शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

क्षेत्र महाबळेश्वरला ‘ब’ वर्ग दर्जा : शासनाचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 15:36 IST

महाबळेश्वर तालुक्यातील जुने महाबळेश्वर हे प्रसिद्ध स्थळ क्षेत्र महाबळेश्वर म्हणून प्रसिद्ध आहे. क्षेत्र महाबळेश्वरमध्ये पंचगंगा मंदिर हे यादवकालीन मंदिर आहे. या मंदिराची निर्मिती इ. स. १२१० मध्ये करण्यात आली होती. या मंदिराची बांधणी हेमाडपंथी आहे

ठळक मुद्देभोसरे, नायगावच्या पाठोपाठ लागली वर्णी

सागर गुजर।सातारा : महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून विख्यात असलेल्या क्षेत्र महाबळेश्वरला शासनाने ‘ब’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा जाहीर केला आहे. खटाव तालुक्यातील भोसरे आणि खंडाळा तालुक्यातील नायगाव पाठोपाठ ‘ब’ वर्ग दर्जा मिळालेले क्षेत्र महाबळेश्वर हे तिसरे पर्यटनस्थळ ठरले आहे.जिल्हा प्रशासनाच्यावतीने दि. १७ डिसेंबर २०१८ च्या पत्रान्वये क्षेत्र महाबळेश्वर या पर्यटनस्थळाला ‘ब’ वर्ग पर्यटस्थळाचा दर्जा देण्याची शिफारस करण्यात आली होती.

या पर्यटनस्थळाला दरवर्षी अंदाजे १९ ते २० लाख पर्यटक भेट देतात. या पर्यटनस्थळाचे राज्यस्तरीय महत्त्व, मोठ्या प्रमाणात भेट देणाºया पर्यटकांची संख्या, ऐतिहासिक, भौगोलिक महत्त्व विचारात घेता शासनाच्यावतीने पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने क्षेत्र महाबळेश्वरला ‘ब’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा जाहीर करण्यात आला आहे.

महाबळेश्वर तालुक्यातील जुने महाबळेश्वर हे प्रसिद्ध स्थळ क्षेत्र महाबळेश्वर म्हणून प्रसिद्ध आहे. क्षेत्र महाबळेश्वरमध्ये पंचगंगा मंदिर हे यादवकालीन मंदिर आहे. या मंदिराची निर्मिती इ. स. १२१० मध्ये करण्यात आली होती. या मंदिराची बांधणी हेमाडपंथी आहे. पूर्वी या मंदिरामध्ये गंगा नदीचा प्रवाह होता व त्याच जागेवर या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. तसेच या ठिकाणी कृष्णा, कोयना, सावित्री, गायत्री व वेण्णा या पाच नद्या उगम पावल्या असून, संपूर्ण भारतात असे एकमेव ठिकाण आहे.क्षेत्र महाबळेश्वरसाठी आता पर्यटन विभागाचा वेगळा निधी मिळणार असल्याने पर्यटनाच्या दृष्टीने विकास करणे सोपे जाणार आहे.जिल्ह्यात एकूण तीन पर्यटनस्थळांना ‘ब’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा मिळालेला आहे. सर्व प्रथम खटाव तालुक्यातील भोसरे या गावाला हा दर्जा मिळाला. भोसरे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याचे पहिले सरसेनापती प्रतापराव गुजर यांचे जन्मगाव आहे. गुजर यांनी केलेला पराक्रम आणि त्यांनी दिलेले बलिदान हे इतिहासाच्या पानांवर सुवर्णअक्षरांनी लिहिले गेले आहे. भोसरे गावाला ऐतिहासिक महत्त्व असले तरी त्या गावाचा विकास पर्यटनाच्या अंगाने होणे जरुरीचे आहे. या गावाला दरवर्षी पाच लाखांच्या आसपास पर्यटक भेट देत असतात. ‘ब’ वर्ग दर्जा मिळाला असल्याने शासनाचा अतिरिक्त निधी मिळाला आहे.मे २०१९ मध्ये नायगावक्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव असणाºया नायगावला ऐतिहासिक महत्त्व आहे. २००४ मध्ये शासनातर्फे नायगावमध्ये सावित्रीबाई फुले यांचे राज्य संरक्षित स्मारक उभारले  होते. या ठिकाणी आद्य स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील घडलेल्या निवडक प्रसंगांची उठावदार शिल्पे असणारी शिल्पसृष्टी उभारण्यात आलेली आहे. शासनातर्फे ३ जानेवारी रोजी या ठिकाणी मोठा कार्यक्रम साजरा केला जातो. ‘ब’ वर्ग दर्जा मिळाला असल्याने नायगावच्या विकासासाठी आणखी निधी मिळाला आहे. 

ब वर्ग पर्यटनस्थळासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला, त्याला यश आले, महाबळेश्वर आणि पाचगणी या दोन्ही गावांना अधिकचा निधी देण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत दिली आहे.- मकरंद पाटील, आमदार

टॅग्स :Satara areaसातारा परिसरGovernmentसरकार