शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
6
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
7
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
8
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
9
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
10
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
11
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
12
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
13
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
14
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
15
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
16
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
17
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
18
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
19
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
20
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार

राज्यात लवकरच मोठे प्रकल्प येतील, एकनाथ शिंदे यांचे आश्वासन

By दीपक शिंदे | Updated: October 31, 2022 22:18 IST

Eknath-Shinde : ‘राज्यातून अनेक मोठे प्रकल्प बाहेर जात असल्याबाबत विरोधकांकडून टीका होत आहे. मात्र, लवकरच राज्यात मोठे प्रकल्प आणले जातील. विरोधकांनी कितीही टीका केली तरी आम्ही त्याला कामाने उत्तर देऊ असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

- दीपक शिंदेसातारा - ‘राज्यातून अनेक मोठे प्रकल्प बाहेर जात असल्याबाबत विरोधकांकडून टीका होत आहे. मात्र, लवकरच राज्यात मोठे प्रकल्प आणले जातील. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि इतर विभागाच्या केंद्रीय मंत्र्यांसोबत बोलणी सुरु आहे. विरोधकांनी कितीही टीका केली तरी आम्ही त्याला कामाने उत्तर देऊ असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सातारा जिल्ह्यातील आपल्या मूळगावी दरे खुर्द येथे उत्तरेश्वर देवाचे दर्शन घेतले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. मुख्यमंत्री दोन दिवसांच्या सातारा दौऱ्यावर आले आहेत. दुपारी त्यांनी महाबळेश्वर येथे बैठक घेऊन जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावा घेतला. त्यानंतर ते सायंकाळी मूळगावी पोहचले.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, राज्यातील काही मोठे प्रकल्प बाहेर गेले यासाठी केवळ आमचे सरकार जबाबदार नाही. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर भूमिका मांडलेली आहे. त्यामुळे याबाबत मी फारसे बोलणार नाही. पण, लवकरच काही प्रकल्प राज्यात येतील. याठिकाणच्या लोकांसाठी रोजगार उपलब्ध करुन देणे, तरुणांच्या हाताला काम देणे यासाठी आमचे प्राधान्य आहे. त्यामुळे आम्ही आमच्या कामाने सर्व टीकांना उत्तरे देऊ. त्यांनी टीका करत राहायचे आणि आम्ही काम करत राहू असेही ते यावेळी म्हणाले.

अतिवृष्टीमुळे लोकांच्या हातात आलेले पीक वाया गेले आहे. याबाबत आम्हाला कल्पना आहे. त्यामुळे निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांनाही निकष बदलून भरपूर मदत करण्याचे काम हे सरकार करत आहे. यापूर्वी कधीही एवढी मदत मिळाली नव्हती तेवढी मदत देण्याचे काम आम्ही करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडविण्याचे काम हे सरकार करत असून त्यांच्याबाबत आम्हाला पूर्ण जाणीव आहे. त्यामुळे कोणीही काहीही म्हटले तरी आम्ही आमच्या कामापासून मागे हटणार नाही. हे सर्वसामान्य लोकांचे सरकार आहे हेच लक्षात ठेवून आमचे काम सुरु आहे.

राज्यातील बळीराजा आणि जनता सुखी राहू देमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या गावाजवळील उत्तरेश्वर या देवाची मनोभावे पूजा केल्यानंतर आपल्याला प्रसन्न वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी देवाकडे काय मागणी केली असे विचारले असता देवाकडे काही मागावे लागत नाही. त्याला सर्व कळते. तरीही या राज्यातील गोरगरीब जनता, बळीराजा सुखी राहू दे, त्यांच्या जीवनात आनंदाचे क्षण कायम येऊ देत अशी मागणी केल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेSatara areaसातारा परिसर