शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
2
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
3
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
4
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
5
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल चामखीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
Plane Crash: उड्डाणानंतर काही मिनिटांतच विमान कोसळलं; भयानक घटना कॅमेऱ्यात कैद!
8
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
9
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
10
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
11
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
12
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
13
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
14
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
15
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
16
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
17
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
18
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
19
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
20
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...

आंबेडकर शाळा प्रवेश दिवस होणार राज्यभर विद्यार्थी दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 16:56 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन एका अर्थाने शैक्षणिक क्रांतीची आणि युगांतराची चाहुलच आहे. ७ नोव्हेंबर १९०० या दिवशी डॉ. आंबेडकर यांनी येथील प्रतापसिंह हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. हा दिवस राज्यभर  विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्यात यावा, असा आदेश राज्य शासनाच्या वतीने काढण्यात आला आहे.

ठळक मुद्देराज्य शासनाच्या वतीने काढण्यात आले परिपत्रक ७ नोव्हेंबरला राज्यभरात दिवस होणार साजराशाळेच्या नोंदवहीत आजही बाल भिवाची स्वाक्षरी

सातारा , दि. २८ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन एका अर्थाने शैक्षणिक क्रांतीची आणि युगांतराची चाहुलच आहे. ७ नोव्हेंबर १९०० या दिवशी डॉ. आंबेडकर यांनी येथील प्रतापसिंह हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. हा दिवस राज्यभर विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्यात यावा, असा आदेश राज्य शासनाच्या वतीने काढण्यात आला आहे.

येथील राजवाडा परिसरात असलेल्या प्रतापसिंह हायस्कूलमध्ये ७ नोव्हेंबर १९०० या दिवशी डॉ. आंबेडकर यांनी शाळेत प्रवेश घेतला. त्यावेळी त्यांचे नाव भिवा असे होते. या शाळेच्या नोंदवहीत १९१४ या क्रमांकासमोर आजही बाल भिवाची स्वाक्षरी आहे.

हा ऐतिहासिक दस्तऐवज शाळा प्रशासनाने जपून ठेवला आहे. डॉ. आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन म्हणजे एका शैक्षणिक क्रांतीची आणि युगांतराची चाहुल म्हटली पाहिजे. त्यांनी शाळेत पाऊल ठेवल्यामुळेच ते स्वत: सुशिक्षित आणि प्रज्ञावंत झाले आणि कोट्यवधी दलित व वंचितांचे उद्धारकर्तेही झाले. ते शाळेत गेल्यामुळे ज्या संविधानाचा आज सर्वात आदर्श संविधान म्हणून जगभर गौरव होत असतो, त्या भारतीय संविधानाचे ते शिल्पकारही ठरले.

परिणामत: भारतीय समाजात स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय ही मानवी मूल्ये रुजली.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा शाळा प्रवेश दिन ही अत्यंत महत्त्वाची आणि इतिहासाला कूस बदलवायला लावणारी क्रांतिकारी घटना ठरते. डॉ. आंबेडकर हे आजीवन विद्यार्थी होते. त्यांनी आपला हा व्यासंग आयुष्याच्या शेवटपर्यंत जपला.

आजचा प्रत्येक विद्यार्थी हा या देशाचे भविष्य आहे. त्यामुळे आदर्श विद्यार्थी निर्माण होणे ही काळाची गरज आहे. शिक्षण हेच उन्नतीचे एकमेव साधन आहे आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या कठोर परिश्रमांची जाण सर्व विद्यार्थ्यांना होण्यासाठी ७ नोव्हेंबर हा दिवस विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

विद्यार्थी दिवस उपक्रमांतर्गत सर्व शाळांमध्ये डॉ. आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित विविध पैलूंवर निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, काव्यवाचन आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

 

शासन निर्णयानुसार यंदा पहिल्यांदाच ७ नोव्हेंबरला विद्यार्थी दिवस साजरा करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्वच शाळांमधून विद्यार्थ्यांचा सहभाग या स्पर्धेत घेण्यासाठी शिक्षकांना आवश्यक त्या सूचना केल्या आहेत. शाळा सुरू झाल्यानंतर याविषयी विद्यार्थ्यांना आवश्यक माहिती देण्यात येईल.

- पुनिता गुरव,शिक्षणाधिकारी, सातारा

राजवाडा येथील प्रतापसिंह हायस्कूल

साताऱ्यात नगरपालिकेच्या स्थापनेनंतर १ आॅगस्ट १८५३ नंतर पालिकेचे १८८४ मध्ये सिटी म्युनिसिपालिटीमध्ये रुपांतर झाले. त्यावेळी मुलांच्या मराठी शाळा ८, हिंदुस्थानी मिश्र शाळा १, रात्रीची शाळा १ व मुलींकरीता १अशा ११ शाळा होत्या.

रात्रीची शाळा मजूर आणि कारागीर लोकांच्या मुलांकरीता होती. पालिकेकडे शिक्षण मंडळ येण्यापूर्वी १८६६ मध्ये  साताऱ्यामध्ये ४ प्राथमिक  शाळा होत्या. त्यामध्ये ५३८ विद्यार्थी होते. १८८३ पर्यंत १0 सरकारी शाळा होत्या. त्यामध्ये १ इंग्रजी शाळा, ७ मराठी मुलांच्या शाळा आणि एक मुलींची शाळा अशी स्थिती होती. 

इंग्रजी शाळा प्रतापसिंह महाराजांच्या कारकिर्दीत सुरु झाली. या शाळेचे मुख्याध्यापक बाळशास्त्री भागवत होते. ही शाळा पूर्वी रंगमहालात होती. १८७१ मध्ये शाळेचे हायस्कुलमध्ये रुपांतर झाले. 

१८७४ साली ही शाळा गव्हर्नमेंट हायस्कूल म्हणून सध्याच्या प्रतापसिंह हायस्कुलमध्ये (जुना राजवाडा) या ठिकाणी सुरु झाली. याच वास्तुमध्ये पालिकेच्या शाळा क्र. १ आणि शाळा क्र. १३ या शाळाही पाचवी ते सातवी आणि पहिली ते चौथी असे शिक्षण देत होत्या. त्यानंतर साताऱ्यात वेगवेगळ्या शिक्षण संस्थांच्या नव्या नव्या शाळा उभ्या राहिल्या.

टॅग्स :SchoolशाळाMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार