शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

खटाव येथे आंबेडकर जयंती साध्या पद्धतीने साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 4:39 AM

खटाव : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंती दिनानिमित्त खटाव येथील बुद्ध विहार येथे ...

खटाव : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंती दिनानिमित्त खटाव येथील बुद्ध विहार येथे साध्यापद्धतीने अभिवादन करण्यात आले.

जयंती दिनानिमित्ताने दरवर्षी खटाव व तालुक्यातून लोक येत असतात. मात्र, यंदा कोरोनाचा संसर्ग पसरू नये यासाठी अगदी साध्या पद्धतीने अभिवादन करण्यात आले.

यावेळी डाॅ. अभिमान जाधव म्हणाले, १४ एप्रिल १८९१ हा दिवस खऱ्या अर्थाने वंचित शोषितांचा सोनेरी दिवस आहे. खरे तर बाबासाहेबांनी याच वंचित गोरगरीब शोषितांसाठी असावा असे समजून घटनेमध्ये उल्लेख केला. ‘शिका, संघटीत व्हा, आणि संघर्ष करा’ हीच शिकवण सर्व समाजाला दिली. तलवारीच्या धारेपेक्षा लेखणीची धार अधिक टिकणार असून हे एक धारदार शस्र आहे म्हणून केवळ लेखणीमुळे आपण अन्यायावर मात करू. सर्व बांधवांना सांगणे हेच की निती हाच धर्म आणि मानवता हीच जात आहे. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. जो हे दूध घेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही.

वर्षा जाधव म्हणाल्या, सध्या कोरोनाच्या काळात रुग्णांना विभक्तीकरण आणि शिवाशिव यामुळे त्रास होत आहे. यावरून समजते की त्या काळात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अशा कितीतरी संकटांना सामोरे जावे लागले असेल. सध्याच्या जीवनात प्रत्येकाने जर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पंचशील तत्त्वानुसार दिलेल्या बावीस प्रतिज्ञांचे पालन करून अवगत केल्यास खरोखरच सर्वजण सुखी, समृद्ध होतील.

फोटो ओळ : खटाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली.