शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

दुष्काळी झळा वाढल्या, जनावरांना चारा नाही; ६० गावे, ३४५ वाड्यांना टॅंकर

By नितीन काळेल | Updated: August 17, 2023 19:58 IST

माण तालुक्यात भीषणता; शेतकऱ्यांची परवड; छावणीची मागणी

सातारा : पश्चिम भागात धो-धो कोसळणारा पाऊस पूर्वेकडे वाट पाहूनही आला नाही. पावसाळ्यातील अडीच महिन्यात ओढ्यालाही पाणी नाही. त्यामुळे आज पूर्व दुष्काळी भागात शेतकऱ्यांची जनावरे जगविण्यासाठी परवड सुरू आहे. त्यामुळे शासनाने लवकर चारा छावणी सुरु करण्याची मागणी होत आहे. तर जिल्ह्यात सध्या ६० गावे आणि ३४५ वाड्यांना टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. यामध्ये आणखी वाढ होणार आहे. 

जिल्ह्यात किमान पाच वर्षांतून एकदातरी पूर्व भागाकडे पर्जनम्यान कमी राहते. यंदाही तशीच परिस्थिती निर्माण झालेली आहे. पावसाळ्याचे अडीच महिने उलटून गेले आहेत. पण, पश्चिम भाग वगळता दुष्काळी भागाकडे वरुणराजाची वक्रदृष्टीच राहिली आहे. त्यातच मागील १० दिवसांपासून जिल्ह्यात सर्वत्रच दडी आहे. त्यामुळे मोठी धरणेही भरली नाहीत. यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झालेले आहे. अशातच दुष्काळी तालुक्यात भीषणता अधिक वाढत चालली आहे. जनावरांचा चारा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. यामुळे बळीराजाची आता परवड सुरू असल्याचे भीषण वास्तव समोर येत आहे. 

सध्यस्थितीत जिल्ह्यात सर्वात अधिक भीषणता ही माण तालुक्यात सुरू आहे. तालुक्यात १०५ गावे असताना त्यातील ४२ गावांना आणि ३०८ वाड्यांना टॅंकरच्या पाण्याचा आधार आहे. यावर जवळपास ७० हजार नागरिकांची तहान अवलंबून आहे. या लोकांना आणि जनावरांना ४८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तरीही पुरेसे पाणी मिळत नाही. परिणामी पाण्यासाठी रानोमाळ भटकंतीची वेळ लोकांवर आलेली आहे. त्याचबरोबर खटाव तालुक्यात टंचाईची स्थिती कमी आहे.

चार गावांत टंचाई असून साडे हजार नागरिकांना चार टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जातोय. फलटण तालुक्यातीलही ६ गावे आणि ३७ वाड्यांची तहान टॅंकरच्या पाण्यानेच भागत आहे. तालुक्यातील १४ हजार जनावरांनाही टॅंकरच्याच पाण्याचा आधार आहे. कोरेगाव तालुक्यातही ६ गावांत टंचाई निर्माण झालेली आहे. या गावांसाठी तीन टॅंकर सुरू आहेत. तर वाई तालुक्यातील दोन गावांसाठी टॅंकर सुरू आहे. जिल्ह्यातील पाच तालुक्यात टंचाई आहे.  

टॅग्स :satara-acसाताराdroughtदुष्काळ