शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 
3
कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?
4
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
5
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
6
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
7
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
8
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
9
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
10
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
11
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
12
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
13
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
14
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
15
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
16
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
17
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
18
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
19
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
20
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही

कर्जबाजारी शेतकऱ्यांना बँकांकडून जप्तीची नोटीस : कर्जमाफीपासून ३५ हजार शेतकरी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 23:47 IST

महाराष्ट्र राज्य सरकारने दीड वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर केली. मात्र, अद्यापही सातारा जिल्ह्यातील ३५ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी

सातारा : महाराष्ट्र राज्य सरकारने दीड वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर केली. मात्र, अद्यापही सातारा जिल्ह्यातील ३५ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही. त्या शेतकऱ्यांवर संबंधित बँकांनी कारवाईचा बडगा उगारला असून, कर्जाची परतफेड करा, अन्यथा मालमत्ता जप्त करण्यात येतील, असे आदेश नोटिशीद्वारे दिले आहेत.

महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दीड वर्षापूर्वी शेतकरी कर्जमाफी जाहीर केली. या योजनेस छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना असे नाव देण्यात आले. या योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी शेतकºयांना आॅनलाईन अर्ज करण्याची अट सरकारने घातली. त्यामुळे महा ई-सेवा केंद्राबाहेर अनेक दिवस रांगेत उभे राहून शेतकºयांनी आॅनलाईन अर्ज भरले. हे अर्ज भरताना महा ई-सेवा केंद्र चालकांनी काही त्रुटी ठेवल्या.

या योजनेंतर्गत सातारा जिल्ह्यातील २ लाख ४० हजार शेतकºयांनी आॅनलाईन अर्ज भरले. त्यापैकी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेसह राष्ट्रीयकृत, ग्रामीण व खासगी बँकांच्या कर्जदारांचा समावेश आहे. त्यातील २ लाख ९ हजार ५४३ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला. मात्र, अद्यापही ३० हजार ४५७ शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत.

राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाने पाठ फिरवल्याने पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. राज्यात अजून अनेक ठिकाणी खरीप आणि रब्बीच्या पेरण्या झाल्या नाहीत. त्यामुळे जनावरांच्या चाºयाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.ग्रामीण भागात दिवसेंदिवस दुष्काळ तीव्र वाढत असताना पाण्याच्या पाण्यासाठी टँकरची मागणी वाढत आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रीयकृत बँकांकडून कर्ज घेतलेल्या अनेक शेतकºयांना कर्जाची तातडीने परतफेड करा, अन्यथा जप्तीची कारवाई करण्यात येईल, अशा प्रकारची नोटीस दिल्या आहेत. त्यामुळे आधीच आस्मानी संकटात सापडलेल्या शेतकºयांवर सुलतानी संकटांचा डोंगर कोसळला आहे. त्यामुळे ही कारवाई मागे घ्यावी, अशी मागणी संबंधित शेतकऱ्यांच्या कुटुंबियांकडून केली जात आहे.शेतकऱ्यांची वेट अँड वॉचची भूमिकाशासनाकडून शेतकºयांची टप्प्याटप्याने लाभार्थी शेतकºयांची नावे जाहीर केली. मात्र, कोणाचे नाव बाद झाले किंवा नेमक्या काय त्रुटी राहिल्या आहेत, याबाबत शासनाकडून स्पष्टीकरण न झाल्याने अनेक शेतकरी संभ्रमात आहेत. याबाबत माहिती देण्यासाठी जबाबदार व्यक्ती नसल्याने अनेक शेतकरी वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरbankबँकFarmerशेतकरी