शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आंबेडकर शाळा प्रवेश दिवस होणार राज्यभर विद्यार्थी दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 16:56 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन एका अर्थाने शैक्षणिक क्रांतीची आणि युगांतराची चाहुलच आहे. ७ नोव्हेंबर १९०० या दिवशी डॉ. आंबेडकर यांनी येथील प्रतापसिंह हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. हा दिवस राज्यभर  विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्यात यावा, असा आदेश राज्य शासनाच्या वतीने काढण्यात आला आहे.

ठळक मुद्देराज्य शासनाच्या वतीने काढण्यात आले परिपत्रक ७ नोव्हेंबरला राज्यभरात दिवस होणार साजराशाळेच्या नोंदवहीत आजही बाल भिवाची स्वाक्षरी

सातारा , दि. २८ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन एका अर्थाने शैक्षणिक क्रांतीची आणि युगांतराची चाहुलच आहे. ७ नोव्हेंबर १९०० या दिवशी डॉ. आंबेडकर यांनी येथील प्रतापसिंह हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. हा दिवस राज्यभर विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्यात यावा, असा आदेश राज्य शासनाच्या वतीने काढण्यात आला आहे.

येथील राजवाडा परिसरात असलेल्या प्रतापसिंह हायस्कूलमध्ये ७ नोव्हेंबर १९०० या दिवशी डॉ. आंबेडकर यांनी शाळेत प्रवेश घेतला. त्यावेळी त्यांचे नाव भिवा असे होते. या शाळेच्या नोंदवहीत १९१४ या क्रमांकासमोर आजही बाल भिवाची स्वाक्षरी आहे.

हा ऐतिहासिक दस्तऐवज शाळा प्रशासनाने जपून ठेवला आहे. डॉ. आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन म्हणजे एका शैक्षणिक क्रांतीची आणि युगांतराची चाहुल म्हटली पाहिजे. त्यांनी शाळेत पाऊल ठेवल्यामुळेच ते स्वत: सुशिक्षित आणि प्रज्ञावंत झाले आणि कोट्यवधी दलित व वंचितांचे उद्धारकर्तेही झाले. ते शाळेत गेल्यामुळे ज्या संविधानाचा आज सर्वात आदर्श संविधान म्हणून जगभर गौरव होत असतो, त्या भारतीय संविधानाचे ते शिल्पकारही ठरले.

परिणामत: भारतीय समाजात स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय ही मानवी मूल्ये रुजली.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा शाळा प्रवेश दिन ही अत्यंत महत्त्वाची आणि इतिहासाला कूस बदलवायला लावणारी क्रांतिकारी घटना ठरते. डॉ. आंबेडकर हे आजीवन विद्यार्थी होते. त्यांनी आपला हा व्यासंग आयुष्याच्या शेवटपर्यंत जपला.

आजचा प्रत्येक विद्यार्थी हा या देशाचे भविष्य आहे. त्यामुळे आदर्श विद्यार्थी निर्माण होणे ही काळाची गरज आहे. शिक्षण हेच उन्नतीचे एकमेव साधन आहे आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या कठोर परिश्रमांची जाण सर्व विद्यार्थ्यांना होण्यासाठी ७ नोव्हेंबर हा दिवस विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

विद्यार्थी दिवस उपक्रमांतर्गत सर्व शाळांमध्ये डॉ. आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित विविध पैलूंवर निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, काव्यवाचन आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

 

शासन निर्णयानुसार यंदा पहिल्यांदाच ७ नोव्हेंबरला विद्यार्थी दिवस साजरा करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्वच शाळांमधून विद्यार्थ्यांचा सहभाग या स्पर्धेत घेण्यासाठी शिक्षकांना आवश्यक त्या सूचना केल्या आहेत. शाळा सुरू झाल्यानंतर याविषयी विद्यार्थ्यांना आवश्यक माहिती देण्यात येईल.

- पुनिता गुरव,शिक्षणाधिकारी, सातारा

राजवाडा येथील प्रतापसिंह हायस्कूल

साताऱ्यात नगरपालिकेच्या स्थापनेनंतर १ आॅगस्ट १८५३ नंतर पालिकेचे १८८४ मध्ये सिटी म्युनिसिपालिटीमध्ये रुपांतर झाले. त्यावेळी मुलांच्या मराठी शाळा ८, हिंदुस्थानी मिश्र शाळा १, रात्रीची शाळा १ व मुलींकरीता १अशा ११ शाळा होत्या.

रात्रीची शाळा मजूर आणि कारागीर लोकांच्या मुलांकरीता होती. पालिकेकडे शिक्षण मंडळ येण्यापूर्वी १८६६ मध्ये  साताऱ्यामध्ये ४ प्राथमिक  शाळा होत्या. त्यामध्ये ५३८ विद्यार्थी होते. १८८३ पर्यंत १0 सरकारी शाळा होत्या. त्यामध्ये १ इंग्रजी शाळा, ७ मराठी मुलांच्या शाळा आणि एक मुलींची शाळा अशी स्थिती होती. 

इंग्रजी शाळा प्रतापसिंह महाराजांच्या कारकिर्दीत सुरु झाली. या शाळेचे मुख्याध्यापक बाळशास्त्री भागवत होते. ही शाळा पूर्वी रंगमहालात होती. १८७१ मध्ये शाळेचे हायस्कुलमध्ये रुपांतर झाले. 

१८७४ साली ही शाळा गव्हर्नमेंट हायस्कूल म्हणून सध्याच्या प्रतापसिंह हायस्कुलमध्ये (जुना राजवाडा) या ठिकाणी सुरु झाली. याच वास्तुमध्ये पालिकेच्या शाळा क्र. १ आणि शाळा क्र. १३ या शाळाही पाचवी ते सातवी आणि पहिली ते चौथी असे शिक्षण देत होत्या. त्यानंतर साताऱ्यात वेगवेगळ्या शिक्षण संस्थांच्या नव्या नव्या शाळा उभ्या राहिल्या.

टॅग्स :SchoolशाळाMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार