शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
4
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
5
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
6
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
7
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
8
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
9
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
10
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
11
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
12
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
13
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
14
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
15
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
16
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
17
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
18
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
19
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
20
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...

सातारा-कागल सहापदरीकरणावर कोल्हापुरातून लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 14:52 IST

सातारा : सातारा ते कागल राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम लवकरच सुरू होणार असून त्यावर लक्ष ठेवण्यासाठी कोल्हापुरात नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाचे कार्यालय सुरू होत आहे. यामुळे सहापदरीकरणाच्या कामाला गती येण्यास मदत होणार आहे. तसेच संभाव्य अडचणींवर त्वरित तोडगा काढता येणार आहे.

ठळक मुद्देकोल्हापुरात नवीन कार्यालय सुरू यापूर्वी पुण्यातून कामावर देखरेख ; गतीही येणार सुसंवाद, अडचणीवर उपाययोजना...तीन हजार कोटी रुपयांच्या खर्चाला गडकरी यांनी मान्यता सांगली जिल्ह्यातील २९ तर कोल्हापूर जिल्ह्यातील कागलपर्यंतचे ४७ किलोमीटरचे काम होणार

सातारा : सातारा ते कागल राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम लवकरच सुरू होणार असून त्यावर लक्ष ठेवण्यासाठी कोल्हापुरात नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाचे कार्यालय सुरू होत आहे. यामुळे सहापदरीकरणाच्या कामाला गती येण्यास मदत होणार आहे. तसेच संभाव्य अडचणींवर त्वरित तोडगा काढता येणार आहे.

सातारा-कागल या सहापदरी रस्त्याच्या कामासाठी तीन हजार कोटी रुपयांच्या खर्चाला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मान्यता दिली आहे. येत्या एक महिन्यात यासंदर्भात निविदा काढण्यात येणार असून पुढील तीन महिन्यांमध्ये प्रत्यक्षात कामाला सुरुवात होणार आहे. त्याचबरोबर या संदर्भात महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारण यांच्यात तांत्रिक बाबींमध्ये असलेली विसंगतीही दूर करण्यात आली आहे. आता सर्वांचेच सातारा ते कागल दरम्यानच्या सहापदरीकरणाच्या कामावर लक्ष असणार आहे.

सातारा ते कागल हे अंतर १३३ किलोमीटर आहे. या मार्गाचे आता सहापदरीकरण होणार आहे. हा मार्ग सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतून बेंगलोरकडे जातो. या मार्गावरील सातारा जिल्ह्यात ५७ किलोमीटर अंतराचे सहापदरीकरणाचे काम होणार असून सांगली जिल्ह्यातील २९ तर कोल्हापूर जिल्ह्यातील कागलपर्यंतचे ४७ किलोमीटरचे काम होणार आहे.

आता या कामासाठी कोल्हापूरमध्ये नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाचे कार्यालय सुरू होत आहे. सध्या कोल्हापुरात भाड्याने इमारत घेऊन कार्यालय सुरू करण्यात आले आहे. लवकरच हे कार्यालय पूर्णवेळ कार्यरत राहणार आहे. या कार्यालयामुळे सातारा-कागल या सहापदरीकरणाच्या कामावर लक्ष ठेवणे सोपे होणार आहे. त्याचबरोबर या कामाला गतीही येणार आहे. या कार्यालयामुळे महामार्गाचे काम सुरू असताना येणाºया अडचणी लवकरात लवकर दूर करण्याचा प्रयत्न होणार आहे. तसेच आवश्यक त्या बाबींची पूर्तताही करणे शक्य होणार आहे.सुसंवाद, अडचणीवर उपाययोजना...सहापदरीकरणाचे काम सुरू झाल्यास अनेक ठिकाणी जमिनी, उड्डाणपूल, रस्त्यांबाबत अडचणी निर्माण होणार आहेत. त्यामुळे कोल्हापुरातील नवीन कार्यालयातून त्यावर उपाययोजना करता येणार आहेत. लोकांनाही  कार्यालयात जाऊन आपले म्हणणे मांडता येणार आहे. तसेच कार्यालयातील अधिकाºयांना कामाबाबत सुसंवाद ठेवता येणार आहे.