शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
Yuzvendra Chahal Hat Trick : आधी धोनीची विकेट; मग चहलनं साधला IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकचा डाव
4
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
5
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
6
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
7
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
8
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
11
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
12
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
13
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
14
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
15
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
16
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
17
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
18
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
19
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
20
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत

डासांना घालवण्यासाठी अंगणात तुळस, पुदीना अन् झेंडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वडूज : वातावरणात बदल झाल्याने डेंग्यू रुग्णांची संख्या वाढत आहे. पावसाळ्यात डासांचे प्रमाण वाढल्याने त्रास होऊन ...

लोकमत न्यूज नेटवर्क

वडूज : वातावरणात बदल झाल्याने डेंग्यू रुग्णांची संख्या वाढत आहे. पावसाळ्यात डासांचे प्रमाण वाढल्याने त्रास होऊन ताप येऊन रुग्ण संख्येत वाढ होत आहे. या काळात डेंग्यू, चिकनगुनिया व मलेरियासारखे आजार डासांमुळे उद्भवतात. काहीही करून डास पळाले पाहिजेत, यासाठी अनेक उपाययोजना लोकांमधून होत असल्याचे दिसून येत आहे.

या काळात आजारांपासून लांब राहण्यासाठी चांगला पर्याय म्हणजे डासांना घरात येऊ न देणे. कॉइल, मॅट, रिपेलेंटस किंवा लिक्विड आदींचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातोय. यातून निघणाऱ्या विषारी धुरामुळे अनेकांना श्वसनाचे विकार सुरू झाले आहेत. अशा परिस्थितीत काही घरगुती उपाय फायदेशीर ठरतात. तुळस, पुदीना, झेंडू आदी आपल्या अंगणात लावल्यास डासांपासून मुक्ती मिळते, असे जाणकारांचे मत आहे.

खोबरेल तेल व कडूनिंबाचे तेल एकत्र करून लावल्यास डासांपासून संभाव्य होणारे आजार टाळता येतात. लिंबाचं आणि निलगिरी तेलाचे मिश्रण अंगावर लावल्यास शरीर निरोगी राहते. कापूर जाळल्याने जास्त फायदा होतो, तसेच कडूनिंबाचे तेल व कापूर यांचे मिश्रण करून स्प्रे रात्री झोपण्यापूर्वी घरभर फवारल्यास डास घरातून पळून जातील. लसणाच्या पाकळ्या पाण्यात टाकून चांगल्या उकळल्यावर हे पाणी घरात शिंपडल्यास लसणाच्या तिखट वासाने घरात डास थांबत नाहीत. सरसोच्या तेलात ओव्याची पूड मिसळून दिवा लावल्यास डास दूर पळतात. सध्या अशाप्रकारचे घरगुती उपाय घरोघरी सुरू झाले आहेत.

प्रतिक्रिया

वास्तविक डास हे साचलेल्या गोड्या पाण्यावरच तयार होत असतात. निसर्गालाही हानिकारक ठरत असलेल्या ‘वापरा आणि फेका’ या ग्लासांमुळे डासांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. काही वनस्पतींच्या पानांचा, तेलाचा अथवा सुगंधाचा वापर झाल्यास डास मानवाजवळ येत नाहीत. यामध्ये प्रामुख्याने तुळस, कडूनिंब, निरगुडी, झेंडूसह आदी वनस्पतींची लागवड आरोग्याला पोषक वातावरण तयार करते, तसेच गप्पी मासे यांचे प्रमुख अन्न डासांची अंडी असल्याने त्या डासांची उत्पत्ती होत नाही. वनस्पतीसह गप्पी मासे या डासांवर तात्पुरते उपाय आहेत.

- प्रा. सोहन मोहळकर,

वनस्पतीशास्त्र.