शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
4
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
5
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
6
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
7
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
8
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
9
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
10
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
11
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
12
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
13
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
14
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
15
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
16
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
17
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
18
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
19
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
20
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात लवकरच मोठे प्रकल्प येतील, एकनाथ शिंदे यांचे आश्वासन

By दीपक शिंदे | Updated: October 31, 2022 22:18 IST

Eknath-Shinde : ‘राज्यातून अनेक मोठे प्रकल्प बाहेर जात असल्याबाबत विरोधकांकडून टीका होत आहे. मात्र, लवकरच राज्यात मोठे प्रकल्प आणले जातील. विरोधकांनी कितीही टीका केली तरी आम्ही त्याला कामाने उत्तर देऊ असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

- दीपक शिंदेसातारा - ‘राज्यातून अनेक मोठे प्रकल्प बाहेर जात असल्याबाबत विरोधकांकडून टीका होत आहे. मात्र, लवकरच राज्यात मोठे प्रकल्प आणले जातील. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि इतर विभागाच्या केंद्रीय मंत्र्यांसोबत बोलणी सुरु आहे. विरोधकांनी कितीही टीका केली तरी आम्ही त्याला कामाने उत्तर देऊ असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सातारा जिल्ह्यातील आपल्या मूळगावी दरे खुर्द येथे उत्तरेश्वर देवाचे दर्शन घेतले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. मुख्यमंत्री दोन दिवसांच्या सातारा दौऱ्यावर आले आहेत. दुपारी त्यांनी महाबळेश्वर येथे बैठक घेऊन जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावा घेतला. त्यानंतर ते सायंकाळी मूळगावी पोहचले.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, राज्यातील काही मोठे प्रकल्प बाहेर गेले यासाठी केवळ आमचे सरकार जबाबदार नाही. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर भूमिका मांडलेली आहे. त्यामुळे याबाबत मी फारसे बोलणार नाही. पण, लवकरच काही प्रकल्प राज्यात येतील. याठिकाणच्या लोकांसाठी रोजगार उपलब्ध करुन देणे, तरुणांच्या हाताला काम देणे यासाठी आमचे प्राधान्य आहे. त्यामुळे आम्ही आमच्या कामाने सर्व टीकांना उत्तरे देऊ. त्यांनी टीका करत राहायचे आणि आम्ही काम करत राहू असेही ते यावेळी म्हणाले.

अतिवृष्टीमुळे लोकांच्या हातात आलेले पीक वाया गेले आहे. याबाबत आम्हाला कल्पना आहे. त्यामुळे निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांनाही निकष बदलून भरपूर मदत करण्याचे काम हे सरकार करत आहे. यापूर्वी कधीही एवढी मदत मिळाली नव्हती तेवढी मदत देण्याचे काम आम्ही करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडविण्याचे काम हे सरकार करत असून त्यांच्याबाबत आम्हाला पूर्ण जाणीव आहे. त्यामुळे कोणीही काहीही म्हटले तरी आम्ही आमच्या कामापासून मागे हटणार नाही. हे सर्वसामान्य लोकांचे सरकार आहे हेच लक्षात ठेवून आमचे काम सुरु आहे.

राज्यातील बळीराजा आणि जनता सुखी राहू देमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या गावाजवळील उत्तरेश्वर या देवाची मनोभावे पूजा केल्यानंतर आपल्याला प्रसन्न वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी देवाकडे काय मागणी केली असे विचारले असता देवाकडे काही मागावे लागत नाही. त्याला सर्व कळते. तरीही या राज्यातील गोरगरीब जनता, बळीराजा सुखी राहू दे, त्यांच्या जीवनात आनंदाचे क्षण कायम येऊ देत अशी मागणी केल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेSatara areaसातारा परिसर