शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

वीज वितरणाची मनमानी, ग्रामपंचायतीची मानहानी; पथदिव्यांसाठी खंडाळा तालुक्याला वेगळा न्याय का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 17:00 IST

खंडाळा तालुक्यातील विविध गावांच्या हद्दीतील पथदिव्यांचा वीज पुरवठा बंद असल्यामुळे ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

खंडाळा : खंडाळा तालुक्यातील विविध गावांच्या हद्दीतील पथदिव्यांचा वीज पुरवठा बंद असल्यामुळे ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्यातील इतर तालुक्यांत सर्व गावांचा वीज पुरवठा सुरू असताना खंडाळा तालुक्याला वेगळा न्याय देऊन पिळवणूक केली जात असल्याने तालुका सरपंच परिषदेच्या वतीने वीज वितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.सरपंच परिषदेचे अध्यक्ष गणेश पवार, उपाध्यक्ष हिरालाल घाडगे, प्रदीप होळकर यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांच्या न्याय्य हक्कासाठी पंचायत समिती ते वीज वितरण कार्यालय असा मोर्चा काढून ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील विविध गावांच्या हद्दीतील पथदिव्यांचा वीज पुरवठा बंद असल्यामुळे ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. रात्रीच्या वेळी महिलांना बाहेर पडणे तसेच शेतकरी वर्गाला शेतावर जाण्यासाठी अंधारातून मार्ग काढावा लागत आहे. त्यामुळे अनेक अडचणी निर्माण होत आहेत.वास्तविक सातारा जिल्ह्यातील इतर तालुक्यात सर्व गावांचा वीज पुरवठा सुरळीतपणे चालू आहे. याबाबतची माहिती प्रत्यक्ष जाऊन आम्ही घेतली आहे. मात्र, खंडाळा तालुक्यातच वीज वितरणच्या अधिकाऱ्यांचा मनमानी कारभाराचा फटका ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे. तालुक्यातील काही गावांनी थकीत वीज बिले भरल्याने त्यांचा वीज पुरवठा सुरू आहे.मात्र, बहुतांश गावातील ग्रामपंचायतीचे कर उत्पन्न कमी असल्याने वीज बिले भरणे शक्य झालेले नाही, तरी इतर तालुक्यात अशा पद्धतीने वीज पुरवठा सुरू असताना खंडाळा तालुक्याला वेगळा न्याय का? असा जाब विचारण्यासाठी खंडाळा तालुक्यातील सरपंच परिषदेच्या माध्यमातून विविध गावांचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायतीचे सदस्य यांनी लोकांच्या नागरी हक्कांसाठी वीज वितरण कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. यावेळी वीज वितरण अधिकाऱ्यांना निवेदन देऊन सर्व गावांचा पथदिव्यांचा वीजपुरवठा तातडीने सुरू करण्याची विनंती करण्यात आली.

जिल्ह्यातील इतर तालुक्यात पथदिव्यांची वीज खंडित केली नाही; मग खंडाळा तालुक्यात वेगळा नियम आहे का? अधिकाऱ्यांनी मनमानी कारभार करून लोकांना वेठीस धरले आहे. वारंवार सूचना करूनही परिस्थिती बदलली नसल्याने गावातील समस्यांना वाचा फोडण्यासाठी मोर्चाचा मार्ग पत्करावा लागला. -हिरालाल घाडगे, उपाध्यक्ष सरपंच परिषद

टॅग्स :Satara areaसातारा परिसरelectricityवीज