शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणूक २०२५: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
2
'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
3
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
4
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
5
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
6
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
7
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
8
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
9
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
10
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
11
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
12
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
13
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
14
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
15
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
16
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
17
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
18
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
19
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
20
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा

निष्ठावंत बाजूला अन् ‘भाव’ मात्र भलत्यांनाच!

By admin | Updated: May 26, 2015 00:55 IST

पंतांचा दौरा : ‘कमळ’ फुलविणारे मात्र सत्ताधाऱ्यांच्या बागेपासून दूर

सातारा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सातारा जिल्हा दौरा जनतेसाठी आशादायी ठरला असला तरी जिल्ह्यात ‘कमळ’ कसेबसे वाचविणारे या दौऱ्यात बाजूलाच राहिले आहेत. वेळ मागून व भेटायला जाऊनही मुख्यमंत्र्यांना या कार्यकर्त्यांशी संवाद साधता आलेला नाही. तर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षात आलेले व महायुतीच्या घटक पक्षातीलच यावेळी खऱ्याअर्थाने ‘भाव’ खाऊन गेले. खटाव तालुक्यातील रणजितसिंह देशमुख हे तर मुख्यमंत्र्यांबरोबरच अनेक ठिकाणी दिसले. शेखर गोरे प्रतिष्ठानने तर मुख्यमंत्र्यांचा सत्कार केला. तर जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार यांच्या घरी मुख्यमंत्र्यांनी स्नेहभोजन घेतले. हे बापू, भैया आणि भाऊच या दौऱ्यात अधिक ‘भाव’ खाऊन गेले, असेच म्हणावसे लागत असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. कोल्हापूर येथे भारतीय जनता पक्षाचे तीन दिवसीय अधिवेशन होते. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते. अधिवेशनानंतर त्यांनी सातारा जिल्ह्याच्या दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी दुष्काळी भागालाच प्राधान्य दिल्याचे दिसून आले. खटाव तालुक्यातील जाखणगाव येथे ‘जलयुक्त शिवार’ची तर माण तालुक्यात दहिवडी येथे जाऊन माणगंगा नदीची पाहणी केली. त्यानंतर सातारा येथे जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विषयांवर बैठक घेऊन विश्रामगृहावर मुक्काम केला. मुख्यमंत्री विश्रामगृहावर असाताना अनेकांना त्यांना भेटूही दिले नाही. मुख्यमंत्र्यांकडे भेटीसाठी नावे पाठविण्यात आली नाहीत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. ‘आम्ही अनेक वर्षे भाजपात आहे. पक्ष टिकवून ठेवला आहे. तरीही आम्हाला वेगळी वागणूक का? मुख्यमंत्र्यांनी आमच्या अडचणी समजून घ्यायला हव्या होत्या. संवाद साधायला पाहिजे होता; पण तसे काहीच घडले नाही. त्यामुळे पक्षात आमचे स्थान काय,’ असा सवालही निष्ठावंतानी तेथेच केला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यात निष्ठावंत खऱ्याअर्थाने बाजूलाच राहिले; पण इतरच ‘भाव’ खाऊन गेले, अशी कैफियतही त्यांनी मांडली. मुख्यमंत्र्यांच्या खटाव व माण तालुक्यांतील दौऱ्यात सध्या शिवसेनेत असलेले रणजितसिंह देशमुख हेच पुढे आल्याचे दिसून आले. कार्यक्रमात व दौऱ्यात ते मुख्यमंत्र्यांबरोबर होते. अनेक ठिकाणी त्यांची छबी पाहायला मिळाली. त्या तुलनेत भाजप पदाधिकाऱ्यांचे कोठेच अस्तित्व दिसून आले नाही. त्याचबरोबर सध्या राष्ट्रीय समाज पक्षात असणारे माण पंचायत समितीचे सदस्य शेखर गोरे यांच्या प्रतिष्ठानने दहिवडी येथे मुख्यमंत्र्यांचा काठी अन् घोंगडे देऊन सत्कार केला. तसेच साताऱ्यातील नियोजित कार्यक्रमानंतर रविवारी रात्रीच्या सुमारास मुख्यमंत्री फडणवीस सध्या भाजपवासी झालेले दीपक पवार यांच्या घरी स्नेहभोजनासाठी गेले होते. म्हणजे, एकूण दौऱ्यात भाजपमधील एकाही निष्ठावंतांचे दर्शन मुख्यमंत्र्यांबरोबर दिसून आले नाही. याची खंतही भाजपमधील अनेकजण व्यक्त करीत आहेत. (प्रतिनिधी)राजीनाम्याचा निर्णय मागे मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यावर भाजपमधील अनेक निष्ठावंत नाराज आहेत. मुख्यमंत्र्यांनी भेट दिली नाही, साधा संवादही साधला नाही, अशी खंत व्यक्त केली. सोमवारी तर भाजपच्या काही नाराज निष्ठावंतांनी आपली कैफियत उघड-उघड व्यक्त करताना पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. पण, ऐनवेळी वरिष्ठांकडून राजीनामा देण्याचे काही करू नका, असे सांगण्यात आले. त्यामुळे राजीनामा देण्याविषयी माघार घेण्यात आली.