शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
2
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
3
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
4
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
5
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
6
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
7
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
8
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
9
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
10
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
11
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
12
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
13
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
14
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
15
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
16
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
17
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
18
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
19
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
20
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश

साताऱ्यात विनोद तावडे यांना घेराव, चित्रा वाघ यांचा राम कदमांवर प्रहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 13:45 IST

कदम यांच्या नावात राम असला तरी त्यांची विलासीवृत्ती आहे. महाराष्ट्रातून असा कचरा काढून टाकावा, असा जोरदार प्रहार राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केला. दरम्यान, वाघ यांनी व पक्षाच्या महिला पदाधिकारी, सदस्यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना घेराव घालून जोरदार निषेधही नोंदविला.

ठळक मुद्देसाताऱ्यात विनोद तावडे यांना घेराव, चित्रा वाघ यांचा राम कदमांवर प्रहार नावात राम; विलासीवृत्तीचे काम; महाराष्ट्रातून कचरा काढण्याची मागणी

सातारा : महाराष्ट्रात संस्कृती शिल्लक आहे की नाही, असा प्रश्न असून, भाजपचे आमदार राम कदम यांनी मुलींच्या बाबतीत उधळलेल्या मुक्ताफळांचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. अशा कदम यांच्या नावात राम असला तरी त्यांची विलासीवृत्ती आहे. महाराष्ट्रातून असा कचरा काढून टाकावा, असा जोरदार प्रहार राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केला. दरम्यान, वाघ यांनी व पक्षाच्या महिला पदाधिकारी, सदस्यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना घेराव घालून जोरदार निषेधही नोंदविला.साताऱ्यातील राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रमास मंत्री विनोद तावडे आले होते. कार्यक्रमाला जाण्यापूर्वी ते विश्रामगृहावर थांबले होते. त्यावेळी चित्रा वाघ, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा समिंद्रा जाधव व इतर महिला उपस्थित होत्या. वाघ यांच्यासह महिलांनी मंत्री तावडे यांना घेराव घातला.|महाराष्ट्रात संस्कृती राहिली आहे का? भाजपसारख्या तुमच्याच पक्षाचे राम कदम यांच्यासारखे आमदार महिला, मुलींबाबत चुकीची मुक्ताफळे उधळत आहेत. यामुळे राज्यात महिला सुरक्षित आहेत का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. लोकांच्या मुलींना पळविण्याची भाषा योग्य आहे का? या ठिकाणी तुम्ही सोडून दुसरे कोणी असते तर येथून बाहेरही पडू दिले नसते. राम कदम यांना बडतर्फ करावे, असे जोरदारपणे वाघ यांनी सांगितले. यावर मंत्री तावडे यांनी सावध भूमिका घेत आपले म्हणणे मांडले.चॅनेलवर पाहिले आहे, त्यानुसार ते वक्तव्य अयोग्य असे आहे, असे दिसते; पण याप्रकरणी कायद्याने काय शिक्षा होऊ शकते, हे गृहमंत्र्यांना माहीत. महिलांबाबत आमची भूमिका नेहमीच चांगली व समानतेची राहिली आहे. झालेला प्रकार चुकीचा असेल तर नक्कीच कारवाई करण्यात येईल. याबाबतच्या तुमच्या भावना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचविण्यात येतील, असे सांगून मंत्री तावडे यांनी काढता पाय घेतला.या घेरावानंतर चित्रा वाघ विश्रामगृहातून बाहेर आल्यावर त्यांनी पत्रकारांशी बोलताना राम कदम यांचे नावच फक्त राम असून, काम विलासीवृत्तीचे आहे. असा कचरा महाराष्ट्रातून काढून टाकावा. पुरोगामी महाराष्ट्राला हे शोभणारे नाही, असा घणाघातही केला. यावेळी राष्ट्रवादी महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसह सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.ताई मी तुमच्याबरोबर...शासकीय विश्रामगृहाच्या बाहेर चित्रा वाघ पत्रकारांशी बोलत होत्या. त्यावेळी तेथूनच पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर हे जात होते. मंत्री जानकर जात असल्याचे पाहताच वाघ म्हणाल्या, जानकर साहेब राज्यात काय चालले आहे. महिला सुरक्षित आहेत का ? तुम्ही काय भूमिका घेणार आहात, काय बोलणार की नाही, असे विचारल्यावर मंत्री जानकर म्हणाले, मी सावित्रीबार्इंच्या जिल्ह्यात आहे. जानकर यांचे हे वाक्य तोडून काढत वाघ यांनी सावित्रीबार्इंचे नाव घेता; पण सावित्रीबार्इंच्या लेकीचे काय चालले आहे, ते पाहा, असे सांगितले. अशा बेताल वक्तव्य करणाऱ्या आमदारांवर कारवाई करावी, अशी जोरदार मागणीही केली.

टॅग्स :Ram Kadamराम कदमVinod Tawdeविनोद तावडेSatara areaसातारा परिसर