शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
3
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
4
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
5
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
6
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
7
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
8
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
9
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
10
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
11
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
12
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
13
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
14
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
15
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
16
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
17
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
18
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
19
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
20
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
Daily Top 2Weekly Top 5

कर्जबाजारी शेतकऱ्यांना बँकांकडून जप्तीची नोटीस : कर्जमाफीपासून ३५ हजार शेतकरी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 23:47 IST

महाराष्ट्र राज्य सरकारने दीड वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर केली. मात्र, अद्यापही सातारा जिल्ह्यातील ३५ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी

सातारा : महाराष्ट्र राज्य सरकारने दीड वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर केली. मात्र, अद्यापही सातारा जिल्ह्यातील ३५ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही. त्या शेतकऱ्यांवर संबंधित बँकांनी कारवाईचा बडगा उगारला असून, कर्जाची परतफेड करा, अन्यथा मालमत्ता जप्त करण्यात येतील, असे आदेश नोटिशीद्वारे दिले आहेत.

महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दीड वर्षापूर्वी शेतकरी कर्जमाफी जाहीर केली. या योजनेस छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना असे नाव देण्यात आले. या योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी शेतकºयांना आॅनलाईन अर्ज करण्याची अट सरकारने घातली. त्यामुळे महा ई-सेवा केंद्राबाहेर अनेक दिवस रांगेत उभे राहून शेतकºयांनी आॅनलाईन अर्ज भरले. हे अर्ज भरताना महा ई-सेवा केंद्र चालकांनी काही त्रुटी ठेवल्या.

या योजनेंतर्गत सातारा जिल्ह्यातील २ लाख ४० हजार शेतकºयांनी आॅनलाईन अर्ज भरले. त्यापैकी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेसह राष्ट्रीयकृत, ग्रामीण व खासगी बँकांच्या कर्जदारांचा समावेश आहे. त्यातील २ लाख ९ हजार ५४३ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला. मात्र, अद्यापही ३० हजार ४५७ शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत.

राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाने पाठ फिरवल्याने पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. राज्यात अजून अनेक ठिकाणी खरीप आणि रब्बीच्या पेरण्या झाल्या नाहीत. त्यामुळे जनावरांच्या चाºयाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.ग्रामीण भागात दिवसेंदिवस दुष्काळ तीव्र वाढत असताना पाण्याच्या पाण्यासाठी टँकरची मागणी वाढत आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रीयकृत बँकांकडून कर्ज घेतलेल्या अनेक शेतकºयांना कर्जाची तातडीने परतफेड करा, अन्यथा जप्तीची कारवाई करण्यात येईल, अशा प्रकारची नोटीस दिल्या आहेत. त्यामुळे आधीच आस्मानी संकटात सापडलेल्या शेतकºयांवर सुलतानी संकटांचा डोंगर कोसळला आहे. त्यामुळे ही कारवाई मागे घ्यावी, अशी मागणी संबंधित शेतकऱ्यांच्या कुटुंबियांकडून केली जात आहे.शेतकऱ्यांची वेट अँड वॉचची भूमिकाशासनाकडून शेतकºयांची टप्प्याटप्याने लाभार्थी शेतकºयांची नावे जाहीर केली. मात्र, कोणाचे नाव बाद झाले किंवा नेमक्या काय त्रुटी राहिल्या आहेत, याबाबत शासनाकडून स्पष्टीकरण न झाल्याने अनेक शेतकरी संभ्रमात आहेत. याबाबत माहिती देण्यासाठी जबाबदार व्यक्ती नसल्याने अनेक शेतकरी वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरbankबँकFarmerशेतकरी