शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

अंगापूर, कोडाेलीत गैरव्यवहाराचा आरोप असलेले रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:43 IST

सातारा : अंगापूर, कोडोलीमध्ये गैरव्यवहारांचे आरोप असलेले निवडणूक रिंगणात उतरले असून ते ‘मी पुन्हा येईन’च्या वल्गना करत आहेत, असा ...

सातारा : अंगापूर, कोडोलीमध्ये गैरव्यवहारांचे आरोप असलेले निवडणूक रिंगणात उतरले असून ते ‘मी पुन्हा येईन’च्या वल्गना करत आहेत, असा आरोप राष्ट्रवादीचे श्यामराव चोरगे व डॉ. विक्रम कणसे यांनी केला आहे.

ग्रामीण भागाच्या विकासामध्ये ग्रामपंचायतींचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. या ग्रामपंचायती हा गावाचा कणा आहेत, अशा ग्रामपंचायतींमध्ये स्वत: सत्ता उपभोगून, त्याद्वारे गैरव्यवहार करून गावाला लुटणारे आता पुन्हा निवडणूक रिंगणात उतरले आहेत. सातारा तालुक्यातील अंगापूर आणि कोडोलीमध्ये तसे चित्र स्पष्ट दिसत असून, गैरव्यवहारांचे सूत्रधार आता निवडणुकीद्वारे ‘मी पुन्हा येईन... मी पुन्हा येईन’ अशा वल्गना करत आहेत. सामान्य मतदारांनी याबाबत वस्तुस्थितीची माहिती घ्यावी आणि त्यांना थेट मतपेटीतून धडा शिकवावा, असे आवाहन श्यामराव चोरगे व डॉ. विक्रम कणसे यांनी केले आहे.

कोडोलीचा विषय तर फार वेगळाच आहे, असे म्हणावे लागणार आहे. ज्यांना जनतेने खुल्या मनाने निवडून दिले, ज्यांनी गावाचा विकास साधायचा होता, त्यांनी ग्रामपंचायतीला लुटण्याचे काम केले आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनामध्येदेखील कोडोलीच्या विषयाने गदारोळ केला होता. कोडोलीमध्ये सरपंच, उपसरपंच व अन्य दोन सदस्यांनी आर्थिक गैरव्यवहार केला असल्याचे समोर आल्यानंतर पुणे विभागीय आयुक्तांनी २४ फेब्रुवारी २०२० रोजी एक आदेश काढून, या मंडळींना पुढील सहा वर्षे निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविले होते. सहा वर्षे जर आपण थांबलो तर आपला स्वत:चा आणि बगलबच्चांचा कसा विकास होणार, या भीतीने राजकीय कुरघोड्या करत या मंडळींनी ६ मार्च २०२० रोजी मंत्रालयातून आपल्यावरील कारवाईला स्थगिती मिळवली होती. ही स्थगिती देत असतानाच ११ मार्च २०२० रोजी वरील विषयांची सुनावणी पूर्ण होईपर्यंत ग्रामपंचायतीच्या बैठकीमध्ये आर्थिक आणि धोरणात्मक निर्णय घेता येणार नाहीत, असे ग्रामविकासमंत्र्यांनी स्पष्ट निर्देशदेखील दिले होते, असेही चोरगे यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

चौकट

न्यायालयात दाद मागणार

या निवडणुकीच्या माध्यमातून आरोप असलेले लोक जरी विजयी झाले तरी आम्ही न्यायालयात याविषयी निश्‍चित दाद मागणार आहोत. ज्यांनी आर्थिक गैरव्यवहार केले आहेत, त्यांना शिक्षा ही मिळालीच पाहिजे, यासाठी आम्ही न्यायालयीन लढाई लढणार असून, न्यायालयाच्या आदेशाद्वारे आम्ही या मंडळींना सहा वर्षे निवडणूक लढविण्यास अपात्र ठरवू, असा विश्‍वास श्यामराव चोरगे व डॉ. विक्रम कणसे यांनी व्यक्त केला. राजकीय आश्रय मिळाला म्हणजे जिंकलो असे नाही, तर जनतेच्या न्यायालयात त्यांना आपली जागा कळून येईल, असेही श्यामराव चोरगे व डॉ. विक्रम कणसे यांनी नमूद केले.