शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

जलसंपदा मंत्र्यांची भीष्मप्रतिज्ञा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिहे-कठापूर उपसा सिंचन योजनेचे पाणी जुलै महिन्यात नेर तलावात नेण्याची भीष्मप्रतिज्ञा जलसंपदा मंत्री जयंत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : जिहे-कठापूर उपसा सिंचन योजनेचे पाणी जुलै महिन्यात नेर तलावात नेण्याची भीष्मप्रतिज्ञा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे. यानिमित्ताने माजी पालकमंत्री विजय शिवतारे यांची पुन्हा एकदा आठवण झाली. त्यांनीदेखील अशीच भीष्मप्रतिज्ञा केली होती. सत्तेच्या पाच वर्षांच्या काळात त्यांची ही प्रतिज्ञा पूर्ण झाली नाही. आता एका महिन्यात नेरमध्ये पाणी पडले तर शेतकऱ्यांच्या डोळ्यांचे पारणे फिटणार आहे.

कोरोना महामारीमुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. पुणे, मुंबई अशा महानगरांमध्ये उपजीविकेसाठी गेलेले लोक नोकरी गमावल्याने किंवा व्यवसाय बुडाल्याने गावी परतण्याच्या विचारात आहेत. खटाव, माण या दुष्काळी तालुक्यांमध्ये पाण्याची व्यवस्था नसल्याने हजारो हेक्टर क्षेत्र पडून ठेवावे लागते. या पार्श्वभूमीवर खटाव तालुक्यातील शेतकरी चंद्रकांत दडस यांनी थेट जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याशी समाजमाध्यमांद्वारे संवाद साधला. मला शेती करायला गावी यायचे आहे; परंतु नेर धरणामध्ये जिहे कटापूर योजनेचे पाणी आले तर निश्‍चितपणे आम्ही शेती करू शकतो, असे त्यांचे ट्विट होते. त्यावर मंत्री जयंत पाटील यांनी जुलै महिन्यात नेरमध्ये निश्चितपणे पाणी जाईल, असा विश्वास त्यांना दिला. या पार्श्वभूमीवर खटाव तालुक्यातील शेतकऱ्यांना जुलै, ऑगस्टपासून त्यांच्या शेतांमध्ये विविध प्रयोग करता येऊ शकतील अशी अपेक्षा आहे.

दुष्काळी माण-खटाव तालुक्यांतील २७ हजार ५०० हेक्टर शेती क्षेत्रासाठी वरदान ठरणारी जिहे-कठापूर उपसा सिंचन योजना २० वर्षांची झाली आहे. जिहे-कठापूर उपसा सिंचन योजनेला ११ फेब्रुवारी १९९७ साली प्रशासकीय मान्यता मिळाली. २६९.०७ कोटी रुपयांचा हा मूळ प्रकल्प निधीटंचाईच्या चक्रव्यूहात सापडल्याने ही योजना पूर्ण करण्यासाठी तब्बल ५९० कोटी रुपयांची आवश्यकता लागली आहे. या प्रकल्पासाठी ३३९.०७ कोटी रुपये खर्च केले गेले आहेत. अजूनही २५१ कोटी रुपयांचा निधी ही योजना पूर्ण करण्यासाठी लागणार आहे. या प्रकल्पाच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला असून, त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. मात्र, ६२ कोटी ४० लाख इतक्या मंजूर मात्र अखर्चिक निधीला मान्यता मिळाली असल्याने योजनेचे काम पुढे सुरू आहे.

चौकट... १

अशी आहे योजना

- कृष्णा नदीचे पाणी जिहे-कठापूर येथून उपसा करून वर्धनगड बोगद्यातून नेर तलावात सोडायचे.

- नेर तलावातून उपसा करून आंधळी बोगद्यामार्गे आंधळी तलावात पाणी सोडायचे.

- दुसऱ्या बाजूला नेर तलावातून येरळा नदीत पाणी सोडायचे.

- या नदीवर कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधले असल्याने खटाव तालुक्यातील ११ हजार ७०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणायचे. तिथून ते येरळवाडी धरणात सोडायचे.

- आंधळी तलावातील पाणी माण नदीत सोडून पुढे ते राणंद धरणात न्यायचे.

- पुढे म्हसवडमधून हे पाणी म्हसवड तलावात सोडले जाणार आहे. या माध्यमातून माण तालुक्यातील १५ हजार ८०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.

चौकट..२

कामाची सद्य:स्थिती

- कृष्णा नदीवरील कठापूर गावाजवळील बॅरेजचे काम ४५ टक्के पूर्ण

- पंपगृह १ चे काम सुरू असून ३५ टक्के, तर पंपगृह २ व ३ चे ९५ टक्के पूर्ण

- ऊर्ध्वगामी नलिकेचे १७.११ कि.मी.पैकी ११ कि.मी.चे काम पूर्ण

- वर्धनगड बोगद्याचे ९८ टक्के, तर आंधळी बोगद्याचे ७२ टक्के खोदकाम पूर्ण

- येरळा नदीवरील कोल्हापूर पद्धतीचे १५ बंधारे पूर्ण. माण नदीवरील १७ पैकी १६ बंधारे पूर्ण

- १३२ केव्ही मुख्य पारेषण वाहिनीच्या उभारणीकरिता सर्व साहित्य प्राप्त

- टॉवर उभारणीचे काम ५० टक्के पूर्ण

- पंपगृहाचा टप्पा २ व ३ चे पंप व मोटर कार्यक्षेत्रावर उपलब्ध