शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
2
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा
3
चीन तिबेटमध्ये बांधतोय जगातील सर्वांत मोठे धरण; भारत-चीन सीमेजवळ असणार प्रकल्प
4
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
5
त्या खासदार झाल्या, पण छळ काही थांबला नाही...; इंटर पार्लियामेंटरी युनियनचा धक्कादायक अहवाल
6
राज ठाकरेंना मी हिंदी शिकवली; निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचले 
7
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
8
धक्कादायक..! छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच कुटुंबातील ३ बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा
9
शिखर बँक देणार सोसायट्यांना कर्ज, शेतकऱ्यांना माेठा दिलासा! सावकारी जाचातून बळीराजाची सुटका करण्यासाठी निर्णय
10
देशातील टीव्हींचे ८० टक्के सुटे भाग चीनमधून येतात, ‘मेक इन इंडिया’त फक्त  ‘जोडाजोडी’ : राहुल गांधी
11
हनी ट्रॅप प्रकरण तपासासाठी पथक नाशकात, ‘त्या’ हॉटेलची झाडाझडती घेतल्याचे वृत्त; जळगाव प्रकरणीही एक अटकेत
12
‘इंडिया’ आघाडी सरकारला आठ मुद्द्यांवर घेरणार! अधिवेशनापूर्वी घटक पक्षांची व्हर्च्युअल बैठक
13
तीन व्यक्तींच्या डीएनएद्वारे आठ मुले कशी जन्माला आली? ब्रिटनमध्ये आगळावेगळा प्रयोग
14
७ राज्यांत पेच; भाजपच्या अध्यक्ष निवडीला विलंब, २९ राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुका झाल्या पूर्ण!
15
सरकारी कार्यालयांच्या वेळा वेगवेगळ्या; मुंबईत गर्दी कमी करण्यासाठी नवीन उपाय!
16
डिजिटल अरेस्टच्या गुन्ह्यात देशात पहिल्यांदाच शिक्षा; पश्चिम बंगालमध्ये ९ जणांना जन्मठेप, उत्तर प्रदेशात ७ वर्षांची शिक्षा
17
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
18
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
19
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
20
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू

सातारा-कागल सहापदरीकरणावर कोल्हापुरातून लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 14:52 IST

सातारा : सातारा ते कागल राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम लवकरच सुरू होणार असून त्यावर लक्ष ठेवण्यासाठी कोल्हापुरात नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाचे कार्यालय सुरू होत आहे. यामुळे सहापदरीकरणाच्या कामाला गती येण्यास मदत होणार आहे. तसेच संभाव्य अडचणींवर त्वरित तोडगा काढता येणार आहे.

ठळक मुद्देकोल्हापुरात नवीन कार्यालय सुरू यापूर्वी पुण्यातून कामावर देखरेख ; गतीही येणार सुसंवाद, अडचणीवर उपाययोजना...तीन हजार कोटी रुपयांच्या खर्चाला गडकरी यांनी मान्यता सांगली जिल्ह्यातील २९ तर कोल्हापूर जिल्ह्यातील कागलपर्यंतचे ४७ किलोमीटरचे काम होणार

सातारा : सातारा ते कागल राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम लवकरच सुरू होणार असून त्यावर लक्ष ठेवण्यासाठी कोल्हापुरात नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाचे कार्यालय सुरू होत आहे. यामुळे सहापदरीकरणाच्या कामाला गती येण्यास मदत होणार आहे. तसेच संभाव्य अडचणींवर त्वरित तोडगा काढता येणार आहे.

सातारा-कागल या सहापदरी रस्त्याच्या कामासाठी तीन हजार कोटी रुपयांच्या खर्चाला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मान्यता दिली आहे. येत्या एक महिन्यात यासंदर्भात निविदा काढण्यात येणार असून पुढील तीन महिन्यांमध्ये प्रत्यक्षात कामाला सुरुवात होणार आहे. त्याचबरोबर या संदर्भात महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारण यांच्यात तांत्रिक बाबींमध्ये असलेली विसंगतीही दूर करण्यात आली आहे. आता सर्वांचेच सातारा ते कागल दरम्यानच्या सहापदरीकरणाच्या कामावर लक्ष असणार आहे.

सातारा ते कागल हे अंतर १३३ किलोमीटर आहे. या मार्गाचे आता सहापदरीकरण होणार आहे. हा मार्ग सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतून बेंगलोरकडे जातो. या मार्गावरील सातारा जिल्ह्यात ५७ किलोमीटर अंतराचे सहापदरीकरणाचे काम होणार असून सांगली जिल्ह्यातील २९ तर कोल्हापूर जिल्ह्यातील कागलपर्यंतचे ४७ किलोमीटरचे काम होणार आहे.

आता या कामासाठी कोल्हापूरमध्ये नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाचे कार्यालय सुरू होत आहे. सध्या कोल्हापुरात भाड्याने इमारत घेऊन कार्यालय सुरू करण्यात आले आहे. लवकरच हे कार्यालय पूर्णवेळ कार्यरत राहणार आहे. या कार्यालयामुळे सातारा-कागल या सहापदरीकरणाच्या कामावर लक्ष ठेवणे सोपे होणार आहे. त्याचबरोबर या कामाला गतीही येणार आहे. या कार्यालयामुळे महामार्गाचे काम सुरू असताना येणाºया अडचणी लवकरात लवकर दूर करण्याचा प्रयत्न होणार आहे. तसेच आवश्यक त्या बाबींची पूर्तताही करणे शक्य होणार आहे.सुसंवाद, अडचणीवर उपाययोजना...सहापदरीकरणाचे काम सुरू झाल्यास अनेक ठिकाणी जमिनी, उड्डाणपूल, रस्त्यांबाबत अडचणी निर्माण होणार आहेत. त्यामुळे कोल्हापुरातील नवीन कार्यालयातून त्यावर उपाययोजना करता येणार आहेत. लोकांनाही  कार्यालयात जाऊन आपले म्हणणे मांडता येणार आहे. तसेच कार्यालयातील अधिकाºयांना कामाबाबत सुसंवाद ठेवता येणार आहे.