शहरं
Join us  
Trending Stories
1
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
2
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
3
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
4
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
5
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
6
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
7
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
8
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?
9
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
10
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
11
एरोड्रोम परवान्याने अडविले नवी मुंबईतील विमानोड्डाण; सप्टेंबरचा मुहूर्तही हुकणार?
12
'झुरळे गोपीनाथ' मंदिर ! ३०० वर्षांपूर्वीच्या मंदिरात झुरळांच्या रूपात गोपिकांचा वास
13
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
14
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
15
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी
16
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
17
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
18
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
19
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
20
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका

‘कास’चा मृतसाठा सातारकरांचा आधार

By admin | Updated: July 12, 2014 23:48 IST

पाणीकपात वाढणार : पाण्याचा अपव्यय टाळण्याची गरज

सातारा : कास तलाव भरण्यासाठी आवश्यक असणारा जोरदार पाऊस अद्याप झालेला नाही. सध्या तुरळक प्रमाणात पावसाने हजेरी लावली असली तरी ती पुरेशी नाही. त्यामुळे तलावातील मृत साठ्याचा आधार घ्यावा लागत आहे. भीषण पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांनी शहरातील ठिकठिकाणच्या सात जलवाहिन्या पूर्णपणे बंद केल्या.जिल्ह्यातील बऱ्याचशा नगरपालिकांना पाणीपुरवठ्याच्या समस्येने ग्रासले आहे. बऱ्याच ठिकाणी दिवसाआड किंवा चार दिवसांतून एकदा असा पाणीपुरवठा केला जात आहे. पाणी कपातीसंदर्भात साताऱ्यातील चित्र वेगळे आहे. गेल्यावर्षी जुलै महिन्यात दुथडी भरून वाहणाऱ्या कास तलावाने यावर्षी मात्र तळ गाठला आहे. अपेक्षित प्रमाणात पाऊस न पडल्याने तलावातील पाणीपातळीत फारशी वाढ झाली नाही. पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने वाहून जाणारे पाणी इंजिनच्या साह्याने पुन्हा तलाव पाटात टाकल्याने पाणीकपात उशिरा झाली सध्याही असेच प्रयत्न सुरू असल्याने दिलासा मिळाला आहे. मात्र, तलावात पाणीसाठा कमी असल्याने त्यावरही मर्यादा आल्या.दोनवेळा करण्यात येणारा पाणीपुरवठा एकवेळ करण्याचा निर्णय झाला आहे. तरीही भीषण पाणीटंचाईचे संकट आ वासून समोर असल्याने कास तलावातील मृत पाणीसाठा उचलण्याचा विचार पाणीपुरवठा विभाग करत आहे. सध्या कास तलावात एकूण साडेपाच फूट पाणीसाठा शिल्लक आहे. ४ फुटापर्यंतचे पाणी जॅकवेलपर्यंत पोहोचते. पावसाने जोरदार सुरुवात केल्यास पाणी टंचाईची भीती राहणार नाही. (प्रतिनिधी)