेच सोडविला आहे. आणखी दोन पाऊस झाल्यास राज्याचा चेहरामोहरा भाजप बदलून दाखवेल. त्याचबरोबर अच्छे दिन आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री व त्यांचे सहकारी विविध योजना प्रभावी राबविण्यासाठी आग्रही आहेत, असेही भंडारी यांनी सांगितले.