शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

निष्ठावंत बाजूला अन् ‘भाव’ मात्र भलत्यांनाच!

By admin | Updated: May 26, 2015 00:55 IST

पंतांचा दौरा : ‘कमळ’ फुलविणारे मात्र सत्ताधाऱ्यांच्या बागेपासून दूर

सातारा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सातारा जिल्हा दौरा जनतेसाठी आशादायी ठरला असला तरी जिल्ह्यात ‘कमळ’ कसेबसे वाचविणारे या दौऱ्यात बाजूलाच राहिले आहेत. वेळ मागून व भेटायला जाऊनही मुख्यमंत्र्यांना या कार्यकर्त्यांशी संवाद साधता आलेला नाही. तर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षात आलेले व महायुतीच्या घटक पक्षातीलच यावेळी खऱ्याअर्थाने ‘भाव’ खाऊन गेले. खटाव तालुक्यातील रणजितसिंह देशमुख हे तर मुख्यमंत्र्यांबरोबरच अनेक ठिकाणी दिसले. शेखर गोरे प्रतिष्ठानने तर मुख्यमंत्र्यांचा सत्कार केला. तर जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार यांच्या घरी मुख्यमंत्र्यांनी स्नेहभोजन घेतले. हे बापू, भैया आणि भाऊच या दौऱ्यात अधिक ‘भाव’ खाऊन गेले, असेच म्हणावसे लागत असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. कोल्हापूर येथे भारतीय जनता पक्षाचे तीन दिवसीय अधिवेशन होते. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते. अधिवेशनानंतर त्यांनी सातारा जिल्ह्याच्या दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी दुष्काळी भागालाच प्राधान्य दिल्याचे दिसून आले. खटाव तालुक्यातील जाखणगाव येथे ‘जलयुक्त शिवार’ची तर माण तालुक्यात दहिवडी येथे जाऊन माणगंगा नदीची पाहणी केली. त्यानंतर सातारा येथे जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विषयांवर बैठक घेऊन विश्रामगृहावर मुक्काम केला. मुख्यमंत्री विश्रामगृहावर असाताना अनेकांना त्यांना भेटूही दिले नाही. मुख्यमंत्र्यांकडे भेटीसाठी नावे पाठविण्यात आली नाहीत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. ‘आम्ही अनेक वर्षे भाजपात आहे. पक्ष टिकवून ठेवला आहे. तरीही आम्हाला वेगळी वागणूक का? मुख्यमंत्र्यांनी आमच्या अडचणी समजून घ्यायला हव्या होत्या. संवाद साधायला पाहिजे होता; पण तसे काहीच घडले नाही. त्यामुळे पक्षात आमचे स्थान काय,’ असा सवालही निष्ठावंतानी तेथेच केला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यात निष्ठावंत खऱ्याअर्थाने बाजूलाच राहिले; पण इतरच ‘भाव’ खाऊन गेले, अशी कैफियतही त्यांनी मांडली. मुख्यमंत्र्यांच्या खटाव व माण तालुक्यांतील दौऱ्यात सध्या शिवसेनेत असलेले रणजितसिंह देशमुख हेच पुढे आल्याचे दिसून आले. कार्यक्रमात व दौऱ्यात ते मुख्यमंत्र्यांबरोबर होते. अनेक ठिकाणी त्यांची छबी पाहायला मिळाली. त्या तुलनेत भाजप पदाधिकाऱ्यांचे कोठेच अस्तित्व दिसून आले नाही. त्याचबरोबर सध्या राष्ट्रीय समाज पक्षात असणारे माण पंचायत समितीचे सदस्य शेखर गोरे यांच्या प्रतिष्ठानने दहिवडी येथे मुख्यमंत्र्यांचा काठी अन् घोंगडे देऊन सत्कार केला. तसेच साताऱ्यातील नियोजित कार्यक्रमानंतर रविवारी रात्रीच्या सुमारास मुख्यमंत्री फडणवीस सध्या भाजपवासी झालेले दीपक पवार यांच्या घरी स्नेहभोजनासाठी गेले होते. म्हणजे, एकूण दौऱ्यात भाजपमधील एकाही निष्ठावंतांचे दर्शन मुख्यमंत्र्यांबरोबर दिसून आले नाही. याची खंतही भाजपमधील अनेकजण व्यक्त करीत आहेत. (प्रतिनिधी)राजीनाम्याचा निर्णय मागे मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यावर भाजपमधील अनेक निष्ठावंत नाराज आहेत. मुख्यमंत्र्यांनी भेट दिली नाही, साधा संवादही साधला नाही, अशी खंत व्यक्त केली. सोमवारी तर भाजपच्या काही नाराज निष्ठावंतांनी आपली कैफियत उघड-उघड व्यक्त करताना पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. पण, ऐनवेळी वरिष्ठांकडून राजीनामा देण्याचे काही करू नका, असे सांगण्यात आले. त्यामुळे राजीनामा देण्याविषयी माघार घेण्यात आली.