शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

'आंबेनळी दुर्घटनेतील 30 मृतांच्या वारसांना विनाअट अनुकंपा नोकरी द्या'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2018 20:23 IST

आंबेनळी घाटात मृत्युमुखी पडलेल्या कोकण कृषी विद्यापीठातील मृतांच्या वारसांना विनाअट अनुकंपा नोकरी द्यावी, अशी आग्रही मागणी कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपचे आमदार निरंजन वसंत डावखरे यांनी केली आहे.

ठाणे : आंबेनळी घाटात मृत्युमुखी पडलेल्या कोकण कृषी विद्यापीठातील मृतांच्या वारसांना विनाअट अनुकंपा नोकरी द्यावी, अशी आग्रही मागणी कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपचे आमदार निरंजन वसंत डावखरे यांनी केली आहे. त्यासाठी डावखरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन दिले आहे. या विद्यापीठातील कर्मचाऱ्यांच्या बसला दुर्दैवी अपघात झाला होता. 

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांच्या बसला 28 जुलै रोजी भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात 30  कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. या घटनेने 30 कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. या कुटुंबांवर आभाळ कोसळले असून, त्यांना समाजाबरोबरच सरकारनेही आधार देण्याची नितांत आवश्यकता आहे. राज्य सरकारने मृतांच्या वारसाला प्रत्येकी चार लाख रुपये देण्याची घोषणा केली. मात्र, त्यांना तातडीने नोकरी देणे गरजेचे आहे, याकडे आमदार डावखरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधले आहे. राज्य सरकारच्या धोरणानुसार, मृत कुटुंबांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर नोकरी मिळू शकते. मात्र, अनुकंपा तत्वावरील सेवेत समाविष्ट होण्यासाठी सर्व नियम व निकषांची अंमलबजावणी केली जाते. या प्रकरणात एकाच संस्थेतील 30 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे विशेष बाब म्हणून 30 मृतांच्या वारसांना विनाअट अनुकंपा नोकरीत समाविष्ट करावे, अशी मागणी आमदार निरंजन डावखरे यांनी केली आहे. 

टॅग्स :Satara Bus Accidentसातारा बस अपघातDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNiranjan Davkhareनिरंजन डावखरे