शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

घरांच्या भिंतींना पारंपरिक पद्धतीने झडपी बांधण्याची लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:42 IST

पेट्री : कास परिसरातील डोंगरमाथ्यावरील गावागावांत पारंपरिक पद्धतीने घरांच्या भिंतींच्या संरक्षणासाठी कोळंबांच्या गवताची झडपी बांधण्यास शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे. ...

पेट्री : कास परिसरातील डोंगरमाथ्यावरील गावागावांत पारंपरिक पद्धतीने घरांच्या भिंतींच्या संरक्षणासाठी कोळंबांच्या गवताची झडपी बांधण्यास शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे. पावसाळ्यात अतिपर्जन्यवृष्टी, दाट धुके, अति थंडीमुळे घरातील उबदार वातावरणासाठी जुन्या, पारंपरिक पद्धतीने कोळंब गवताच्या झडपा बांधून पर्यावरणपूरक उपाययोजना सुरू आहे.

डोंगरमाथ्यावरील अतिपर्जन्यवृष्टीमुळे शेतीकामास बाहेर पडताना पावसाच्या बचावासाठी इरली, टापूस, घोंगड्यांच्या तुडुसाचा वापर करतात. मुसळधार पावसासह वाऱ्याचा जोर जास्त असल्याने छत्री, रेनकोटचा वापर अल्प आहे. गवताच्या झडपी बांधून घराच्या संरक्षणासाठी उपाययोजना करतात. घरांच्या भिंतींचे पावसापासून संरक्षण व्हावे यासाठी जुन्या, पारंपरिक कोळंब गवताच्या झडपी बांधल्या जातात. सद्य:स्थितीत बहुतांश जणांनी झडपा बांधून घरांच्या भिंतींना संरक्षणात्मक उपाययोजना केली असून, काही ठिकाणी झडपा बांधण्याचे काम सुरू आहे.

मुसळधार पावसाचा तडाखा ज्या दिशेने बसतो. अशा बाजूच्या घरांच्या भिंतींना कोळंब गवताची झडपी बांधली जातात. मे अखेरीस अथवा जूनच्या सुरुवातीस कामाला सुरुवात होते. भिंतीपासून काही अंतरावर दोन्ही बाजूला लाकडं उभारून मेसाची फोकाटी आडवी, उभी, आत-बाहेर वेलीने बांधून मध्यभागी कोळंब गवत अशा विशिष्ट पद्धतीने ही झडपी बांधली जातात. पूर्वी छपरासाठी कौले न वापरता गवताची झडपी छप्पर म्हणून वापरायचे. सध्या बऱ्याच ठिकाणी कौलांचे छप्पर असून केवळ घरांच्या भिंतींचे पावसापासून संरक्षण होण्यासाठी गवताची झडपी बांधतात. पावसाळ्यानंतर कुजलेले गवत तरव्याला वापरून खतासाठी वापरतात.

चौकट

ओलीपासून सुटका

पावसाच्या तडाख्यात भिंतीवरील पाणी या झडपीमुळे जमिनीपर्यंत येते. भिंती भिजून घरामध्ये ओल येण्याचा धोका असतो. भिंती भिजून ओल निर्माण होऊ नये तसेच थंडीच्या सुरक्षिततेसाठी कोळंब गवताची झडपी आवश्यकतेनुसार घरांच्या भिंतींना बांधतात. याकामी शेतकरी कोळंब गवत राखून ठेवतात.

कोट

पाऊस सुरू होण्याअगोदर घरांच्या भिंतींचे पावसापासून संरक्षण होण्यासाठी झडपी बांधतात. पाऊस मोठ्या प्रमाणावर झाला तरी भिंतींना लागत नाही. त्यामुळे भिंती कोरड्या, घरातील वातावरण उबदार राहते. सहसा या भागात प्लास्टीक कागद वापरला जात नाही. कारण त्याला खर्चही आहे. वाऱ्याचा वेग जास्त असल्याने कागद फाटू शकतो. त्यामुळे शेतकरी गवताचीच झडपी बांधतात. याला खर्च नसला तरी मेहनत खूप आहे.

- कृष्णा आखाडे,

आखाडेमुरा, ता. जावली

कास पठारावर दरवर्षी मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असतो. त्यापासून घराचे संरक्षण करण्यासाठी डोंगरमाथ्यावर घराच्या भिंतींना झडपी बांधण्यास वेग आला आहे. (छाया : सागर चव्हाण )