शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
4
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
5
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
6
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
7
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
8
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
9
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
10
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
11
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
12
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
13
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
14
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
15
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
16
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
17
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
18
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
19
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
20
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य

आघाडी शासनाला मित्रपक्षाचाच जास्त त्रास

By admin | Updated: March 7, 2016 00:20 IST

पृथ्वीराज चव्हाण : राष्ट्रवादीचे नाव न घेता टीका; विरोध डावलून घेतले निर्णय, किशोर बाचल यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

 कोरेगाव : ‘राज्यात काँग्रेस आघाडी सरकार असताना विरोधी पक्षाने जेवढा त्रास दिला नाही, तेवढा मित्रपक्षाने दिला. मित्र पक्षाचा विरोध डावलून मी मुख्यमंत्री या नात्याने शेतकरी व सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतले, त्यामध्ये राज्य बँकेचा निर्णय व सिंचनाचा महत्त्वाचा निर्णय होता,’ अशी प्रखर टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव न घेता केली. किशोर बाचल यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश व त्यानिमित्त येथील बाजार मैदानावर झालेल्या जिल्हास्तरीय कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम होते. आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील, आमदार आनंदराव पाटील, आमदार जयकुमार गोरे, हिंदुराव नाईक-निंबाळकर, तालुकाध्यक्ष अ‍ॅड. विजयराव कणसे, अ‍ॅड. सुनीता जगताप, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल घाडगे, रणजितसिंह नाईक-निंबाळकर, बाबासाहेब कदम, भीमराव पाटील, जिल्हा परिषद सदस्या अर्चना बर्गे, अविनाश फाळके, मानाजीराव घाडगे, पोपटराव निकम, राजेंद्र शेलार, नंदकुमार निकम, नवनाथ केंजळे, संपतराव माने, रवींद्र माने, अ‍ॅड. जयवंतराव केंजळे, अ‍ॅड. प्रभाकर बर्गे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. कोरेगाव तालुक्यातील काँग्रेसला वैभवशाली परंपरा आहे. आता किशोर बाचल यांच्या प्रवेशामुळे पक्षसंघटना मजबूत झाली आहे. त्यांच्याकडे संघटन कौशल्य व समन्वयाची भूमिका असल्याने नजिकच्या काळात त्यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी सोपविली जाणार असल्याचे नमूद करत माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी आपल्या भाषणात केंद्रातील आणि राज्यातील भाजप युती सरकारांवर टीकेची तोफ डागली. केंद्रीय अर्थसंकल्प म्हणजे केवळ धूळफेक असून, कृषी क्षेत्रासाठी केवळ हजारो कोटींची तरतूद केली जात आहे, त्यामध्ये सुद्धा आकडेमोडीचा खेळ केला आहे. बुलेट ट्रेनसह रेल्वे आणि रस्त्यांच्या कामासाठी लाखो कोटींची तरतूद केली जाते, हा सर्वसामान्यांवर निश्चितपणे अन्याय आहे. जनतेला दिवास्वप्ने दाखवून भाजप सत्तेवर आला आहे, मात्र त्यांचे अच्छे दिन कोठे गेले, हे जनतेला कळून चुकले असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.किशोर बाचल यांनी आपल्या भाषणात मात्र मोठ्या माणसांचे न ऐकल्याने काय होते, हे आज कळून चुकले असल्याचे सांगितले. राजकारणात माणसांकडून चुका होतात, माझ्याकडून झाल्या, त्यामुळे मी जनतेची माफी मागतो. राजकारणात स्थिरस्थावर झाल्यावर कार्यकर्ते संपविण्याची मोहीम सुरू झाली आहे. मीच २५ वर्षे आमदार राहणार, अशी भाषा सुरू झाली आहे. मूळ स्वभाव दिसू लागला असून, बघून घेण्याची भाषा केली जात आहे. आम्हीच आणले आणि आता आम्हीच नाद पूर्ण करू, असा इशारा देत बाचल यांनी ज्याप्रमाणे जनतेने ब्रिटिशांचे अन्यायकारक सायमन कमिशन घालविण्यासाठी ‘सायमन गो बॅक’ ची मोहीम सुरू केली होती, तशीच मोहीम आता मतदारसंघात सुरू केली जाणार आहे असल्याचे सांगताच कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यावेळी डॉ. पतंगराव कदम, सतेज पाटील, आनंदराव पाटील, अ‍ॅड. सुनीता जगताप, अर्चना बर्गे, भीमराव पाटील यांची भाषणे झाली. अ‍ॅड. विजयराव कणसे यांनी प्रास्ताविक केले. नंदकुमार निकम यांनी स्वागत केले. संतोष शेलार यांनी सूत्रसंचालन केले. शेखर चव्हाण यांनी आभार मानले. (प्रतिनिधी) पतंगरावांची दिलखुलास बॅटिंग....डॉ. पतंगराव कदम यांनी भाषणामध्ये दिलखुलास बॅटिंग केली. जयकुमार गोरे यांच्याकडे अंगुली निर्देश करत डॉ. कदम यांनी तो आमदार कसा झाला, याचे उदाहरण दिले. त्यानंतर बाबांचे कौतुक करत त्यांनी मुख्यमंत्रिपदावर असताना घेतलेल्या निर्णयांचे तोंडभरून कौतुक केले. काँग्रेस पक्षात अनेक वर्षे काम करत आहे, मंत्री म्हणून तब्बल आठ मुख्यमंत्र्यांबरोबर काम केले आहे. सर्वच मुख्यमंत्री होताना त्यांना पक्षीय पातळीवर सुचक म्हणून मीच होतो,’ असे सांगताच हशा पिकला. राज्यातील भाजप सरकारवर टीकेची झोड उठवताना त्यांनी ‘येडीला सासर... माहेर ... सारखेच,’ असे सांगताच कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.जिल्ह्याला फलटणकडून ग्रहण लागलेयआ. जयकुमार गोरे यांनी जिल्ह्यातील राष्ट्रवादीचा नामोल्लेख न करता, प्रचंड टीकेची झोड उठवली. रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यावर बोलताना ‘फलटणकडून ग्रहण लागलेय,’ असे सांगितले. त्यांचा बंदोबस्त आता रणजितसिंह नाईक-निंबाळकरच करणार आहेत. ते सर्वजण मला माण-खटावमध्ये अडकून ठेवण्याचा दरवेळी प्रयत्न करतात, आता जयकुमार थांबणार नाही, जिल्ह्यातील प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्यावर होणारा अन्याय रोखण्यासाठी हा जयकुमार बोलवाल तेव्हा येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. दहिवडीत आलेला वाघ आणि मायणीतील कुस्तीचा विषय यावर त्यांनी भाष्य करताच कार्यकर्त्यांनी विजयाच्या घोषणा दिल्या. भाजप सरकारचे दुष्काळी पर्यटन : पृथ्वीराज चव्हाणराज्यात सत्तेवर आलेल्या भाजपचे मंत्री अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तोंडावर विरोधकांकडून होणारी कोंडी लक्षात घेऊन दुष्काळी भागात दौरे काढू लागले आहेत. त्यांची ती पाहणी नसून, दुष्काळी पर्यटन आहे. सरकारमध्ये विचित्र अवस्था आहे. मुख्यमंत्री म्हणतात, ‘अधिकारी माझे ऐकत नाहीत, मंत्र्यांमंत्र्यांमध्ये वाद आहेत आणि मंत्र्यांचा स्वीय सहायक शेतकऱ्याला मारहाण करतोय,’ अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.