शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
2
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
3
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
4
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
5
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
6
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
7
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
9
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
10
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
11
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
12
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
13
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
14
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
15
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
16
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
17
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
18
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
19
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
20
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

सातारा-कागल सहापदरीकरणावर कोल्हापुरातून लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 14:52 IST

सातारा : सातारा ते कागल राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम लवकरच सुरू होणार असून त्यावर लक्ष ठेवण्यासाठी कोल्हापुरात नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाचे कार्यालय सुरू होत आहे. यामुळे सहापदरीकरणाच्या कामाला गती येण्यास मदत होणार आहे. तसेच संभाव्य अडचणींवर त्वरित तोडगा काढता येणार आहे.

ठळक मुद्देकोल्हापुरात नवीन कार्यालय सुरू यापूर्वी पुण्यातून कामावर देखरेख ; गतीही येणार सुसंवाद, अडचणीवर उपाययोजना...तीन हजार कोटी रुपयांच्या खर्चाला गडकरी यांनी मान्यता सांगली जिल्ह्यातील २९ तर कोल्हापूर जिल्ह्यातील कागलपर्यंतचे ४७ किलोमीटरचे काम होणार

सातारा : सातारा ते कागल राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम लवकरच सुरू होणार असून त्यावर लक्ष ठेवण्यासाठी कोल्हापुरात नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाचे कार्यालय सुरू होत आहे. यामुळे सहापदरीकरणाच्या कामाला गती येण्यास मदत होणार आहे. तसेच संभाव्य अडचणींवर त्वरित तोडगा काढता येणार आहे.

सातारा-कागल या सहापदरी रस्त्याच्या कामासाठी तीन हजार कोटी रुपयांच्या खर्चाला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मान्यता दिली आहे. येत्या एक महिन्यात यासंदर्भात निविदा काढण्यात येणार असून पुढील तीन महिन्यांमध्ये प्रत्यक्षात कामाला सुरुवात होणार आहे. त्याचबरोबर या संदर्भात महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारण यांच्यात तांत्रिक बाबींमध्ये असलेली विसंगतीही दूर करण्यात आली आहे. आता सर्वांचेच सातारा ते कागल दरम्यानच्या सहापदरीकरणाच्या कामावर लक्ष असणार आहे.

सातारा ते कागल हे अंतर १३३ किलोमीटर आहे. या मार्गाचे आता सहापदरीकरण होणार आहे. हा मार्ग सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतून बेंगलोरकडे जातो. या मार्गावरील सातारा जिल्ह्यात ५७ किलोमीटर अंतराचे सहापदरीकरणाचे काम होणार असून सांगली जिल्ह्यातील २९ तर कोल्हापूर जिल्ह्यातील कागलपर्यंतचे ४७ किलोमीटरचे काम होणार आहे.

आता या कामासाठी कोल्हापूरमध्ये नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाचे कार्यालय सुरू होत आहे. सध्या कोल्हापुरात भाड्याने इमारत घेऊन कार्यालय सुरू करण्यात आले आहे. लवकरच हे कार्यालय पूर्णवेळ कार्यरत राहणार आहे. या कार्यालयामुळे सातारा-कागल या सहापदरीकरणाच्या कामावर लक्ष ठेवणे सोपे होणार आहे. त्याचबरोबर या कामाला गतीही येणार आहे. या कार्यालयामुळे महामार्गाचे काम सुरू असताना येणाºया अडचणी लवकरात लवकर दूर करण्याचा प्रयत्न होणार आहे. तसेच आवश्यक त्या बाबींची पूर्तताही करणे शक्य होणार आहे.सुसंवाद, अडचणीवर उपाययोजना...सहापदरीकरणाचे काम सुरू झाल्यास अनेक ठिकाणी जमिनी, उड्डाणपूल, रस्त्यांबाबत अडचणी निर्माण होणार आहेत. त्यामुळे कोल्हापुरातील नवीन कार्यालयातून त्यावर उपाययोजना करता येणार आहेत. लोकांनाही  कार्यालयात जाऊन आपले म्हणणे मांडता येणार आहे. तसेच कार्यालयातील अधिकाºयांना कामाबाबत सुसंवाद ठेवता येणार आहे.