शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

‘कास’चा मृतसाठा सातारकरांचा आधार

By admin | Updated: July 12, 2014 23:48 IST

पाणीकपात वाढणार : पाण्याचा अपव्यय टाळण्याची गरज

सातारा : कास तलाव भरण्यासाठी आवश्यक असणारा जोरदार पाऊस अद्याप झालेला नाही. सध्या तुरळक प्रमाणात पावसाने हजेरी लावली असली तरी ती पुरेशी नाही. त्यामुळे तलावातील मृत साठ्याचा आधार घ्यावा लागत आहे. भीषण पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांनी शहरातील ठिकठिकाणच्या सात जलवाहिन्या पूर्णपणे बंद केल्या.जिल्ह्यातील बऱ्याचशा नगरपालिकांना पाणीपुरवठ्याच्या समस्येने ग्रासले आहे. बऱ्याच ठिकाणी दिवसाआड किंवा चार दिवसांतून एकदा असा पाणीपुरवठा केला जात आहे. पाणी कपातीसंदर्भात साताऱ्यातील चित्र वेगळे आहे. गेल्यावर्षी जुलै महिन्यात दुथडी भरून वाहणाऱ्या कास तलावाने यावर्षी मात्र तळ गाठला आहे. अपेक्षित प्रमाणात पाऊस न पडल्याने तलावातील पाणीपातळीत फारशी वाढ झाली नाही. पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने वाहून जाणारे पाणी इंजिनच्या साह्याने पुन्हा तलाव पाटात टाकल्याने पाणीकपात उशिरा झाली सध्याही असेच प्रयत्न सुरू असल्याने दिलासा मिळाला आहे. मात्र, तलावात पाणीसाठा कमी असल्याने त्यावरही मर्यादा आल्या.दोनवेळा करण्यात येणारा पाणीपुरवठा एकवेळ करण्याचा निर्णय झाला आहे. तरीही भीषण पाणीटंचाईचे संकट आ वासून समोर असल्याने कास तलावातील मृत पाणीसाठा उचलण्याचा विचार पाणीपुरवठा विभाग करत आहे. सध्या कास तलावात एकूण साडेपाच फूट पाणीसाठा शिल्लक आहे. ४ फुटापर्यंतचे पाणी जॅकवेलपर्यंत पोहोचते. पावसाने जोरदार सुरुवात केल्यास पाणी टंचाईची भीती राहणार नाही. (प्रतिनिधी)