शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
3
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
4
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
5
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
6
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
7
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
8
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
9
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
10
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
11
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
12
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
13
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
14
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
15
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
16
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
17
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
18
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
19
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
20
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार

साताऱ्याचा स्मार्ट सिटीत समावेश करावा

By admin | Updated: May 26, 2015 00:54 IST

शिवेंद्रसिंहराजे भोसले : हद्दवाढ प्रस्तावाला तातडीने मंजुरी देण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

सातारा : ‘झपाट्याने विस्तार होत असलेल्या सातारा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सातारा शहराचा राज्य शासनाच्या ‘स्मार्ट सिटी’ योजनेत सहभाग करावा. सातारा शहराच्या हद्दवाढीच्या प्रस्तावाला तातडीने मंजुरी मिळावी, यासह सातारा पालिकेला वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत निधी मिळावा. वेणेखोल प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न तातडीने सोडवावा,’ अशी मागणी सातारा-जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री फडणवीस यांची आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी शासकीय विश्रामगृह येथे भेट घेतली. यावेळी पालकमंत्री विजय शिवतारे, नगराध्यक्ष सचिन सारस, नगरसेवक अविनाश कदम, अमोल मोहिते, जिल्हा परिषदेचे सदस्य राजू भोसले, रवी माने, जयंत राऊत आदी मान्यवर उपस्थित होते. आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सातारा-जावळी मतदारसंघाच्या वतीने आणि सातारकरांच्या वतीने मुख्यमंत्र्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले, तर मुख्यमंत्र्यांनीही सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आ. शिवेंद्रसिंहराजे यांचे कौतुक केले. यानंतर आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सातारा शहराच्या विकासासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. ‘सातारा शहराला ऐतिहासिक वारसा असून, निसर्ग संपन्नतेने नटलेल्या सातारा शहराच्या विस्तारात दिवसेंदिवस वाढ होत आहे. शहराच्या आजूबाजूला उपनगरांचा झालेला विस्तार आणि लोकसंख्या वाढीच्या मानाने सातारा नगर पालिकेच्या उत्पन्नात आवश्यक अशी वाढ होत नसल्याने नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा पुरविणे अडचणीचे ठरत आहे. सातारा शहरालगत अनेक पर्यटन स्थळे आहेत. विशेषत: जागतिक वारसा स्थळामध्ये नोंद झालेले कास पठार पाहण्यासाठी पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कास, ठोसेघर, अजिंक्यतारा किल्ला, सज्जनगड आदी पर्यटन व धार्मिक स्थळे, महामार्ग आदी तत्सम बाबी लक्षात घेता सातारा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सातारा शहराचा शासनाच्या ‘स्मार्ट सिटी’ योजनेत समावेश झाल्यास शहराच्या विकासाला चालना मिळेल. त्यामुळे सातारा शहराचा ‘स्मार्ट सिटी’ योजनेत समावेश करावा,’ अशी आग्रही मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. ‘सातारा पालिकेने हद्दवाढ प्रस्ताव योग्य त्या शिफारसींसह नगरविकास विभागाकडे सादर केलेला आहे. शहरालगतच्या हद्दवाढ क्षेत्रामध्ये नियोजनबद्धरीत्या नागरी सोयीसुविधा व नियंत्रित विकास होण्याच्या दृष्टीने हद्दवाढ प्रस्तावास मान्यता मिळण्यासाठी संबंधित विभागाची बैठक बोलावून प्रस्ताव मंजूर करावा,’ अशी मागणीही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. (प्रतिनिधी)म्हसवड येथील जमिनी लवकर मिळाव्यात...‘उरमोडी धरण प्रकल्पातील वेणेखोल, ता. सातारा या गावातील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन म्हसवड, ता. माण येथे १३९.५५ हेक्टर क्षेत्रावर करण्याचा निर्णय झाला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी, जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांच्यासमवेत अनेकदा बैठका झाल्या; मात्र पुनर्वसनाच्या प्रश्नाबाबत नेहमीच उडवाउडवीची उत्तर आणि टाळाटाळ केली जात आहे. उरमोडी धरणाचे काम पूर्ण झाले असून, पाणीसाठ्यास प्रारंभ झाला आहे. धरणाचे पाणी खटाव आणि माण तालुक्यांत पोहोचू लागले आहे. मात्र धरणासाठी स्वत:च्या जमिनी देणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना अद्यापही जमिनी मिळाल्या नाहीत. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाल्याने वेणेखोल ग्रामस्थांनी धरणस्थळावर आंदोलनही केले आहे. प्रकल्पग्रस्तांची ससेहोलपट थांबवण्यासाठी त्यांना म्हसवड येथील जमिनी तातडीने मिळण्याबाबत आपण योग्य ती कार्यवाही करावी,’ अशी मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.