शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

चोराच्या वाडीत ‘आनंदा’चा ‘पूर’

By admin | Updated: February 4, 2015 00:06 IST

सरकार दरबारी नावबदल : गावकऱ्यांच्या वीस वर्षांच्या प्रयत्नांना अखेर यश

सातारा : आपल्या गावाला चोराची वाडी म्हणून हिणवावं, असं कोणाला वाटेल बरे! पण हे दुखरं सत्य गेली वीस वर्षांपासून आपल्या काळजात घेऊन वावरणारं एक गाव वाई तालुक्यात काल-परवापर्यंत होतं. ‘चोराची वाडी’ या नावानं गावकऱ्यांची अक्षरश: झोपमोड केली होती. मुलांच्या शाळेच्या दाखल्यावर, सातबारावर तसेच इतर शासकीय कागदपत्रांवर ‘चोराची वाडी’ असा उल्लेख असल्यामुळे गावकऱ्यांना अपमानास्पद वाटत होते. गावाचं नाव बदल्यासाठी गावकरी वीस वर्षांपासून धडपडत होते. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले अन् आता ‘चोराची वाडी’ ही आता ‘आनंदपूर’ नावानं ओळखली जाणार असल्याने गावकऱ्यांच्या आनंदाला जणू भरतं आलं आहे.वाई तालुक्यातील चोराची वाडी गावाची कथा मोठी मजेशीर आहे. गावाला चोराची वाडी हे नाव कसं मिळालं, याबद्दल सरपंच अंकुश सकपाळ यांनी सांगितलं की, खंडाळा तालुक्यातील सध्याच्या वाठार कॉलनी येथील साळुंखे आडनावाची काही कुटुंबं याठिकाणी वास्तव्यास आली. त्यांचे पूर्वीचे आडनाव ‘चोर’ असे होते. आजही वाठार कॉलनी या गावाला ‘चोराचे भादे’ नावाने ओळखले जाते. ‘चोर’ आडनावांच्या कुटुंबांची संख्या जास्त असल्यामुळे या वाडीला ‘चोराची वाडी’ असे संबोधले जाऊ लागले. हीच ओळख आजपर्यंत कायम होती. जुने दाखले, शेतीचे उतारे पाहिले तर आजही ‘चोराची वाडी’ असा उल्लेख आढळतो. लोक आपल्या गावाला चोराची वाडी म्हणून ओळखत असल्याने जास्त अपमानास्पद वाटत होते. सरकारी कागदोपत्री तसेच पत्ता सांगतानाही ‘चोराची वाडी’ हा उल्लेख गावकऱ्यांना अपमानास्पद वाटत होता. केवळ नावामुळं आपल्या गावाची बदनामी होते, असं ग्रामस्थांना मनापासून वाटत होते. त्यामुळे गावाची ही ओळख पुसली पाहिजे, यासाठी वीस वर्षांपूर्वी गावाने एकत्र येऊन ठराव केला होता. मात्र, शासकीय पातळीवर पाठपुरावा होत नव्हता. मात्र, जिल्हा परिषद सदस्य शशिकांत पवार यांनी याकामी पुढाकार घेतला. पवार यांनी गावाच्या नावात बदल व्हावा, असा ठराव ग्रामसभेत मंजूर करून घेतला. त्यानंतर पुढे वाई पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या सभेत हा ठराव मंजूर करून घेण्यात आला. एक वर्ष पाठपुरावा केल्यानंतर ७ जानेवारी २०१५ रोजी ग्रामपंचायतीला सामान्य प्रशासन मंत्रालयातून गावाचे नाव बदलण्यात आल्याचे पत्राने कळविण्यात आले आहे. (प्रतिनिधी)गावाच्या नावात बदल व्हावा, यासाठी प्रशासकीय पातळीवर वर्षभरापासून प्रयत्न केले. यासाठी आमदार मकरंद पाटील व जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर यांनी सहकार्य केले. शासकीय कागदपत्रांची पूर्तता पूर्ण होऊन नुकतेच गॅझेटही झाले आहे. यापुढे चोराची वाडी’ हे गाव ‘आनंदपूर’ या नावाने ओळखले जाईल, हे मोठे यश आहे.- शशिकांत पवार, सदस्य, जिल्हा परिषद, सातारामुलांच्या दाखल्यावर चोराची वाडी, खाते उताऱ्यावर चोराची वाडी, सातबारावर चोराची वाडी.... या उल्लेखामुळं अपमानास्पद वाटत होतं. मुलांना शाळेत लाजिरवाणं वाटायचं. ही ओळख कायमची पुसली जावी आणि गावाला चांगल्या नावानं ओळखलं जावं, यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. ‘आनंदपूर’ नावामुळं गाव आनंदी झालं आहे. - अंकुश सकपाळ, सरपंचपै-पाहुण्यात हसं‘चोराची वाडी’ हे बोचरं नाव मनाला सतत वेदना देत होतं. पै-पाहुण्यांतही होणारं हसं अन् ओळखी-पाळखीच्यांकडून सतत होणारी मस्करी यामुळे गावकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद जणू मावळला होता. यासाठीच की काय ग्रामस्थांनी ‘चोराची वाडी’चं नाव बदलून ‘आनंदपूर’ ठेवण्याचं योजलं होतं. शासकीय कागदोपत्री गावाचं नाव आता बदलल्यामुळं साऱ्या गावात नावाप्रमाणेच ‘आनंदा’चा जणू ‘पूर’ आल्याचं वातावरण निर्माण झालं आहे.