शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

'आंबेनळी दुर्घटनेतील 30 मृतांच्या वारसांना विनाअट अनुकंपा नोकरी द्या'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2018 20:23 IST

आंबेनळी घाटात मृत्युमुखी पडलेल्या कोकण कृषी विद्यापीठातील मृतांच्या वारसांना विनाअट अनुकंपा नोकरी द्यावी, अशी आग्रही मागणी कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपचे आमदार निरंजन वसंत डावखरे यांनी केली आहे.

ठाणे : आंबेनळी घाटात मृत्युमुखी पडलेल्या कोकण कृषी विद्यापीठातील मृतांच्या वारसांना विनाअट अनुकंपा नोकरी द्यावी, अशी आग्रही मागणी कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपचे आमदार निरंजन वसंत डावखरे यांनी केली आहे. त्यासाठी डावखरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन दिले आहे. या विद्यापीठातील कर्मचाऱ्यांच्या बसला दुर्दैवी अपघात झाला होता. 

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांच्या बसला 28 जुलै रोजी भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात 30  कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. या घटनेने 30 कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. या कुटुंबांवर आभाळ कोसळले असून, त्यांना समाजाबरोबरच सरकारनेही आधार देण्याची नितांत आवश्यकता आहे. राज्य सरकारने मृतांच्या वारसाला प्रत्येकी चार लाख रुपये देण्याची घोषणा केली. मात्र, त्यांना तातडीने नोकरी देणे गरजेचे आहे, याकडे आमदार डावखरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधले आहे. राज्य सरकारच्या धोरणानुसार, मृत कुटुंबांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर नोकरी मिळू शकते. मात्र, अनुकंपा तत्वावरील सेवेत समाविष्ट होण्यासाठी सर्व नियम व निकषांची अंमलबजावणी केली जाते. या प्रकरणात एकाच संस्थेतील 30 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे विशेष बाब म्हणून 30 मृतांच्या वारसांना विनाअट अनुकंपा नोकरीत समाविष्ट करावे, अशी मागणी आमदार निरंजन डावखरे यांनी केली आहे. 

टॅग्स :Satara Bus Accidentसातारा बस अपघातDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNiranjan Davkhareनिरंजन डावखरे