शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

बँका, पतसंस्थांना मिळणार पोलीस संरक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 21:25 IST

‘नागरी बँका व पतसंस्थांना वसुलीकामी आता पोलीस संरक्षण मिळणार आहे. त्याबाबतचे परिपत्रक शासनाने २९ जानेवारी रोजी काढले आहे,’ अशी माहिती सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांनी दिली. येथील शासकीय

ठळक मुद्देबंदोबस्त पुरविण्याबाबत २९ जानेवारी रोजी शासनाने परिपत्रक जारी केले आहे

कºहाड : ‘नागरी बँका व पतसंस्थांना वसुलीकामी आता पोलीस संरक्षण मिळणार आहे. त्याबाबतचे परिपत्रक शासनाने २९ जानेवारी रोजी काढले आहे,’ अशी माहिती सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांनी दिली. येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शेखर चरेगावकर म्हणाले, ‘नागरी बँका व पतसंस्थांमध्ये कर्ज वितरण केल्यावर काही खाती थकीत जातात.

या खात्यांवर विविध कायद्यांतर्गत संबंधित सहकारी संस्था कर्जदाराविरुद्ध वसुली दावे दाखल करतात. वसुलीचे दाखले संबंधित बँक अथवा पतसंस्थांना प्राप्त झाल्यानंतर प्रत्यक्ष तारण मिळकतीची जप्ती व विक्री करीत असताना बऱ्याचवेळा कर्जदारांकडून अडचणी निर्माण केल्या जातात. आणि वसुली प्रक्रियेमध्ये दिरंगाई होते. यावर उपाय म्हणून सहकारी संस्थांनी सहकार खाते, गृहखाते यांच्याकडे वेळोवेळी वसुलीदरम्यान पोलीस संरक्षण देण्याची कार्यवाही करावी, अशी विनंती केली होती.’

सहकार भारती या सहकार क्षेत्रात काम करणाºया विश्वस्त संस्थेने तसेच बँक्स् व पतसंस्थांचे फेडरेशन्स असोसिएशन्स यांनीही विविध अधिवेशनांच्या, निवेदनांच्या माध्यमातून राज्य सहकार परिषदेकडे याबाबत मागणी केली होती. डोंबिवली नागरी सहकारी बँकेनेही शासनाच्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या सर्वांचा परिणाम म्हणून सरफेसी अ‍ॅक्ट २००२ मध्ये सेक्शन १४ अंतर्गत बँका व पतसंस्थांच्या वसुली व जप्तीच्या कारवाईदरम्यान पोलिसांकडून बंदोबस्त पुरविण्याबाबत २९ जानेवारी रोजी शासनाने परिपत्रक जारी केले आहे. त्यामुळे नागरी बँका व पतसंस्थांना वसुलीकामी पोलीस बंदोबस्त मिळणे सुकर झाले आहे.

सहकारी संस्थांनी मागणी केल्यावर त्वरित संरक्षण देण्याची कार्यवाही करावी, असे आदेश या परिपत्रकाच्या माध्यमातून पोलिसांना देण्यात आले आहेत. नागरी बँका व पतसंस्थांनी मागणी केल्यावर पोलिसांमार्फत कागदपत्रांची फेर तपासणी करण्यात येत होती. यामध्येही नाहक वेळ जात होता. या परिपत्रकामध्ये पोलिसांनी कागदपत्रांची फेरतपासणी करू नये, असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करावी!बँका व पतसंस्थांनी बंदोबस्ताची मागणी किमान पंधरा दिवस आधी करावी. जप्तीची कारवाई शक्यतो सूर्याेदय आणि सूर्यास्तादरम्यान करावी. त्याचे व्हिडीओ शूटिंग करून ते जतन करावे. तसेच सुरक्षिततेच्यादृष्टीने भारतीय रिझर्व्ह बँकेने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असेही पत्रकात नमूद असल्याचे चरेगावकर यांनी सांगितले.

 

टॅग्स :bankबँकPoliceपोलिस