शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
2
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
3
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
4
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
5
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
6
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
7
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
8
कुणी २७, कुणी ९५ मतांनी, तर..., बिहारमधील या मतदारसंघांत माफक फरकाने झाला जय-पराजयाचा फैसला
9
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
10
धक्कादायक...! मध्यरात्रीचा थरार...! पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून आईनं पोटच्या २ चिमुकल्यांची केली हत्या, सासरे थोडक्यात बचावले
11
मुदतीपूर्वीच Gen Z कर्मचाऱ्यांना कंपनीतून का काढलं जातंय?; स्टडी रिपोर्टमधून समोर आलं कारण
12
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
13
New Fastag Rule: आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
14
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
15
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
16
Astro Tips: मनासारखा जोडीदार नशिबात आहे की नाही हे कसे ओळखावे? ज्योतिष शास्त्रानुसार... 
17
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
18
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
19
"विवाहित मुलांना वडिलांच्या मालमत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही"; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
20
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

घरांच्या भिंतींना पारंपरिक पद्धतीने झडपी बांधण्याची लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:42 IST

पेट्री : कास परिसरातील डोंगरमाथ्यावरील गावागावांत पारंपरिक पद्धतीने घरांच्या भिंतींच्या संरक्षणासाठी कोळंबांच्या गवताची झडपी बांधण्यास शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे. ...

पेट्री : कास परिसरातील डोंगरमाथ्यावरील गावागावांत पारंपरिक पद्धतीने घरांच्या भिंतींच्या संरक्षणासाठी कोळंबांच्या गवताची झडपी बांधण्यास शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे. पावसाळ्यात अतिपर्जन्यवृष्टी, दाट धुके, अति थंडीमुळे घरातील उबदार वातावरणासाठी जुन्या, पारंपरिक पद्धतीने कोळंब गवताच्या झडपा बांधून पर्यावरणपूरक उपाययोजना सुरू आहे.

डोंगरमाथ्यावरील अतिपर्जन्यवृष्टीमुळे शेतीकामास बाहेर पडताना पावसाच्या बचावासाठी इरली, टापूस, घोंगड्यांच्या तुडुसाचा वापर करतात. मुसळधार पावसासह वाऱ्याचा जोर जास्त असल्याने छत्री, रेनकोटचा वापर अल्प आहे. गवताच्या झडपी बांधून घराच्या संरक्षणासाठी उपाययोजना करतात. घरांच्या भिंतींचे पावसापासून संरक्षण व्हावे यासाठी जुन्या, पारंपरिक कोळंब गवताच्या झडपी बांधल्या जातात. सद्य:स्थितीत बहुतांश जणांनी झडपा बांधून घरांच्या भिंतींना संरक्षणात्मक उपाययोजना केली असून, काही ठिकाणी झडपा बांधण्याचे काम सुरू आहे.

मुसळधार पावसाचा तडाखा ज्या दिशेने बसतो. अशा बाजूच्या घरांच्या भिंतींना कोळंब गवताची झडपी बांधली जातात. मे अखेरीस अथवा जूनच्या सुरुवातीस कामाला सुरुवात होते. भिंतीपासून काही अंतरावर दोन्ही बाजूला लाकडं उभारून मेसाची फोकाटी आडवी, उभी, आत-बाहेर वेलीने बांधून मध्यभागी कोळंब गवत अशा विशिष्ट पद्धतीने ही झडपी बांधली जातात. पूर्वी छपरासाठी कौले न वापरता गवताची झडपी छप्पर म्हणून वापरायचे. सध्या बऱ्याच ठिकाणी कौलांचे छप्पर असून केवळ घरांच्या भिंतींचे पावसापासून संरक्षण होण्यासाठी गवताची झडपी बांधतात. पावसाळ्यानंतर कुजलेले गवत तरव्याला वापरून खतासाठी वापरतात.

चौकट

ओलीपासून सुटका

पावसाच्या तडाख्यात भिंतीवरील पाणी या झडपीमुळे जमिनीपर्यंत येते. भिंती भिजून घरामध्ये ओल येण्याचा धोका असतो. भिंती भिजून ओल निर्माण होऊ नये तसेच थंडीच्या सुरक्षिततेसाठी कोळंब गवताची झडपी आवश्यकतेनुसार घरांच्या भिंतींना बांधतात. याकामी शेतकरी कोळंब गवत राखून ठेवतात.

कोट

पाऊस सुरू होण्याअगोदर घरांच्या भिंतींचे पावसापासून संरक्षण होण्यासाठी झडपी बांधतात. पाऊस मोठ्या प्रमाणावर झाला तरी भिंतींना लागत नाही. त्यामुळे भिंती कोरड्या, घरातील वातावरण उबदार राहते. सहसा या भागात प्लास्टीक कागद वापरला जात नाही. कारण त्याला खर्चही आहे. वाऱ्याचा वेग जास्त असल्याने कागद फाटू शकतो. त्यामुळे शेतकरी गवताचीच झडपी बांधतात. याला खर्च नसला तरी मेहनत खूप आहे.

- कृष्णा आखाडे,

आखाडेमुरा, ता. जावली

कास पठारावर दरवर्षी मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असतो. त्यापासून घराचे संरक्षण करण्यासाठी डोंगरमाथ्यावर घराच्या भिंतींना झडपी बांधण्यास वेग आला आहे. (छाया : सागर चव्हाण )