शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

जलसंपदा मंत्र्यांची भीष्मप्रतिज्ञा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिहे-कठापूर उपसा सिंचन योजनेचे पाणी जुलै महिन्यात नेर तलावात नेण्याची भीष्मप्रतिज्ञा जलसंपदा मंत्री जयंत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : जिहे-कठापूर उपसा सिंचन योजनेचे पाणी जुलै महिन्यात नेर तलावात नेण्याची भीष्मप्रतिज्ञा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे. यानिमित्ताने माजी पालकमंत्री विजय शिवतारे यांची पुन्हा एकदा आठवण झाली. त्यांनीदेखील अशीच भीष्मप्रतिज्ञा केली होती. सत्तेच्या पाच वर्षांच्या काळात त्यांची ही प्रतिज्ञा पूर्ण झाली नाही. आता एका महिन्यात नेरमध्ये पाणी पडले तर शेतकऱ्यांच्या डोळ्यांचे पारणे फिटणार आहे.

कोरोना महामारीमुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. पुणे, मुंबई अशा महानगरांमध्ये उपजीविकेसाठी गेलेले लोक नोकरी गमावल्याने किंवा व्यवसाय बुडाल्याने गावी परतण्याच्या विचारात आहेत. खटाव, माण या दुष्काळी तालुक्यांमध्ये पाण्याची व्यवस्था नसल्याने हजारो हेक्टर क्षेत्र पडून ठेवावे लागते. या पार्श्वभूमीवर खटाव तालुक्यातील शेतकरी चंद्रकांत दडस यांनी थेट जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याशी समाजमाध्यमांद्वारे संवाद साधला. मला शेती करायला गावी यायचे आहे; परंतु नेर धरणामध्ये जिहे कटापूर योजनेचे पाणी आले तर निश्‍चितपणे आम्ही शेती करू शकतो, असे त्यांचे ट्विट होते. त्यावर मंत्री जयंत पाटील यांनी जुलै महिन्यात नेरमध्ये निश्चितपणे पाणी जाईल, असा विश्वास त्यांना दिला. या पार्श्वभूमीवर खटाव तालुक्यातील शेतकऱ्यांना जुलै, ऑगस्टपासून त्यांच्या शेतांमध्ये विविध प्रयोग करता येऊ शकतील अशी अपेक्षा आहे.

दुष्काळी माण-खटाव तालुक्यांतील २७ हजार ५०० हेक्टर शेती क्षेत्रासाठी वरदान ठरणारी जिहे-कठापूर उपसा सिंचन योजना २० वर्षांची झाली आहे. जिहे-कठापूर उपसा सिंचन योजनेला ११ फेब्रुवारी १९९७ साली प्रशासकीय मान्यता मिळाली. २६९.०७ कोटी रुपयांचा हा मूळ प्रकल्प निधीटंचाईच्या चक्रव्यूहात सापडल्याने ही योजना पूर्ण करण्यासाठी तब्बल ५९० कोटी रुपयांची आवश्यकता लागली आहे. या प्रकल्पासाठी ३३९.०७ कोटी रुपये खर्च केले गेले आहेत. अजूनही २५१ कोटी रुपयांचा निधी ही योजना पूर्ण करण्यासाठी लागणार आहे. या प्रकल्पाच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला असून, त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. मात्र, ६२ कोटी ४० लाख इतक्या मंजूर मात्र अखर्चिक निधीला मान्यता मिळाली असल्याने योजनेचे काम पुढे सुरू आहे.

चौकट... १

अशी आहे योजना

- कृष्णा नदीचे पाणी जिहे-कठापूर येथून उपसा करून वर्धनगड बोगद्यातून नेर तलावात सोडायचे.

- नेर तलावातून उपसा करून आंधळी बोगद्यामार्गे आंधळी तलावात पाणी सोडायचे.

- दुसऱ्या बाजूला नेर तलावातून येरळा नदीत पाणी सोडायचे.

- या नदीवर कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधले असल्याने खटाव तालुक्यातील ११ हजार ७०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणायचे. तिथून ते येरळवाडी धरणात सोडायचे.

- आंधळी तलावातील पाणी माण नदीत सोडून पुढे ते राणंद धरणात न्यायचे.

- पुढे म्हसवडमधून हे पाणी म्हसवड तलावात सोडले जाणार आहे. या माध्यमातून माण तालुक्यातील १५ हजार ८०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.

चौकट..२

कामाची सद्य:स्थिती

- कृष्णा नदीवरील कठापूर गावाजवळील बॅरेजचे काम ४५ टक्के पूर्ण

- पंपगृह १ चे काम सुरू असून ३५ टक्के, तर पंपगृह २ व ३ चे ९५ टक्के पूर्ण

- ऊर्ध्वगामी नलिकेचे १७.११ कि.मी.पैकी ११ कि.मी.चे काम पूर्ण

- वर्धनगड बोगद्याचे ९८ टक्के, तर आंधळी बोगद्याचे ७२ टक्के खोदकाम पूर्ण

- येरळा नदीवरील कोल्हापूर पद्धतीचे १५ बंधारे पूर्ण. माण नदीवरील १७ पैकी १६ बंधारे पूर्ण

- १३२ केव्ही मुख्य पारेषण वाहिनीच्या उभारणीकरिता सर्व साहित्य प्राप्त

- टॉवर उभारणीचे काम ५० टक्के पूर्ण

- पंपगृहाचा टप्पा २ व ३ चे पंप व मोटर कार्यक्षेत्रावर उपलब्ध