शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

सायकल सवारी.. मायणी ते जगन्नाथपुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 21:49 IST

वाढत्या सुखसोयीमुळे सायकलचा प्रवास दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. परंतु आजही काही अवलिया सायकलचा वापर जाणीवपूर्वक करताना दिसत आहेत. यापैकीच एक असलेल्या सह्याद्री ट्रेकर्स ग्रुपच्या

ठळक मुद्देसह्याद्री ट्रेकर्समधील तरुणांसह वृध्द सदस्य करणार १६०० किलोमीटर अंतर पार

मायणी : वाढत्या सुखसोयीमुळे सायकलचा प्रवास दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. परंतु आजही काही अवलिया सायकलचा वापर जाणीवपूर्वक करताना दिसत आहेत. यापैकीच एक असलेल्या सह्याद्री ट्रेकर्स ग्रुपच्या नऊ जणांनी मायणीहून जगन्नाथपुरी (ओरिसा) हे १६०० किलोमीटर अंतराचा प्रवास सायकलवरून सुरू केला आहे. या प्रवासादरम्यान, ते ‘सायकल चालवा पर्यावरण वाचवा, इंधनाची बचत काळाची गरज, आरोग्यासाठी उत्तम व्यायाम, सायकल चालवा’ असा संदेश देत आहेत.

मायणी (ता. खटाव) येथील सह्याद्री ट्रेकर्स ग्रुपने गुरुवारी सकाळी मायणी येथून जगन्नाथपुरी येथे सायकलद्वारे प्रवास सुरू केला आहे. विजय वरुडे, शिवाजी कणसे, राजेंद्र आवळकर, अनिल कुलकर्णी, सुनील कुलकर्णी (सर्व रा. मायणी) अंबरिश जोशी (रा. किर्लोस्करवाडी ता. पलूस), मिलिंद कुलकर्णी (रा. मिरज, ता. मिरज), किशोर माने (रा. सांगली) व सागर माळवदे (रा. पुणे) हे नऊजण सह्याद्र्री ट्रेकर्स ग्रुपचे सदस्य या प्रवासात सहभागी झाले आहेत.

रखरखत्या उन्हात तळपत्या किरणांचे चटके सोसत त्यांनी हा प्रवास सुरू केला आहे. यामुळे त्यांचे कौतुक होत आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासाचे त्यांनी केलेले साहस अनेकांच्या डोक्यात अंजन घालणारे ठरले आहे. जगन्नाथपुरी प्रवासाला निघण्यापूर्वी त्यांनी पंढरपूर, तिरुपती बालाजी, गणपतीपुळे, नळदुर्ग आणि कन्याकुमारी असा सायकलने प्रवास केला आहे. त्यातून त्यांना प्रेरणा मिळाली. सायकल प्रवासाचा प्रचार झाला पाहिजे, या ध्येयाने प्रेरित होऊन त्यांनी दीर्घ पल्ल्याच्या प्रवासाला सुरुवात केली आहे.यासाठी त्यांना अनेकांनी मदतीचा हात दिला. प्रवासाला संकल्प केल्यानंतर परिसरातील अनेक मित्रपरिवाराने साथ दिली. यामुळे त्यांचा उत्साह दुणावला. यामुळे त्यांनी इतक्या मोठ्या प्रवासाला सुरुवात केली.मायणी ते जगन्नाथपुरी असा प्रवास मार्गमायणी येथील सात जण मंगळवेढा, सोलापूर, नळदुर्ग, उमरगा, भांगूर, हैद्राबाद, सूर्यापेठ, विजयवाडा, निडादवेल्लू, नाकापल्ली, राणास्थलम, हरीपूरम, मालुड, ब्रह्मगिरी व जगन्नाथपुरी असा १६५० किलोमीटरचा सायकलचा प्रवास करणार आहेत.एकेकाळी शहरातील रस्ते सायकलस्वारांनी गजबजल्याचे चित्र दिसून येत असे. मात्र, काळाच्या ओघात सायकली मागे पडल्या असून, इंधनावर चालणारी वाहने वाढली आहेत. यामुळे सायकली अडगळीत पडल्या असून, त्यांना प्रतिष्ठाप्राप्त करून देण्यासाठी सायकल प्रवास केला असल्याची माहिती सह्याद्री ट्रेकर्संनी दिली आहे.- शिवाजी कणसे

जगन्नाथपुरी प्रवासादरम्यान बेंगलोर -तेलंगणा मार्गावर घेतलेले छायाचित्र.

टॅग्स :bycycle rallyसायकल रॅलीSatara areaसातारा परिसर