शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
3
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
4
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
5
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
6
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
7
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
8
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
9
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
10
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
11
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
12
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
13
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
14
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
15
तुळजाभवानी मंदिरात देणगी दर्शन पासच्या शुल्कात दुप्पट वाढ, मात्र अभिषेकाची संख्या वाढवली
16
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
17
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
18
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
19
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
20
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!

कर्जबाजारी शेतकऱ्यांना बँकांकडून जप्तीची नोटीस : कर्जमाफीपासून ३५ हजार शेतकरी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 23:47 IST

महाराष्ट्र राज्य सरकारने दीड वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर केली. मात्र, अद्यापही सातारा जिल्ह्यातील ३५ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी

सातारा : महाराष्ट्र राज्य सरकारने दीड वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर केली. मात्र, अद्यापही सातारा जिल्ह्यातील ३५ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही. त्या शेतकऱ्यांवर संबंधित बँकांनी कारवाईचा बडगा उगारला असून, कर्जाची परतफेड करा, अन्यथा मालमत्ता जप्त करण्यात येतील, असे आदेश नोटिशीद्वारे दिले आहेत.

महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दीड वर्षापूर्वी शेतकरी कर्जमाफी जाहीर केली. या योजनेस छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना असे नाव देण्यात आले. या योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी शेतकºयांना आॅनलाईन अर्ज करण्याची अट सरकारने घातली. त्यामुळे महा ई-सेवा केंद्राबाहेर अनेक दिवस रांगेत उभे राहून शेतकºयांनी आॅनलाईन अर्ज भरले. हे अर्ज भरताना महा ई-सेवा केंद्र चालकांनी काही त्रुटी ठेवल्या.

या योजनेंतर्गत सातारा जिल्ह्यातील २ लाख ४० हजार शेतकºयांनी आॅनलाईन अर्ज भरले. त्यापैकी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेसह राष्ट्रीयकृत, ग्रामीण व खासगी बँकांच्या कर्जदारांचा समावेश आहे. त्यातील २ लाख ९ हजार ५४३ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला. मात्र, अद्यापही ३० हजार ४५७ शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत.

राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाने पाठ फिरवल्याने पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. राज्यात अजून अनेक ठिकाणी खरीप आणि रब्बीच्या पेरण्या झाल्या नाहीत. त्यामुळे जनावरांच्या चाºयाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.ग्रामीण भागात दिवसेंदिवस दुष्काळ तीव्र वाढत असताना पाण्याच्या पाण्यासाठी टँकरची मागणी वाढत आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रीयकृत बँकांकडून कर्ज घेतलेल्या अनेक शेतकºयांना कर्जाची तातडीने परतफेड करा, अन्यथा जप्तीची कारवाई करण्यात येईल, अशा प्रकारची नोटीस दिल्या आहेत. त्यामुळे आधीच आस्मानी संकटात सापडलेल्या शेतकºयांवर सुलतानी संकटांचा डोंगर कोसळला आहे. त्यामुळे ही कारवाई मागे घ्यावी, अशी मागणी संबंधित शेतकऱ्यांच्या कुटुंबियांकडून केली जात आहे.शेतकऱ्यांची वेट अँड वॉचची भूमिकाशासनाकडून शेतकºयांची टप्प्याटप्याने लाभार्थी शेतकºयांची नावे जाहीर केली. मात्र, कोणाचे नाव बाद झाले किंवा नेमक्या काय त्रुटी राहिल्या आहेत, याबाबत शासनाकडून स्पष्टीकरण न झाल्याने अनेक शेतकरी संभ्रमात आहेत. याबाबत माहिती देण्यासाठी जबाबदार व्यक्ती नसल्याने अनेक शेतकरी वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरbankबँकFarmerशेतकरी