शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
3
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
4
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
5
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
6
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
7
राज ठाकरेंचा मुद्दा, आशिष शेलारांनी दिले उत्तर; आभार मानत म्हणाले, 'त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल...'
8
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
9
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
10
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
11
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
12
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
13
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
14
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
15
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
16
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
17
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
18
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
19
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
20
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 

हॉटेलमधील साहित्य विकून दुबईला निघाला, कामगाराला विमानतळावर जेरबंद केला; सातारा पोलिसांची मुंबईत कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 12:15 IST

नऊ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

सातारा : महाबळेश्वर येथील एका हाॅटेलमध्ये काम करणाऱ्या कामगाराने हाॅटेलमधील ९ लाखांचे साहित्य विकून तो कायमचा दुबईला स्थायिक होण्यासाठी निघाला होता. तत्पूर्वीच स्थानिक गुन्हे शाखा आणि महाबळेश्वर पोलिसांनी संयुक्त करवाई करून त्याला मुंबई विमानतळावर अटक केली. तसेच त्याच्याकडून साहित्य विकत घेणाऱ्या दोन भंगार व्यावसायिकांच्याही पोलिसांनी मुसक्या आवळल्या.हाॅटेल कामगार कांचन कालीप्रसाद बॅनर्जी (वय ५४, रा. नागरिक काॅलनी, वीरमाता जिजाईनगर मोरेगाव, नालासोपारा, वसई ईस्ट), भंगार व्यावसायिक करण दशरथ घाडगे (वय २५, रा. आंबवडे खुर्द, ता. सातारा) व गाैतम सुरेश जाधव (वय २५, रा. यशवंतनगर, सैदापूर ता. सातारा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.महाबळेश्वर येथील एका हाॅटेलमध्ये कांचन बॅनर्जी हा स्वयंपाकी म्हणून काम करीत होता. पार्टनरशिपमध्ये हे हाॅटेल चालविले जात होते. सर्व मालक बाहेर राहत होते. याचा गैरफायदा घेऊन कांचन बॅनर्जी याने २५ जून २०२५ रोजी हाॅटेलमधील इलेक्ट्राॅनिक वस्तू, फर्निचर, भांडी असे तब्बल ९ लाख ९० हजारांचे साहित्य चोरून ट्रकमध्ये घालून भंगार व्यावसायिकांना विकले. त्यानंतर तो फरार झाला. महाबळेश्वर पोलिस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल होता.६ जुलैला कांचन बॅनर्जी हा दुबई येथे कायमचा पळून जाणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांना मिळाली. त्यांनी तातडीने पोलिस उपनिरीक्षक परितोष दातीर, अंमलदार प्रवीण कांबळे, साबीर मुल्ला, अमित माने, ओंकार यादव, सचिन ससाणे, रवी वर्णेकर, नवनाथ शिंदे यांच्या पथकाला तत्काळ मुंबई येथे रवाना केले. हे पथक छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल होऊन त्यांनी तातडीने आरोपीला अटक केली.

विमानतळावरील चेक लाइनच्या रांगेत..विमानतळावर कांचन बॅनर्जी हा चेक लाइनमध्ये उभा होता. तेथेच सातारा पोलिसांच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याने हाॅटेलचे साहित्य साताऱ्यातील भंगार व्यावसायिकांना विकल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी दोघा संशयितांनाही अटक केली. त्यांच्या गोडावूनमधून चोरी केलेले सर्व साहित्य जप्त करण्यात आले. ज्या ट्रक व टेम्पोमधून साहित्य नेण्यात आले ती वाहनेही पोलिसांनी हस्तगत केली.

दुबईत ‘तो’ होणार होता स्थायिक..कांचन बॅनर्जी हा अविवाहित आहे. त्याच्या कुटुंबात कोणीच नाही. तो एकटाच असल्यामुळे त्याचा दुबईला कायमचे स्थायिक होण्याचा बेत होता. तेथे गेल्यानंतर आपल्याला कोणी अटक करणार नाही, यासाठी त्याने दुबईला जाण्याचा निर्णय घेतला होता, असे पोलिसांच्या तपासात समोर आले.