शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

साथीच्या रोगाने जनावरे दगावली माण तालुका : घटसर्पाची लागण झाल्याचा प्राथमिक अंदाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 21:25 IST

‘आला पावसाळा, आरोग्य सांभाळा’ असं माणसाप्रमाणेच पाळीव जनावरांसाठीही म्हणण्याची वेळ आली आहे. पावसाळ्यात साथीच्या रोगांचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होतो. याचा परिणाम अलीकडच्या काही दिवसांत पशुपक्ष्यांमध्येही

सातारा : ‘आला पावसाळा, आरोग्य सांभाळा’ असं माणसाप्रमाणेच पाळीव जनावरांसाठीही म्हणण्याची वेळ आली आहे. पावसाळ्यात साथीच्या रोगांचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होतो. याचा परिणाम अलीकडच्या काही दिवसांत पशुपक्ष्यांमध्येही दिसू लागला आहे. साथीच्या रोगामुळे गेल्या दीड महिन्यात माण तालुक्यातील ६० हून अधिक जनावरे दगावल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे शासनस्तरावर पशुसंवर्धन विभागाकडून साथीच्या रोगांवर नियंत्रण आण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याच्या सूचना जिल्हा परिषदेकडून देण्यात आल्या आहेत.

माण तालुक्यात साथीच्या रोगामुळे दगावलेल्या जनावरांमुळे शेतक ऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकºयांनी जनावरांचा गोठा रोज स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे जनावरांना साथीची लागण होणार नसल्याचे तज्ज्ञ सांगतात. माणमध्ये दगावलेल्या जनावरांना घटसर्प या रोगांची लागण झाल्याचा प्राथमिक अंदाज वैद्यकीय सूत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना वर्तविला आहे.

वातावरणातील बदलामुळे साथीचे रोग वाढतात. त्याबरोबरच गोठ्यामधील जनावरांना साथीच्या रोगांची लागण झाली असेल, तर त्याची बाधा अन्य निरोगी जनावरांना होऊ शकते. त्यामुळे आजारी जनावरांना निरोगी जनावरांपासून वेगळे ठिकाणी बांधणे गरजेचे आहे. गोठ्यातील जनावरांचा मलमूत्र व स्त्राव याची योग्य ती विल्हेवाट लावणे गरजेचे आहे.प्रत्येक शेतकºयाने आपल्या जनावरांच्या खाद्यपदार्थामध्ये सोड्याचा वापर करावा, असे सांगण्यात येते. सोडा हा साथीच्या रोगांवर प्रतिबंधात्मक उपाय असल्याचे तज्ज्ञ सांगतात. शेतकºयांने कळपात किव्ाां नवीन जनावर आणताना १० ते १५ दिवस स्वतंत्र्य ठेवून त्या जनावरांना कळपात आणण्याचा सल्लाही तज्ज्ञ देतात.माणमध्ये अधिकाºयांचा तीन दिवस मुक्कामगेल्या दीड महिन्यात माण तालुक्यात ६० हून अधिक जनावरे दगावले आहेत. हा प्रकार घडल्याने जिल्'ातील पशुसंवर्धन विभाग खडबडून जागा झाला आहे. माण तालुक्यात या विभागाचे अधिकारी तीन दिवस मुक्कामी होते. या परिसरात दगावलेल्या प्रत्येक जनावरांची संपूर्ण माहिती गोळा करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. 

माण तालुक्यातील दगावलेल्या जनावरांची संपूर्ण माहिती घेत आहे. त्या जनावरांचे रक्त तपासणीसाठी पुणे येथे पाठवले आहे. जनावरे कशाने दगावली, याची माहिती लवकरच मिळेल. अन्य तालुक्यांतील शेतकºयांनी आपल्या जनावरांची देखभाल घेणे गरजेचे आहे. ज्या शेतकºयांनी जनावरांना लसीकरण केलेले नाही त्यांनी जनावरांना लसीकरणासाठी संबंधित पशुवैद्यकीय दवाखान्यात घेऊन जावे. - विनोद पवार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, सातारा

 

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरDeathमृत्यूMedicalवैद्यकीय