शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
5
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
6
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
7
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
8
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
9
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
10
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
11
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
12
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
13
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
14
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
15
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
16
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
17
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
18
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
19
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
20
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
Daily Top 2Weekly Top 5

कासच्या शिवारात घुमताहेत भलरीचे स्वर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:26 IST

पेट्री : कास परिसराच्या डोंगरमाथ्यावर भातलावणीस वेगाने सुरुवात झाली असून, शेतकरी डोक्यावर इरले, पोती, कागदाची टापूस बांधून मुसळधार पावसात ...

पेट्री : कास परिसराच्या डोंगरमाथ्यावर भातलावणीस वेगाने सुरुवात झाली असून, शेतकरी डोक्यावर इरले, पोती, कागदाची टापूस बांधून मुसळधार पावसात भाताची लावणी करण्यात व्यस्त आहेत. भाताच्या शिवारात ‘रामा हो रामा ..रामाच्या बागेमध्ये हो बागेमध्ये, पाऊस पडतो झिरमिरी-झिरमिरी.. माझ्या बंधूच्या शेतावरी, ध्यान मला रामाचं, ध्यान मला रामाचं.. मारुतीला रात्र झाली द्रोणागिरी जायाचं, शंकर म्हणे पार्वते.. कुणाला तू ओढीत होतीस, कुणाला तू सोडीत होतीस, वाईच्या डोंगरी गजबारल्या तोरणी..!अशा कित्येक पारंपरिक भलरी गीतांचे स्वर निनादत आहेत.

कास, बामणोली घाटमाथा परिसर असून, सह्याद्रीच्या पर्वतरांगांनी वेढलेला आहे. परिसरात पावसाचे प्रमाण अधिक असते. डोंगर उतारामुळे पावसाचे पाणी पूर्णपणे वाहून जाते. यामुळे जमिनीत कमी प्रमाणात पाणी मुरते. जमिनी लाल मातीच्या, मुरमाड असल्याने येथील शेतकरी मोठ्या प्रमाणावर भात, नाचणी, वरी पिके घेतात. या भागातील जमिनी निकृष्ट, डोंगरउताराच्या तसेच लालमातीच्या असल्याने पिके चांगली येण्यास खूप मशागत करावी लागते. शेतकरी डिसेंबर, जानेवारी महिन्यात ऐन, जांभूळ, उंबर अशा झाडांची कवळे बांधतात. होळी सणानंतर तरव्यांची भाजणी केली जाते. पावसाळ्याला सुरुवात होताच जून महिन्यात याच तरव्यांमध्ये भातांच्या बियाण्यांची पेरणी करून लावणीसाठी २१ ते ३० दिवसांपर्यंत रोपांची योग्य वाढ झाल्यानंतर पारंपरिक पद्धतीने औताच्या साह्याने भाताच्या वावरात चिखल करून त्यामध्ये तरव्यांतील भातांच्या रोपांची लावणी करण्यात येते.

डोक्यावर इरलीचा आधार घेऊन पोती, कागदाची टापूस बांधून मुसळधार पावसात शेतकरी भातलावणी करत आहेत. भातलावणी करत असताना करमणुकीसाठी व कामाचा कंटाळा येऊ नये, यासाठी तालावर भलरी गीते म्हणत आहेत. भातलावणीसाठी अनेकांची आवश्यकता असल्याने एकमेकांना मदत करत आहेत. त्यामुळे भल्या पहाटे सुरू होणारा बळीराजाचा दिवस संध्याकाळी सातपर्यंत शेतातच मावळत आहे.

चौकट

‘पैरा’ परस्परांना मदत करण्याची प्रथा

वस्तू अथवा पैशाचा कोणताही मोबदला न घेता भात लावणी करण्यासाठी अनेकजण एकमेकांच्या कामासाठी मदत करतात. यालाच परिसरात ‘पैरा’ म्हणतात. यामुळे कमी वेळात भातलावणी होण्यास मदत होते. सर्वांच्या भातलावण्या सुरू असल्याने औताला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.

(कोट)

संपूर्ण शेती पावसावर अवलंबून आहे. डोंगरमाथ्यावर वेळेत पाऊस पडल्याने बहुतांशी ठिकाणी भाताच्या पेरण्या झाल्या. सध्या रोपांची वाढ चांगल्याप्रकारे झाल्याने परिसरात भातलावणीच्या कामास वेग आला आहे. दोन-तीन आठवड्यांपर्यंत भातलावणी सुरू राहील. भातलावणी करताना आजही पारंपरिक भलरी गीते परिसरात अस्तित्व टिकवून आहेत. यामुळे कामाचा कोणताही ताण जाणवत नाही.

- ज्ञानेश्वर आखाडे, कुसुंबीमुरा, शेतकरी

१५पेट्री:

बऱ्याच दिवसांपासून पावसाने ओढ दिली होती. सध्या पावसाला सुरुवात झाल्याने भातलावणीस वेग आला आहे. (छाया : सागर चव्हाण)