शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

साथीच्या रोगाने जनावरे दगावली माण तालुका : घटसर्पाची लागण झाल्याचा प्राथमिक अंदाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 21:25 IST

‘आला पावसाळा, आरोग्य सांभाळा’ असं माणसाप्रमाणेच पाळीव जनावरांसाठीही म्हणण्याची वेळ आली आहे. पावसाळ्यात साथीच्या रोगांचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होतो. याचा परिणाम अलीकडच्या काही दिवसांत पशुपक्ष्यांमध्येही

सातारा : ‘आला पावसाळा, आरोग्य सांभाळा’ असं माणसाप्रमाणेच पाळीव जनावरांसाठीही म्हणण्याची वेळ आली आहे. पावसाळ्यात साथीच्या रोगांचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होतो. याचा परिणाम अलीकडच्या काही दिवसांत पशुपक्ष्यांमध्येही दिसू लागला आहे. साथीच्या रोगामुळे गेल्या दीड महिन्यात माण तालुक्यातील ६० हून अधिक जनावरे दगावल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे शासनस्तरावर पशुसंवर्धन विभागाकडून साथीच्या रोगांवर नियंत्रण आण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याच्या सूचना जिल्हा परिषदेकडून देण्यात आल्या आहेत.

माण तालुक्यात साथीच्या रोगामुळे दगावलेल्या जनावरांमुळे शेतक ऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकºयांनी जनावरांचा गोठा रोज स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे जनावरांना साथीची लागण होणार नसल्याचे तज्ज्ञ सांगतात. माणमध्ये दगावलेल्या जनावरांना घटसर्प या रोगांची लागण झाल्याचा प्राथमिक अंदाज वैद्यकीय सूत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना वर्तविला आहे.

वातावरणातील बदलामुळे साथीचे रोग वाढतात. त्याबरोबरच गोठ्यामधील जनावरांना साथीच्या रोगांची लागण झाली असेल, तर त्याची बाधा अन्य निरोगी जनावरांना होऊ शकते. त्यामुळे आजारी जनावरांना निरोगी जनावरांपासून वेगळे ठिकाणी बांधणे गरजेचे आहे. गोठ्यातील जनावरांचा मलमूत्र व स्त्राव याची योग्य ती विल्हेवाट लावणे गरजेचे आहे.प्रत्येक शेतकºयाने आपल्या जनावरांच्या खाद्यपदार्थामध्ये सोड्याचा वापर करावा, असे सांगण्यात येते. सोडा हा साथीच्या रोगांवर प्रतिबंधात्मक उपाय असल्याचे तज्ज्ञ सांगतात. शेतकºयांने कळपात किव्ाां नवीन जनावर आणताना १० ते १५ दिवस स्वतंत्र्य ठेवून त्या जनावरांना कळपात आणण्याचा सल्लाही तज्ज्ञ देतात.माणमध्ये अधिकाºयांचा तीन दिवस मुक्कामगेल्या दीड महिन्यात माण तालुक्यात ६० हून अधिक जनावरे दगावले आहेत. हा प्रकार घडल्याने जिल्'ातील पशुसंवर्धन विभाग खडबडून जागा झाला आहे. माण तालुक्यात या विभागाचे अधिकारी तीन दिवस मुक्कामी होते. या परिसरात दगावलेल्या प्रत्येक जनावरांची संपूर्ण माहिती गोळा करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. 

माण तालुक्यातील दगावलेल्या जनावरांची संपूर्ण माहिती घेत आहे. त्या जनावरांचे रक्त तपासणीसाठी पुणे येथे पाठवले आहे. जनावरे कशाने दगावली, याची माहिती लवकरच मिळेल. अन्य तालुक्यांतील शेतकºयांनी आपल्या जनावरांची देखभाल घेणे गरजेचे आहे. ज्या शेतकºयांनी जनावरांना लसीकरण केलेले नाही त्यांनी जनावरांना लसीकरणासाठी संबंधित पशुवैद्यकीय दवाखान्यात घेऊन जावे. - विनोद पवार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, सातारा

 

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरDeathमृत्यूMedicalवैद्यकीय