शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

चोराच्या वाडीत ‘आनंदा’चा ‘पूर’

By admin | Updated: February 4, 2015 00:06 IST

सरकार दरबारी नावबदल : गावकऱ्यांच्या वीस वर्षांच्या प्रयत्नांना अखेर यश

सातारा : आपल्या गावाला चोराची वाडी म्हणून हिणवावं, असं कोणाला वाटेल बरे! पण हे दुखरं सत्य गेली वीस वर्षांपासून आपल्या काळजात घेऊन वावरणारं एक गाव वाई तालुक्यात काल-परवापर्यंत होतं. ‘चोराची वाडी’ या नावानं गावकऱ्यांची अक्षरश: झोपमोड केली होती. मुलांच्या शाळेच्या दाखल्यावर, सातबारावर तसेच इतर शासकीय कागदपत्रांवर ‘चोराची वाडी’ असा उल्लेख असल्यामुळे गावकऱ्यांना अपमानास्पद वाटत होते. गावाचं नाव बदल्यासाठी गावकरी वीस वर्षांपासून धडपडत होते. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले अन् आता ‘चोराची वाडी’ ही आता ‘आनंदपूर’ नावानं ओळखली जाणार असल्याने गावकऱ्यांच्या आनंदाला जणू भरतं आलं आहे.वाई तालुक्यातील चोराची वाडी गावाची कथा मोठी मजेशीर आहे. गावाला चोराची वाडी हे नाव कसं मिळालं, याबद्दल सरपंच अंकुश सकपाळ यांनी सांगितलं की, खंडाळा तालुक्यातील सध्याच्या वाठार कॉलनी येथील साळुंखे आडनावाची काही कुटुंबं याठिकाणी वास्तव्यास आली. त्यांचे पूर्वीचे आडनाव ‘चोर’ असे होते. आजही वाठार कॉलनी या गावाला ‘चोराचे भादे’ नावाने ओळखले जाते. ‘चोर’ आडनावांच्या कुटुंबांची संख्या जास्त असल्यामुळे या वाडीला ‘चोराची वाडी’ असे संबोधले जाऊ लागले. हीच ओळख आजपर्यंत कायम होती. जुने दाखले, शेतीचे उतारे पाहिले तर आजही ‘चोराची वाडी’ असा उल्लेख आढळतो. लोक आपल्या गावाला चोराची वाडी म्हणून ओळखत असल्याने जास्त अपमानास्पद वाटत होते. सरकारी कागदोपत्री तसेच पत्ता सांगतानाही ‘चोराची वाडी’ हा उल्लेख गावकऱ्यांना अपमानास्पद वाटत होता. केवळ नावामुळं आपल्या गावाची बदनामी होते, असं ग्रामस्थांना मनापासून वाटत होते. त्यामुळे गावाची ही ओळख पुसली पाहिजे, यासाठी वीस वर्षांपूर्वी गावाने एकत्र येऊन ठराव केला होता. मात्र, शासकीय पातळीवर पाठपुरावा होत नव्हता. मात्र, जिल्हा परिषद सदस्य शशिकांत पवार यांनी याकामी पुढाकार घेतला. पवार यांनी गावाच्या नावात बदल व्हावा, असा ठराव ग्रामसभेत मंजूर करून घेतला. त्यानंतर पुढे वाई पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या सभेत हा ठराव मंजूर करून घेण्यात आला. एक वर्ष पाठपुरावा केल्यानंतर ७ जानेवारी २०१५ रोजी ग्रामपंचायतीला सामान्य प्रशासन मंत्रालयातून गावाचे नाव बदलण्यात आल्याचे पत्राने कळविण्यात आले आहे. (प्रतिनिधी)गावाच्या नावात बदल व्हावा, यासाठी प्रशासकीय पातळीवर वर्षभरापासून प्रयत्न केले. यासाठी आमदार मकरंद पाटील व जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर यांनी सहकार्य केले. शासकीय कागदपत्रांची पूर्तता पूर्ण होऊन नुकतेच गॅझेटही झाले आहे. यापुढे चोराची वाडी’ हे गाव ‘आनंदपूर’ या नावाने ओळखले जाईल, हे मोठे यश आहे.- शशिकांत पवार, सदस्य, जिल्हा परिषद, सातारामुलांच्या दाखल्यावर चोराची वाडी, खाते उताऱ्यावर चोराची वाडी, सातबारावर चोराची वाडी.... या उल्लेखामुळं अपमानास्पद वाटत होतं. मुलांना शाळेत लाजिरवाणं वाटायचं. ही ओळख कायमची पुसली जावी आणि गावाला चांगल्या नावानं ओळखलं जावं, यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. ‘आनंदपूर’ नावामुळं गाव आनंदी झालं आहे. - अंकुश सकपाळ, सरपंचपै-पाहुण्यात हसं‘चोराची वाडी’ हे बोचरं नाव मनाला सतत वेदना देत होतं. पै-पाहुण्यांतही होणारं हसं अन् ओळखी-पाळखीच्यांकडून सतत होणारी मस्करी यामुळे गावकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद जणू मावळला होता. यासाठीच की काय ग्रामस्थांनी ‘चोराची वाडी’चं नाव बदलून ‘आनंदपूर’ ठेवण्याचं योजलं होतं. शासकीय कागदोपत्री गावाचं नाव आता बदलल्यामुळं साऱ्या गावात नावाप्रमाणेच ‘आनंदा’चा जणू ‘पूर’ आल्याचं वातावरण निर्माण झालं आहे.