शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्याचा स्मार्ट सिटीत समावेश करावा

By admin | Updated: May 26, 2015 00:54 IST

शिवेंद्रसिंहराजे भोसले : हद्दवाढ प्रस्तावाला तातडीने मंजुरी देण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

सातारा : ‘झपाट्याने विस्तार होत असलेल्या सातारा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सातारा शहराचा राज्य शासनाच्या ‘स्मार्ट सिटी’ योजनेत सहभाग करावा. सातारा शहराच्या हद्दवाढीच्या प्रस्तावाला तातडीने मंजुरी मिळावी, यासह सातारा पालिकेला वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत निधी मिळावा. वेणेखोल प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न तातडीने सोडवावा,’ अशी मागणी सातारा-जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री फडणवीस यांची आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी शासकीय विश्रामगृह येथे भेट घेतली. यावेळी पालकमंत्री विजय शिवतारे, नगराध्यक्ष सचिन सारस, नगरसेवक अविनाश कदम, अमोल मोहिते, जिल्हा परिषदेचे सदस्य राजू भोसले, रवी माने, जयंत राऊत आदी मान्यवर उपस्थित होते. आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सातारा-जावळी मतदारसंघाच्या वतीने आणि सातारकरांच्या वतीने मुख्यमंत्र्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले, तर मुख्यमंत्र्यांनीही सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आ. शिवेंद्रसिंहराजे यांचे कौतुक केले. यानंतर आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सातारा शहराच्या विकासासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. ‘सातारा शहराला ऐतिहासिक वारसा असून, निसर्ग संपन्नतेने नटलेल्या सातारा शहराच्या विस्तारात दिवसेंदिवस वाढ होत आहे. शहराच्या आजूबाजूला उपनगरांचा झालेला विस्तार आणि लोकसंख्या वाढीच्या मानाने सातारा नगर पालिकेच्या उत्पन्नात आवश्यक अशी वाढ होत नसल्याने नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा पुरविणे अडचणीचे ठरत आहे. सातारा शहरालगत अनेक पर्यटन स्थळे आहेत. विशेषत: जागतिक वारसा स्थळामध्ये नोंद झालेले कास पठार पाहण्यासाठी पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कास, ठोसेघर, अजिंक्यतारा किल्ला, सज्जनगड आदी पर्यटन व धार्मिक स्थळे, महामार्ग आदी तत्सम बाबी लक्षात घेता सातारा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सातारा शहराचा शासनाच्या ‘स्मार्ट सिटी’ योजनेत समावेश झाल्यास शहराच्या विकासाला चालना मिळेल. त्यामुळे सातारा शहराचा ‘स्मार्ट सिटी’ योजनेत समावेश करावा,’ अशी आग्रही मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. ‘सातारा पालिकेने हद्दवाढ प्रस्ताव योग्य त्या शिफारसींसह नगरविकास विभागाकडे सादर केलेला आहे. शहरालगतच्या हद्दवाढ क्षेत्रामध्ये नियोजनबद्धरीत्या नागरी सोयीसुविधा व नियंत्रित विकास होण्याच्या दृष्टीने हद्दवाढ प्रस्तावास मान्यता मिळण्यासाठी संबंधित विभागाची बैठक बोलावून प्रस्ताव मंजूर करावा,’ अशी मागणीही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. (प्रतिनिधी)म्हसवड येथील जमिनी लवकर मिळाव्यात...‘उरमोडी धरण प्रकल्पातील वेणेखोल, ता. सातारा या गावातील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन म्हसवड, ता. माण येथे १३९.५५ हेक्टर क्षेत्रावर करण्याचा निर्णय झाला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी, जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांच्यासमवेत अनेकदा बैठका झाल्या; मात्र पुनर्वसनाच्या प्रश्नाबाबत नेहमीच उडवाउडवीची उत्तर आणि टाळाटाळ केली जात आहे. उरमोडी धरणाचे काम पूर्ण झाले असून, पाणीसाठ्यास प्रारंभ झाला आहे. धरणाचे पाणी खटाव आणि माण तालुक्यांत पोहोचू लागले आहे. मात्र धरणासाठी स्वत:च्या जमिनी देणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना अद्यापही जमिनी मिळाल्या नाहीत. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाल्याने वेणेखोल ग्रामस्थांनी धरणस्थळावर आंदोलनही केले आहे. प्रकल्पग्रस्तांची ससेहोलपट थांबवण्यासाठी त्यांना म्हसवड येथील जमिनी तातडीने मिळण्याबाबत आपण योग्य ती कार्यवाही करावी,’ अशी मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.