शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

ग्रहण धोकादायक नसते, मात्र ग्रहण पाळणे धोकादायक होऊ शकते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 20:35 IST

सातारा : येथील चार भिंती परिसरात गुरुवारी सकाळी आठ वाजता साताऱ्यातील जिज्ञासू नागरिक व अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते ग्रहण ...

ठळक मुद्देअंनिसचा चार भिंतीवर कृतिशील उपक्रम

सातारा : येथील चार भिंती परिसरात गुरुवारी सकाळी आठ वाजता साताऱ्यातील जिज्ञासू नागरिक व अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते ग्रहण पाहण्यासाठी जमले. अंनिस कार्यकर्ते उद्धव शिंगटे यांनी ग्रहताऱ्यांची उपस्थितांना माहिती दिली व शंकांचे निरसन केले.

ग्रहण पाहण्यासाठी दुर्बीण आणण्यात आली होती. मात्र, ढगाळ वातावरणामुळे ग्रहण पाहता आले नाही. परंतु ग्रहताºयांची माहिती ऐकून सर्वजण खूश झाले. ग्रहण काळात सर्वांनी नाष्टाही केला. असा कृतिशील कार्यक्रम सकाळी ८ ते ११ वाजेपर्यंत सुरू होता.

यावेळी राज्य प्रधान सचिव प्रशांत पोतदार म्हणाले, ‘ज्यावेळी चंद्रामुळे सूर्य अंशत: झाकला जातो, त्याला खंडग्रास सूर्यग्रहण म्हटले जाते. अवकाशातील सूयाभोवती अंधश्रद्धांचा किती वेढा रे. नव्या युगाचे नायक आम्ही. अज्ञानाच्या बेड्या तोडा रे,’ असे आवानही त्यांनी यावेळी केले. ‘ग्रहण म्हणजे खेळ सावल्यांचा. यातून कोणतेही नवीन व धोकादायक किरण निर्माण होत नाहीत. अन्नपाणी दूषित होत नाही. ओठ फाटणे यासारखे गंभीर व्यंग जनुकीय दोषांमुळे व अन्य घटकाच्या कमतरतेमुळे होते. घराची सावली आपल्यावर, झाडाची सावली प्राण्यांच्यावर पडते. अंगावर मच्छर बसतो एवढाच काय बदल. कुठे सूर्य कुठे चंद्र हे सारे सावल्यांचे खेळ आहे; पण माणूस अजब आहे. एकविसाव्या शतकात ग्रहणाविषयी अंधश्रद्धा बाळगतो. बिचाºया गर्भवतीला उपाशीपोटी ठेवून आई आणि बाळाच्या जीवाशी खेळ खेळतो.

आमच्या शिकल्या सवरलेल्या महिलापण हे करताना दिसतात. पुस्तकातले विज्ञान पुस्तकातच राहते. महिलांची वैचारिक जडणघडण फार महत्त्वाची आहे. महिलांनी निर्भय बनले पाहिजे. अघोरी प्रथा सोडून दिल्या पाहिजेत,’ असे मत वंदना माने यांनी व्यक्त केले. यावेळी नीलेश पंडित, शहा पती-पत्नी व साता-यातील नागरिक उपस्थित होते. अंनिस कार्यकर्ते प्रकाश खटावकर यांनी विशेष परिश्रम घेतले. जयप्रकाश जाधव, दशरथ रणदिवे, भगवान रणदिवे पती-पत्नी उपस्थित होते. 

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAnis Ahemadअनिस अहमद