शहरं
Join us  
Trending Stories
1
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
2
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
3
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
4
१७ वर्षीय आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; पण फिफ्टी आड आला माफाका
5
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
6
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
7
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
8
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
9
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
10
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
11
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
12
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
13
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
14
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
15
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
16
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
17
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
18
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
19
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
20
"हे खूपच धक्कादायक..."; मॉर्फ केलेले फोटो, खोट्या बातम्या पाहून प्रिती झिंटा भडकली, म्हणाली...

सत्तेचा दुरुपयोग करून बारामतीला पाणी...

By admin | Updated: May 18, 2015 00:57 IST

विजय शिवतारे : पाणी वाटप बैठकीत योग्य निर्णय घेणार

फलटण : नीरा-देवघरचे पाणी बारामतीला सत्तेचा दुरुपयोग करून पळविले गेले आहे, याचे पाणीवाटपही चुकीचे झाले आहे. पाणीवाटपाच्या बैठकीत यासंदर्भात योग्य तो व कोणावर अन्याय होणार नाही, असा निर्णय घेऊ. तसेच जिल्ह्यातील रखडलेले पाणीप्रकल्प पूर्ण करण्यासाठी अनुशेषाची अडचण येत असली तरी त्यातून मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत,’ असे जलसंपदामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री विजय शिवतारे यांनी सांगितले. ‘जलयुक्त शिवार’ या राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत फलटण तालुक्यातील गिरवी व मिरगाव गावांतील इनाम पाझर तलाव दुरुस्ती व माती नालाबांधाची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री शिवतारे आले होते. त्यावेळी विश्रामगृहात ते पत्रकारांशी बोलत होते. मतदारसंघात गेल्या पाच वर्षांत जलसंधारणासंदर्भात लोकसहभागातून मोठ्या प्रमाणात मी कामे केली आहेत. ही कामे सर्वत्र व्हावी, या हेतूने राज्य शासनाने ‘जलयुक्त शिवार’ योजना राबविली. या योजनेची सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात चांगल्या दर्जाची कामे व्हावीत. यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ही योजना जिल्ह्यात यशस्वी करून महाराष्ट्रात हा जिल्हा सर्वप्रथम आणण्याचा आपला निर्धार आहे. गावाच्या विकासात लोकसहभाग वाढणे गरजेचा असून, गिरवी व मिरगाव येथील कामे चांगली दर्जाची झाली असल्याचे गौरवोद्गारही पालकमंत्री यांनी काढले. मिरगाव येथे धोम-बलकवडीच्या आलेल्या पाण्याची पूजनही आपण केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ही कामे दुष्काळी भागात कमी सुरू असल्याचा प्रश्न उपस्थित होताच जेथे जागा मिळेल तिथे कामे सुरू करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. दुष्काळी फलटण, माण, खटाव तालुक्यांत याची व्याप्ती वाढविण्यात येईल, असे स्पष्ट करतानाच फलटण तालुक्यातील धुमाळवाडी येथील तलावाचे काम सुरू करण्याचे आदेश आपण दिले आहेत. लोकसहभाग व सिद्धिविनायक ट्रस्टचा जो १ कोटीचा निधी जिल्ह्याला मिळाला आहे. त्यातील काही निधी वापरून काम पूर्ण करू, असे त्यांनी स्पष्ट केले. नीरा-देवघरचे बारामतीला जाणारे पाणी थांबविण्याच्या सूचना दोन महिन्यांपूर्वी आपण पत्रकार परिषदेत देऊनही पाणी जात असल्याचे निदर्शनास आणून देत सत्तेचा दुरुपयोग करून हे पाणी बारामतीला गेले आहे. मुळातच बारामतीला ६० टक्के पाणी देण्याचा व इतर तालुक्यांना ४० टक्के पाणी देण्याचा निर्णय चुकीचा आहे. यासंदर्भात पाणी वाटपाची बैठक झालेली नाही. त्यामुळे ठोस निर्णय घेता येत नसला तरी बैठक झाल्यावर दुष्काळी भागावर अन्याय होणार नाही. अशा पद्धतीने निर्णय घेऊ. कालव्यांची कामे होत नाहीत, तोपर्यंत बारामतीला पाणी देणे हा पूर्वी घेतलेला निर्णयही राजकीय हेतूने प्रेरित आहे. सर्व गोष्टींची सखोल चौकशी करू, असेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील रखडलेल्या पाणी प्रश्नासंदर्भात बोलताना ते म्हणाले, ‘अनुशेषामुळे निधीबाबत अडचणी येत आहेत. तरीसुद्धा त्यातून मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू आहे. जे प्रकल्प अंतिम टप्प्यात व तातडीने पूर्ण होणे गरजेचे आहे, त्यांना प्राधान्याने निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. रखडलेले पाटबंधारे प्रकल्प आम्हीच पूर्ण करू, अशी ग्वाहीही शिवतारे यांनी दिली. (प्रतिनिधी)