शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

सत्तेचा दुरुपयोग करून बारामतीला पाणी...

By admin | Updated: May 18, 2015 00:57 IST

विजय शिवतारे : पाणी वाटप बैठकीत योग्य निर्णय घेणार

फलटण : नीरा-देवघरचे पाणी बारामतीला सत्तेचा दुरुपयोग करून पळविले गेले आहे, याचे पाणीवाटपही चुकीचे झाले आहे. पाणीवाटपाच्या बैठकीत यासंदर्भात योग्य तो व कोणावर अन्याय होणार नाही, असा निर्णय घेऊ. तसेच जिल्ह्यातील रखडलेले पाणीप्रकल्प पूर्ण करण्यासाठी अनुशेषाची अडचण येत असली तरी त्यातून मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत,’ असे जलसंपदामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री विजय शिवतारे यांनी सांगितले. ‘जलयुक्त शिवार’ या राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत फलटण तालुक्यातील गिरवी व मिरगाव गावांतील इनाम पाझर तलाव दुरुस्ती व माती नालाबांधाची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री शिवतारे आले होते. त्यावेळी विश्रामगृहात ते पत्रकारांशी बोलत होते. मतदारसंघात गेल्या पाच वर्षांत जलसंधारणासंदर्भात लोकसहभागातून मोठ्या प्रमाणात मी कामे केली आहेत. ही कामे सर्वत्र व्हावी, या हेतूने राज्य शासनाने ‘जलयुक्त शिवार’ योजना राबविली. या योजनेची सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात चांगल्या दर्जाची कामे व्हावीत. यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ही योजना जिल्ह्यात यशस्वी करून महाराष्ट्रात हा जिल्हा सर्वप्रथम आणण्याचा आपला निर्धार आहे. गावाच्या विकासात लोकसहभाग वाढणे गरजेचा असून, गिरवी व मिरगाव येथील कामे चांगली दर्जाची झाली असल्याचे गौरवोद्गारही पालकमंत्री यांनी काढले. मिरगाव येथे धोम-बलकवडीच्या आलेल्या पाण्याची पूजनही आपण केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ही कामे दुष्काळी भागात कमी सुरू असल्याचा प्रश्न उपस्थित होताच जेथे जागा मिळेल तिथे कामे सुरू करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. दुष्काळी फलटण, माण, खटाव तालुक्यांत याची व्याप्ती वाढविण्यात येईल, असे स्पष्ट करतानाच फलटण तालुक्यातील धुमाळवाडी येथील तलावाचे काम सुरू करण्याचे आदेश आपण दिले आहेत. लोकसहभाग व सिद्धिविनायक ट्रस्टचा जो १ कोटीचा निधी जिल्ह्याला मिळाला आहे. त्यातील काही निधी वापरून काम पूर्ण करू, असे त्यांनी स्पष्ट केले. नीरा-देवघरचे बारामतीला जाणारे पाणी थांबविण्याच्या सूचना दोन महिन्यांपूर्वी आपण पत्रकार परिषदेत देऊनही पाणी जात असल्याचे निदर्शनास आणून देत सत्तेचा दुरुपयोग करून हे पाणी बारामतीला गेले आहे. मुळातच बारामतीला ६० टक्के पाणी देण्याचा व इतर तालुक्यांना ४० टक्के पाणी देण्याचा निर्णय चुकीचा आहे. यासंदर्भात पाणी वाटपाची बैठक झालेली नाही. त्यामुळे ठोस निर्णय घेता येत नसला तरी बैठक झाल्यावर दुष्काळी भागावर अन्याय होणार नाही. अशा पद्धतीने निर्णय घेऊ. कालव्यांची कामे होत नाहीत, तोपर्यंत बारामतीला पाणी देणे हा पूर्वी घेतलेला निर्णयही राजकीय हेतूने प्रेरित आहे. सर्व गोष्टींची सखोल चौकशी करू, असेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील रखडलेल्या पाणी प्रश्नासंदर्भात बोलताना ते म्हणाले, ‘अनुशेषामुळे निधीबाबत अडचणी येत आहेत. तरीसुद्धा त्यातून मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू आहे. जे प्रकल्प अंतिम टप्प्यात व तातडीने पूर्ण होणे गरजेचे आहे, त्यांना प्राधान्याने निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. रखडलेले पाटबंधारे प्रकल्प आम्हीच पूर्ण करू, अशी ग्वाहीही शिवतारे यांनी दिली. (प्रतिनिधी)