शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
2
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
3
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
4
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
5
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
6
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
7
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
8
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
9
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
10
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
11
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
12
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
13
Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
14
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
15
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
16
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
17
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
18
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
19
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
20
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'

धोम वगळता मुख्य धरणांमधून विसर्ग सुरू, पावसाचा जोर कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 14:54 IST

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कमी झाला असलातरी धोम वगळता मुख्य धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. सध्या कोयना धरणात ८३.६६ टीएमसी पाणीसाठा झाला असून, शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत ५५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

ठळक मुद्दे धोम वगळता मुख्य धरणांमधून विसर्ग सुरू, पावसाचा जोर कमी  कोयनेत ८३.६६ टीएमसी पाणीसाठा; घरांची पडझड सुरूच

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कमी झाला असलातरी धोम वगळता मुख्य धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. सध्या कोयना धरणात ८३.६६ टीएमसी पाणीसाठा झाला असून, शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत ५५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर सततच्या पावसामुळे पश्चिम भागात घरांची पडझड सुरू झाली आहे.गेल्या २० दिवसांपासून जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस कोसळत आहे. या पावसाचा जोर कमी झाला असलातरी ओढे, नाले खळाळू लागले आहेत. खाचरात पाणी साठल्याने भात लागणीस मोठा वेग आला आहे. पश्चिम भागात पाऊस होत असल्याने शेतीच्या कामावरही परिणाम जाणवत असल्याचे दिसत आहे.

शनिवारी सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे ५५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर धरणात ८३.६६ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरणात ३२,८५३ क्युसेक पाण्याची आवक झाली आहे. पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी धरणाचे दरवाजे साडेतीन फुटांनी उचलण्यात आले आहेत. त्यामधून १६,०६३ क्युसेक तसेच पायथा वीजगृहातून २१०० असा मिळून १८,१६३ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

पाणीपातळी वाढत राहिल्यास आणखी जादा विसर्ग करण्यात येणार आहे. यावर्षी पाऊस चांगला होत असल्याने गतवर्षीपेक्षा लवकरच धरण भरणार आहे.जिल्ह्यातील इतर धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. कण्हेरमध्ये ८.३० टीएमसी साठा असून, ५०० क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.

उरमोडी धरणही ७.८६ टीएमसी भरले असून, २,३७० क्युसेक पाण्याची आवक होऊन ४०० क्युसेक विसर्ग झाला आहे. तारळी परिसरातही पाऊस सुरू असून, धरणसाठा ५.९ टीएमसी इतका झाला आहे. धरणातून २,५८१ क्युसेक पाण्याचा विसर्ग झाला आहे.धरणक्षेत्रातील २४ तासांतील व एकूण पाऊस मिलिमीटरमध्येधोम ०३ (४७३)कोयना ५५ (३१३८)बलकवडी ३८(१६९०)कण्हेर ११ (५५६)उरमोडी २९ (८१७)तारळी ३४ (१४९३)साताऱ्यात ऊन पावसाचा खेळ...सातारा शहर आणि परिसरात तीन आठवड्यांपासून पाऊस कोसळत आहे. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडताना छत्री घेऊन, रेनकोट घालून बाहेर पडावे लागत आहे. शनिवारी सकाळीही पाऊस झाला. तर काही वेळानंतर ऊन पडले होते.

टॅग्स :monsoon 2018मान्सून 2018Satara areaसातारा परिसर