शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
2
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
3
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
4
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
5
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
6
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
7
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
8
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
9
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
10
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
11
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
12
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
13
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
14
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
15
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
16
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
17
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
18
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
19
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
20
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला

मोबाईल टिचर पदे भरण्यास परवानगी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 13:56 IST

सातारा : जिल्ह्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या प्रश्नाबाबत ‘लोकमत’ ने आवाज उठविल्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी तत्काळ कार्यवाही केली. फिरता शिक्षक (मोबाईल टिचर) भरतीसाठी परवानगी द्यावे, असे स्मरणपत्र त्यांनी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या राज्य प्रकल्प संचालकांना पाठविले आहे. 

ठळक मुद्देसातारा जिल्हा परिषदेचे स्मरणपत्र मुख्य कार्यकारी अधिकाºयांची महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेला मागणी‘लोकमत’ने उठविला आवाज

सातारा : जिल्ह्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या प्रश्नाबाबत ‘लोकमत’ ने आवाज उठविल्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी तत्काळ कार्यवाही केली. फिरता शिक्षक (मोबाईल टिचर) भरतीसाठी परवानगी द्यावे, असे स्मरणपत्र त्यांनी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या राज्य प्रकल्प संचालकांना पाठविले आहे. 

‘लोकमत’ ने मागील आठवड्यात ‘दिव्यांगांच्या शिक्षणाचा जिल्ह्यात खेळखंडोबा’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिध्द केले होते. या वृत्तामध्ये दिव्यांग मुलांच्या शिक्षणावरच गदा आणण्याचा छुपा डाव खेळला गेला असून या मुलांचे भविष्य अंधकारमय बनले आहे. शिक्षणापासून त्यांना वंचित ठेवण्याचे दुष्परिणाम आगामी काळात भयावह समस्या घेऊन पुढे येण्याची दाट शक्यता आहे. 

विशेष शाळा वगळता जिल्ह्यातील तब्बल ७ हजार विशेष विद्यार्थी प्राथमिक शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत. मात्र, त्यांना पुरेसे शिक्षकच उपलब्ध नाहीत. १0 विद्यार्थ्यांमागे १ विशेष शिक्षक नेमायला हवा, असा सर्व शिक्षा अभियानातील निकष आहे. साहजिकच ७ हजार ९१९ विद्यार्थ्यांसाठी किमान ७00 शिक्षकांची भरती होणे अपेक्षित आहेत; परंतु आपल्या सातारा जिल्ह्याला एमपीएसपी (ंमहाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद) यांनी केवळ ६३ शिक्षकांनाच परवानगी दिली आहे. सध्याच्या घडीला केवळ ६0 शिक्षक कार्यरत आहेत. 

२0१२ मध्ये विशेष शिक्षकांची ‘मोबाईल टिचर’ म्हणून नियुक्ती केली होती. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या संख्येत भर पडत गेली असली तरी ‘राईट टू एज्युकेशन’ हे ब्रिद मिरविणाºया महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने मोबाईल टिचर भरतीला परवानगीच दिली नसल्याने विशेष मुलांच्या शिक्षणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

पुरसे शिक्षक नसल्याने या मुलांच्या शिक्षणाचा हक्कच हिरावून घेतला गेल्याचे सध्या समोर येत आहे. याबाबत वृत्त प्रसिध्द झाल्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेला स्मरणपत्र धाडले. 

काय आहे पत्रात उल्लेख?

सातारा जिल्हा अपंग समावेशित शिक्षण अंतर्गत सातारा जिल्ह्यामध्ये एकूण केंद्रांची संख्या २३२ इतकी आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांची संख्या ७ हजार ९१९ आहे. केंद्राची व दिव्यांग विद्यार्थ्यांची संख्या पाहता फिरता शिक्षक फक्त ६0 इतकी आहे. लाभार्थ्यांना शैक्षणिक सहायभूत सेवा, संदर्भ सेवा व गुणवत्तेच्या दृष्टिने फिरता विशेष शिक्षकांची संख्या फारच कमी आहे.

तालुक्यातील केंद्रांच्या संख्येनुसार फिरता विशेष शिक्षक उपलब्ध झाल्यास दिव्यांग विद्यार्थ्यांना त्यांच्या अध्ययन शैलीची गरज लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या नियमीत प्रवाहात समावेशित करण्यासाठी त्याच्या मार्फत येणाºया समस्येवर उपाययोजना करुन विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहाय्यभूत सेवा उपलब्ध करुन देऊन शाळेत टिकवून ठेवण्यास मदत होईल. त्याअनुषंगाने सातारा जिल्ह्यासाठी प्रत्येक तालुक्यातील केंद्र संख्येनुसार फिरता विशेष शिक्षक मिळावा अथवा खास बाब म्हणून विशेष शिक्षक भरती करण्यास प्रशासकीय मान्यता मिळावी, असे डॉ. राजेश देशमुख यांनी या स्मरणपत्रात म्हटले आहे.