शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
4
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
5
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
6
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
7
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
8
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
9
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
10
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
11
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
12
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
13
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
14
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
15
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
16
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
17
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
18
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

खटाव येथे आंबेडकर जयंती साध्या पद्धतीने साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:39 IST

खटाव : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंती दिनानिमित्त खटाव येथील बुद्ध विहार येथे ...

खटाव : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंती दिनानिमित्त खटाव येथील बुद्ध विहार येथे साध्यापद्धतीने अभिवादन करण्यात आले.

जयंती दिनानिमित्ताने दरवर्षी खटाव व तालुक्यातून लोक येत असतात. मात्र, यंदा कोरोनाचा संसर्ग पसरू नये यासाठी अगदी साध्या पद्धतीने अभिवादन करण्यात आले.

यावेळी डाॅ. अभिमान जाधव म्हणाले, १४ एप्रिल १८९१ हा दिवस खऱ्या अर्थाने वंचित शोषितांचा सोनेरी दिवस आहे. खरे तर बाबासाहेबांनी याच वंचित गोरगरीब शोषितांसाठी असावा असे समजून घटनेमध्ये उल्लेख केला. ‘शिका, संघटीत व्हा, आणि संघर्ष करा’ हीच शिकवण सर्व समाजाला दिली. तलवारीच्या धारेपेक्षा लेखणीची धार अधिक टिकणार असून हे एक धारदार शस्र आहे म्हणून केवळ लेखणीमुळे आपण अन्यायावर मात करू. सर्व बांधवांना सांगणे हेच की निती हाच धर्म आणि मानवता हीच जात आहे. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. जो हे दूध घेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही.

वर्षा जाधव म्हणाल्या, सध्या कोरोनाच्या काळात रुग्णांना विभक्तीकरण आणि शिवाशिव यामुळे त्रास होत आहे. यावरून समजते की त्या काळात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अशा कितीतरी संकटांना सामोरे जावे लागले असेल. सध्याच्या जीवनात प्रत्येकाने जर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पंचशील तत्त्वानुसार दिलेल्या बावीस प्रतिज्ञांचे पालन करून अवगत केल्यास खरोखरच सर्वजण सुखी, समृद्ध होतील.

फोटो ओळ : खटाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली.