शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

नैसर्गिक विधी रोखणं करतेय अवयव निकामी!, महिलांमध्ये त्रास जास्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2022 14:03 IST

नैसर्गिक विधी रोखल्याने अवयवांवरील नियंत्रण सुटण्याचे आणि ते निकामी होण्याचे प्रकारही वाढले आहेत

प्रगती जाधव-पाटील

सातारा : अस्वच्छ शौचालय, स्वच्छतागृहात पाण्याची अनुपलब्धता आणि सार्वजनिक शौचालयांचा वापर करताना वाटत असणारी असुरक्षितता या काही कारणांमुळे नैसर्गिक विधी रोखण्याचा प्रयत्न महिला करतात. तरुणपणात केलेले हे कृत्य पुढे सवयीचे बनत जाते; पण त्याचे दुष्परिणाम उतार वयात सोसावे लागतात. नैसर्गिक विधी रोखल्याने अवयवांवरील नियंत्रण सुटण्याचे आणि ते निकामी होण्याचे प्रकारही वाढले आहेत.

कामाच्या निमित्ताने घराबाहेर पडलेल्या महिलांना नैसर्गिक विधीला जावे वाटले तरीही त्यांना शाैचालयांची व्यवस्था नसल्याने अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे घरी जाईपर्यंत महिलांची कुचंबणा होते. याचीच सवय पुढे लागत असल्याने त्यांना मोठ्या आजारांना सामोरे जावे लागते. शरीरात साठलेली घाण मल, मूत्र आणि घामावाटे बाहेर पडते. घाण बाहेर पडल्यामुळे शरीराची अंतर्गत शुद्धी होण्यासही मदत मिळते.

प्राण्यांचे वर्तन अनुकरणीय!

नैसर्गिक विधी करण्याची भावना जागृत झाल्यानंतर स्थळ, वेळ, काळ याचे कोणतेही भान न ठेवता प्राणी स्वत:ला हलके करतात. तर जोवर रोखता येतंय तोवर रोखण्याकडे मनुष्यांचा कल राहतो. नैसर्गिक विधीबाबत मनुष्यांनी प्राण्यांचे अनुकरण केले तर त्यांना अवयव निकामे होण्याचा त्रास होणार नाही, असे तज्ज्ञ सांगतात.

युरिन इन्फेक्शनपेक्षा वेग रोखणं धोक्याचे!

अस्वच्छ शौचालय वापरल्याने योनीमार्गात जंतुसंसर्ग होण्याची धास्ती अनेक महिलांना असते; पण वैद्यकीय तज्ज्ञांच्या मतानुसार संसर्गापेक्षा वेग रोखणं अधिक धोक्याचे आहे. संसर्गावर उपचार करण्यासाठी औषधे उपलब्ध आहेत. मात्र, वेग रोखल्याने स्नायूंचे होणारे नुकसान भरून न येणारे आहे.

नैसर्गिक विधी रोखणं हे निसर्गचक्राच्या विरुद्ध वागणे आहे. तरुणपणात केलेल्या या चुकांचे परिणाम शरीराला उतार वयात सोसावे लागतात. वाढत्या वयात नैसर्गिक विधींवरील नियंत्रण सुटणे, स्नायूंची नियंत्रण क्षमता कमी होण्याचे त्रास आढळून येतात. - डॉ. जयदीप चव्हाण, सातारा

टॅग्स :Satara areaसातारा परिसर