शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

गत दहा वर्षात ३३ बिबट्यांनी गमावला जीव, सातारा जिल्ह्यातील चित्र 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 13:19 IST

कऱ्हाड तालुक्यात सर्वाधिक बळी

संजय पाटीलकऱ्हाड (जि. सातारा) : वनक्षेत्रातील गर्द झाडीचा अधिवास सोडून उसात रमलेल्या बिबट्यावर सध्या अकाली मृत्यूचे संकट आहे. त्यांच्या अपघाती तसेच नैसर्गिक मृत्यूचे प्रमाण जास्त असून, जिल्ह्यात गत दहा वर्षांमध्ये तब्बल ३३ बिबट्यांनी जीव गमावला आहे. कऱ्हाड तालुक्यातील कोळेवाडीच्या शिवारात चार दिवसांपूर्वी बिबट्याचा बछडा मृतावस्थेत आढळून आला. त्यामुळे बिबट्यांच्या अकाली मृत्यूबाबत वन्यजीवप्रेमी चिंता व्यक्त करीत आहेत.अकाली मृत्यूचे संकटदहा वर्षांत ज्या बिबट्यांचा मृत्यू झाला ते सर्वच बिबटे पूर्ण वाढ झालेले होते. बछड्याचा अथवा वृद्धापकाळाने एकाही बिबट्याचा मृत्यू झाल्याची नोंद वनविभागाकडे नाही. जे मृत्यू झाले ते अकाली होते.

उपासमारीची वेळ का येते?बिबट्याचा वावर असलेल्या परिसरात नैसर्गिक अन्नसाखळी मजबूत असते. मात्र, काही बिबट्यांचा मृत्यू उपासमारीने झाला असून, प्रसंगी बेडूक खाऊन जगणाऱ्या या प्राण्यावर उपासमारीची वेळ का यावी, हा संशोधनाचा विषय आहे.अपघात, आजाराने सर्वाधिक मृत्यूमृत पावलेल्या बिबट्यांपैकी बहुतांश बिबट्यांना आजाराने ग्रासले होते, असे शवविच्छेदन अहवालातून समोर आले आहे. न्युमोनिया सारख्या गंभीर आजारामुळे काही बिबटे अकाली दगावलेत. तसेच वाहनांच्या धडकेत ही अनेक बिबट्यांचा बळी गेला आहे.

वनक्षेत्रानुसार बळीसातारा : ३, महाबळेश्वर : ३, कऱ्हाड : १९, पाटण : ६, मेढा : २कशामुळे किती बळी..?विविध आजार (१७), वाहनांच्या धडकेत (१२), शॉक लागून (१)शिकाऱ्यांकडून (३)

कऱ्हाडसह पाटण तालुक्यात अनेक बिबट्यांचा नैसर्गिक तसेच अपघाती मृत्यू झाला आहे. हे रोखण्यासाठी धोरणात्मक निर्णय होण्याची गरज असून, शासनाने त्याबाबत गंभीरपणे विचार करण्याची आवश्यकता आहे. -रोहन भाटे, मानद वन्यजीवरक्षक, कऱ्हाड

टॅग्स :Satara areaसातारा परिसरleopardबिबट्याforest departmentवनविभाग