शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

नैसर्गिक विधी रोखणं करतेय अवयव निकामी!, महिलांमध्ये त्रास जास्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2022 14:03 IST

नैसर्गिक विधी रोखल्याने अवयवांवरील नियंत्रण सुटण्याचे आणि ते निकामी होण्याचे प्रकारही वाढले आहेत

प्रगती जाधव-पाटील

सातारा : अस्वच्छ शौचालय, स्वच्छतागृहात पाण्याची अनुपलब्धता आणि सार्वजनिक शौचालयांचा वापर करताना वाटत असणारी असुरक्षितता या काही कारणांमुळे नैसर्गिक विधी रोखण्याचा प्रयत्न महिला करतात. तरुणपणात केलेले हे कृत्य पुढे सवयीचे बनत जाते; पण त्याचे दुष्परिणाम उतार वयात सोसावे लागतात. नैसर्गिक विधी रोखल्याने अवयवांवरील नियंत्रण सुटण्याचे आणि ते निकामी होण्याचे प्रकारही वाढले आहेत.

कामाच्या निमित्ताने घराबाहेर पडलेल्या महिलांना नैसर्गिक विधीला जावे वाटले तरीही त्यांना शाैचालयांची व्यवस्था नसल्याने अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे घरी जाईपर्यंत महिलांची कुचंबणा होते. याचीच सवय पुढे लागत असल्याने त्यांना मोठ्या आजारांना सामोरे जावे लागते. शरीरात साठलेली घाण मल, मूत्र आणि घामावाटे बाहेर पडते. घाण बाहेर पडल्यामुळे शरीराची अंतर्गत शुद्धी होण्यासही मदत मिळते.

प्राण्यांचे वर्तन अनुकरणीय!

नैसर्गिक विधी करण्याची भावना जागृत झाल्यानंतर स्थळ, वेळ, काळ याचे कोणतेही भान न ठेवता प्राणी स्वत:ला हलके करतात. तर जोवर रोखता येतंय तोवर रोखण्याकडे मनुष्यांचा कल राहतो. नैसर्गिक विधीबाबत मनुष्यांनी प्राण्यांचे अनुकरण केले तर त्यांना अवयव निकामे होण्याचा त्रास होणार नाही, असे तज्ज्ञ सांगतात.

युरिन इन्फेक्शनपेक्षा वेग रोखणं धोक्याचे!

अस्वच्छ शौचालय वापरल्याने योनीमार्गात जंतुसंसर्ग होण्याची धास्ती अनेक महिलांना असते; पण वैद्यकीय तज्ज्ञांच्या मतानुसार संसर्गापेक्षा वेग रोखणं अधिक धोक्याचे आहे. संसर्गावर उपचार करण्यासाठी औषधे उपलब्ध आहेत. मात्र, वेग रोखल्याने स्नायूंचे होणारे नुकसान भरून न येणारे आहे.

नैसर्गिक विधी रोखणं हे निसर्गचक्राच्या विरुद्ध वागणे आहे. तरुणपणात केलेल्या या चुकांचे परिणाम शरीराला उतार वयात सोसावे लागतात. वाढत्या वयात नैसर्गिक विधींवरील नियंत्रण सुटणे, स्नायूंची नियंत्रण क्षमता कमी होण्याचे त्रास आढळून येतात. - डॉ. जयदीप चव्हाण, सातारा

टॅग्स :Satara areaसातारा परिसर