शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

ऐतिहासिक, राजकीय नकाशांवर कोरलेले भुर्इंज!

By admin | Updated: March 5, 2016 00:07 IST

शौर्य-चातुर्याचा मिलाफ : मेंदू अन् मनगटाच्या ताकदीवर दृढविश्वास असलेली स्वामिनिष्ठ माणसं अर्थात ‘सीकेपी’

राहुल तांबोळी-- भुर्इंज -पुणे-बेंगलोर महामार्गावर वसलेलं भुर्इंज गाव आता प्रगतीच्या अनेक खुणा मोठ्या दिमाखाने मिरवत प्रगतीच्या दिशेने घोडदौड करत आहे. या प्रगतिमान वाटचालीत माजी कॅबिनेट मंत्री प्रतापराव भोसले यांचे योगदान मोलाचे आहे.प्रतापराव भोसले राजकारणात आले आणि या गावच्या प्रगतीचा खऱ्या अर्थाने श्रीगणेशा झाला. तत्पूर्वी या गावात कुठलीही बँक अथवा पोस्ट कार्यालयही नव्हते. आजमितीला या गावात राष्ट्रीयकृत, सहकारी बँका व पतसंस्थांची संख्या दहा झाली आहे. या सर्व बँका, पतसंस्थांमध्ये ठेवीची रक्कमच सुमारे दोनशे कोटींची आहे.ज्या-ज्या बँका, पतसंस्थांमध्ये लॉकर आहे, ते सर्व लॉकर वापरत आहेत. या एका घटनेवरून गावची समृद्धी अधोरेखित होते.गावात पिण्याच्या पाण्याची सोय मुबलक आहे. अपवाद वगळता सर्व ठिकाणी उत्तम रस्ते, सांडपाणी व्यवस्था आहे. ग्रामपंचायत असूनही कचऱ्याची विल्हेवाट घंटागाडीद्वारे लावली जाते. या गावची बाजारपेठही चांगलीच विस्तारली आहे. गावच्या लोकसंख्येने आता वीस हजारांचा टप्पा ओलांडला आहे. निकोप सामाजिक वातावरण आणि सामाजिक सलोखा तसेच मुबलक पाणी, दळणवळणाची सोय आदी कारणांमुळे या गावात स्थायिक होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या घडीला या गावात सुरू असणारे आठ गृहप्रकल्प हे त्याचे द्योतक आहे.संपूर्ण राज्यात एखाद्या वाडीची, उपनगराची लोकसंख्या ३५० झाली की स्वतंत्र ग्रामपंचायत होते. मात्र, भुर्इंज हे एकमेव गाव असे आहे की, या गावापासून तुटून आजतागायत एकही नवीन ग्रामपंचायत अस्तित्वात आली नाही. भुर्इंज ग्रामपंचायत आता ७५ वर्षांची झाली आहे. मात्र, या गावाचाच अविभाज्य भाग म्हणून बदेवाडी, मालदेववाडी, भिरडाचीवाडी, वारागडेवाडी, चिळणेवाडी, वरचे चाहूर, खालचे चाहूर आणि सर्व उपनगरे एकोप्याने नांदत आहेत.गावात दुचाकी-चारचाकींचे प्रमाण अधिक आहे. जेसीबी, ट्रॅक्टर यांचीही संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. गावातील शेतकऱ्यांची शेती पूर्णपणे बागायती असून, नगदी पिके येथे मोठ्या प्रमाणावर घेतली जाते.बारा वर्षांपूर्वी जेंव्हा किसन वीर कारखान्याची सूत्रे मदनदादा भोसले यांच्याकडे आली. तेव्हापासून भुर्इंजचे नाव औद्योगिक क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजत आहे. किसन वीर उद्योग समूहाच्या माध्यमातून गावातील शेकडोजणांना रोजगार तसेच ऊस वाहतुकीच्या माध्यमातून व्यवसाय उपलब्ध झाला आहे. किसन वीर कारखाना भुर्इंजमध्ये व्हावा आणि धोम धरणाची उभारणी या दोन्ही प्रकल्पांच्या उभारणीत प्रतापराव भोसले यांचे योगदान मोलाचे राहिले. त्यामुळेच या गावाचा चेहरामोहरा खऱ्या अर्थाने विकासाभिमुख झाला आहे. गावात मतभेद असले तरी मतभेद होऊ नयेत, याची खबरदारी गाव कारभाऱ्यांकडून घेतली जाते, तशी शिकवण इथल्या नेतृत्वाने दिली आहे. भोसले, जाधवराव कुटुंबीयांचे योगदान मोलाचेगावाला अध्यात्मिक वारसा उज्ज्वल आहे. भृगुऋषींची येथे समाधी आहे. सद्गुरू नारायण महाराज यांनी या समाधीचा जीर्णोद्धार ग्रामस्थांच्या सहकार्याने केला. ग्रामदैवत महालक्ष्मी मंदिर आणि घाट परिसर विकासाचे भलेमोठे काम येथे सुरू आहे. गावाला उज्ज्वल शैक्षणिक परंपरा लाभली असून, जाधवराव कुटुंबीयांनी दिलेल्या जागेतील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात आणि माजी आमदार मदन भोसले यांनी स्थापन केलेल्या महालक्ष्मी शिक्षण संस्थेत सुमारे ३,५०० विद्यार्थी शिकत आहेत.