शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

सायकल सवारी.. मायणी ते जगन्नाथपुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 21:49 IST

वाढत्या सुखसोयीमुळे सायकलचा प्रवास दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. परंतु आजही काही अवलिया सायकलचा वापर जाणीवपूर्वक करताना दिसत आहेत. यापैकीच एक असलेल्या सह्याद्री ट्रेकर्स ग्रुपच्या

ठळक मुद्देसह्याद्री ट्रेकर्समधील तरुणांसह वृध्द सदस्य करणार १६०० किलोमीटर अंतर पार

मायणी : वाढत्या सुखसोयीमुळे सायकलचा प्रवास दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. परंतु आजही काही अवलिया सायकलचा वापर जाणीवपूर्वक करताना दिसत आहेत. यापैकीच एक असलेल्या सह्याद्री ट्रेकर्स ग्रुपच्या नऊ जणांनी मायणीहून जगन्नाथपुरी (ओरिसा) हे १६०० किलोमीटर अंतराचा प्रवास सायकलवरून सुरू केला आहे. या प्रवासादरम्यान, ते ‘सायकल चालवा पर्यावरण वाचवा, इंधनाची बचत काळाची गरज, आरोग्यासाठी उत्तम व्यायाम, सायकल चालवा’ असा संदेश देत आहेत.

मायणी (ता. खटाव) येथील सह्याद्री ट्रेकर्स ग्रुपने गुरुवारी सकाळी मायणी येथून जगन्नाथपुरी येथे सायकलद्वारे प्रवास सुरू केला आहे. विजय वरुडे, शिवाजी कणसे, राजेंद्र आवळकर, अनिल कुलकर्णी, सुनील कुलकर्णी (सर्व रा. मायणी) अंबरिश जोशी (रा. किर्लोस्करवाडी ता. पलूस), मिलिंद कुलकर्णी (रा. मिरज, ता. मिरज), किशोर माने (रा. सांगली) व सागर माळवदे (रा. पुणे) हे नऊजण सह्याद्र्री ट्रेकर्स ग्रुपचे सदस्य या प्रवासात सहभागी झाले आहेत.

रखरखत्या उन्हात तळपत्या किरणांचे चटके सोसत त्यांनी हा प्रवास सुरू केला आहे. यामुळे त्यांचे कौतुक होत आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासाचे त्यांनी केलेले साहस अनेकांच्या डोक्यात अंजन घालणारे ठरले आहे. जगन्नाथपुरी प्रवासाला निघण्यापूर्वी त्यांनी पंढरपूर, तिरुपती बालाजी, गणपतीपुळे, नळदुर्ग आणि कन्याकुमारी असा सायकलने प्रवास केला आहे. त्यातून त्यांना प्रेरणा मिळाली. सायकल प्रवासाचा प्रचार झाला पाहिजे, या ध्येयाने प्रेरित होऊन त्यांनी दीर्घ पल्ल्याच्या प्रवासाला सुरुवात केली आहे.यासाठी त्यांना अनेकांनी मदतीचा हात दिला. प्रवासाला संकल्प केल्यानंतर परिसरातील अनेक मित्रपरिवाराने साथ दिली. यामुळे त्यांचा उत्साह दुणावला. यामुळे त्यांनी इतक्या मोठ्या प्रवासाला सुरुवात केली.मायणी ते जगन्नाथपुरी असा प्रवास मार्गमायणी येथील सात जण मंगळवेढा, सोलापूर, नळदुर्ग, उमरगा, भांगूर, हैद्राबाद, सूर्यापेठ, विजयवाडा, निडादवेल्लू, नाकापल्ली, राणास्थलम, हरीपूरम, मालुड, ब्रह्मगिरी व जगन्नाथपुरी असा १६५० किलोमीटरचा सायकलचा प्रवास करणार आहेत.एकेकाळी शहरातील रस्ते सायकलस्वारांनी गजबजल्याचे चित्र दिसून येत असे. मात्र, काळाच्या ओघात सायकली मागे पडल्या असून, इंधनावर चालणारी वाहने वाढली आहेत. यामुळे सायकली अडगळीत पडल्या असून, त्यांना प्रतिष्ठाप्राप्त करून देण्यासाठी सायकल प्रवास केला असल्याची माहिती सह्याद्री ट्रेकर्संनी दिली आहे.- शिवाजी कणसे

जगन्नाथपुरी प्रवासादरम्यान बेंगलोर -तेलंगणा मार्गावर घेतलेले छायाचित्र.

टॅग्स :bycycle rallyसायकल रॅलीSatara areaसातारा परिसर