शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

Gram Panchayat Election: भाजपने दोन्ही पक्ष फोडले अन् मतदार जोडले

By दीपक शिंदे | Updated: November 8, 2023 16:52 IST

बुथ कमिट्या ठरताहेत महत्त्वाच्या

दीपक शिंदेसातारा : ‘तोडाफोडा आणि राज्य करा’ ही ब्रिटिशांची रणनीती होती. देशाच्या राजकारणात मात्र ही रणनीती चांगलीच रुजली आहे. आता गावागावातही याच रणनीतीचा वापर केला जात आहे. नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सातारा जिल्ह्यातही अशाच रणनीतीचा वापर करण्यात आला आहे, तर दुसऱ्या बाजूला भाजपला बुथ कमिट्यांनी साथ दिली आहे. गावपातळीवर लोकांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना मदत करत राहण्याच्या पद्धतीमुळे केवळ शहरी भागापुरता असलेला हा पक्ष आता ग्रामीण भागातही चांगला रुजू लागला आहे.सातारा जिल्हा हा सुरुवातीस काँग्रेस, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि आता भाजपकडे वाटचाल करू लागला आहे. एवढ्या कमी ग्रामपंचायतीवर असा निष्कर्ष काढता येणार नाही; पण भाजपची वाटचाल त्यादृष्टीने सुरू आहे. याची दखल इतर पक्षांनी घेतली पाहिजे. सातारा तालुक्यात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासारखा मातब्बर नेता भाजपच्या गळाला लागल्यामुळे सातारा आणि आजूबाजूच्या तालुक्यांमधील राजकारणच बदलले आहे. सध्या झालेल्या २९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत एकाही विरोधी गटाने काम केले नाही. त्यामुळे सर्वच्या सर्व ग्रामपंचायती या शिवेंद्रसिंहराजेंच्या गटाने ताब्यात घेतल्या. पर्यायाने त्या भाजपच्या ताब्यात आल्या. यापूर्वी काही गावांमध्ये शिवेंद्रसिंहराजे भोसले विरुद्ध खासदार उदयनराजे भोसले अशी पॅनल पडत होती. मात्र, खासदार उदयनराजेंनी ग्रामीण भागाकडे संपूर्ण दुर्लक्ष केल्यामुळे याठिकाणच्या लोकांना आता शिवेंद्रसिंहराजे यांच्याशिवाय पर्यायच राहिलेला नाही. त्यामुळे एका गावात दोन पॅनल पडले तरी दोन्ही पॅनल शिवेेद्रसिंहराजे यांच्याच गटाचे होते. त्यामुळे ‘जीत भी मेरी आणि पट भी मेरी’ अशीच स्थिती झाली.

पाटणमध्ये शंभूराज देसाई यांनीदेखील पाटणकर यांना पूर्णपणे मात देऊन २६ पैकी २० ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या. खरे तर शंभूराज देसाई यांच्यापेक्षा पाटणकर यांना सध्या काम करण्यास भरपूर संधी होती. मात्र, देसाई मंत्री असल्याने त्यांनी अगदी छोट्या वाड्या वस्त्यांपर्यंत निधी पोहोचविला. सत्तेचा पुरेपूर वापर करून त्यांनी अनेक ग्रामपंचायती सोबत जोडल्या आहेत. किमान पुढील विधानसभा निवडणुकीपर्यंत तरी या ग्रामपंचायती सोबत ठेवण्यात त्यांना नक्कीच यश येणार आहे. पाटणकर गटाला मात्र सत्तेपुढे आपले अस्तित्व टिकवून ठेवताना कसरत करावी लागणार आहे. त्यांच्याकडे फार कष्ट करण्याची तयारी दिसत नसल्याने ताब्यातील ग्रामपंचायतींमध्ये सत्तांतर होण्याचे प्रकार वाढत आहेत.कऱ्हाडमध्ये स्थानिक नेत्यांनी आपले वर्चस्व कायम राखले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक झालेल्या १२ पैकी आठ जागा आपल्याकडे राखल्या आहेत. काँग्रेसने ३ जागा मिळविल्या, तर भाजपला एकच जागा आपल्याकडे राखता आली आहे. याठिकाणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि भाजपचे डॉ. अतुल भोसले यांच्या पॅनलमध्ये लढत होती. या दोन्ही पॅनलनी विधानसभेच्या निवडणुकीसाठीच्या लढतीसारखीच लढत दिली. त्यामुळे दोघांसाठीही या गावची निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती.

वाई तालुक्यात आमदार मकरंद पाटील यांनी निवडणूक झालेल्या १६ ग्रामपंचायतींपैकी १२ ग्रामपंचायतींवर मकरंद पाटील यांनी वर्चस्व राखले आहे. मात्र, त्यांच्या ताब्यातील शहाबाग आणि वेळे या दोन महत्त्वाच्या ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात गेल्या आहेत. आमदार गटाला याचाही गांभीर्याने विचार करावा लागणार आहे.खटावमध्ये आमदार महेश शिंदे यांनी आपले वर्चस्व राखले आहे. त्याचवेळी कोरेगावमध्ये आमदार शशिकांत शिंदे यांनाही यश मिळाले आहे. त्यांनी ४ पैकी ३ ग्रामपंचायती आपल्याकडे राखल्या आहेत, तर फलटणमधील ४ जागांपैकी दोन जागा या राजेगटाने, तर दोन जागा या खासदार निंबाळकर गटाने मिळविल्या आहेत.

भाजपचे ग्रामीण भागात बस्तान

जिल्ह्यातील एकूणच परिस्थिती पाहता भाजपने ग्रामीण भागातही आपले बस्तान बसविण्यास सुरुवात केली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत साताऱ्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस याच दोन्ही पक्षांचा बोलबाला असायचा. शिवसेना थोडा फार प्रभाव टाकत असायची; पण अलीकडे भाजपने ग्रामीण भागावर अधिक लक्ष दिल्यामुळे ते ग्रामीण भागात आपले बस्तान बसवू लागले आहेत.बुथ कमिट्या ठरताहेत महत्त्वाच्याभाजपचा कार्यकर्ता सध्या बुथ कमिट्यांवर काम करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांसाठी सुरू केलेल्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचविणे आणि त्याचा लाभ त्यांना देण्याचे काम केले जात आहे. एकूण ४८ योजना आहेत. यापैकी एका तरी योजनेमध्ये ग्रामीण भागातील व्यक्ती सहभागी असतात. त्याचा लाभ देण्याचे काम केले जात आहे. कोणाला घरकुल, कोणाला किसान सन्मान, तर कोणाला कर्ज योजनेचा लाभ मिळवून दिल्याने भाजपचा जनाधार वाढत आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरgram panchayatग्राम पंचायतBJPभाजपाElectionनिवडणूक