शहरं
Join us  
Trending Stories
1
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
2
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
3
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
4
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
5
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
6
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
7
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
8
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
9
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
10
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
11
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
12
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
13
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
14
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
15
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
16
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
17
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
18
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
19
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
20
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल

अंगापूर, कोडाेलीत गैरव्यवहाराचा आरोप असलेले रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:43 IST

सातारा : अंगापूर, कोडोलीमध्ये गैरव्यवहारांचे आरोप असलेले निवडणूक रिंगणात उतरले असून ते ‘मी पुन्हा येईन’च्या वल्गना करत आहेत, असा ...

सातारा : अंगापूर, कोडोलीमध्ये गैरव्यवहारांचे आरोप असलेले निवडणूक रिंगणात उतरले असून ते ‘मी पुन्हा येईन’च्या वल्गना करत आहेत, असा आरोप राष्ट्रवादीचे श्यामराव चोरगे व डॉ. विक्रम कणसे यांनी केला आहे.

ग्रामीण भागाच्या विकासामध्ये ग्रामपंचायतींचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. या ग्रामपंचायती हा गावाचा कणा आहेत, अशा ग्रामपंचायतींमध्ये स्वत: सत्ता उपभोगून, त्याद्वारे गैरव्यवहार करून गावाला लुटणारे आता पुन्हा निवडणूक रिंगणात उतरले आहेत. सातारा तालुक्यातील अंगापूर आणि कोडोलीमध्ये तसे चित्र स्पष्ट दिसत असून, गैरव्यवहारांचे सूत्रधार आता निवडणुकीद्वारे ‘मी पुन्हा येईन... मी पुन्हा येईन’ अशा वल्गना करत आहेत. सामान्य मतदारांनी याबाबत वस्तुस्थितीची माहिती घ्यावी आणि त्यांना थेट मतपेटीतून धडा शिकवावा, असे आवाहन श्यामराव चोरगे व डॉ. विक्रम कणसे यांनी केले आहे.

कोडोलीचा विषय तर फार वेगळाच आहे, असे म्हणावे लागणार आहे. ज्यांना जनतेने खुल्या मनाने निवडून दिले, ज्यांनी गावाचा विकास साधायचा होता, त्यांनी ग्रामपंचायतीला लुटण्याचे काम केले आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनामध्येदेखील कोडोलीच्या विषयाने गदारोळ केला होता. कोडोलीमध्ये सरपंच, उपसरपंच व अन्य दोन सदस्यांनी आर्थिक गैरव्यवहार केला असल्याचे समोर आल्यानंतर पुणे विभागीय आयुक्तांनी २४ फेब्रुवारी २०२० रोजी एक आदेश काढून, या मंडळींना पुढील सहा वर्षे निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविले होते. सहा वर्षे जर आपण थांबलो तर आपला स्वत:चा आणि बगलबच्चांचा कसा विकास होणार, या भीतीने राजकीय कुरघोड्या करत या मंडळींनी ६ मार्च २०२० रोजी मंत्रालयातून आपल्यावरील कारवाईला स्थगिती मिळवली होती. ही स्थगिती देत असतानाच ११ मार्च २०२० रोजी वरील विषयांची सुनावणी पूर्ण होईपर्यंत ग्रामपंचायतीच्या बैठकीमध्ये आर्थिक आणि धोरणात्मक निर्णय घेता येणार नाहीत, असे ग्रामविकासमंत्र्यांनी स्पष्ट निर्देशदेखील दिले होते, असेही चोरगे यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

चौकट

न्यायालयात दाद मागणार

या निवडणुकीच्या माध्यमातून आरोप असलेले लोक जरी विजयी झाले तरी आम्ही न्यायालयात याविषयी निश्‍चित दाद मागणार आहोत. ज्यांनी आर्थिक गैरव्यवहार केले आहेत, त्यांना शिक्षा ही मिळालीच पाहिजे, यासाठी आम्ही न्यायालयीन लढाई लढणार असून, न्यायालयाच्या आदेशाद्वारे आम्ही या मंडळींना सहा वर्षे निवडणूक लढविण्यास अपात्र ठरवू, असा विश्‍वास श्यामराव चोरगे व डॉ. विक्रम कणसे यांनी व्यक्त केला. राजकीय आश्रय मिळाला म्हणजे जिंकलो असे नाही, तर जनतेच्या न्यायालयात त्यांना आपली जागा कळून येईल, असेही श्यामराव चोरगे व डॉ. विक्रम कणसे यांनी नमूद केले.