शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
4
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
5
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
6
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
7
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
8
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
9
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
10
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
11
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
12
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
13
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
14
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
15
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
16
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
17
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
18
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
19
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
20
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?

रेल्वे रुळालगतची शेती धोक्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:24 IST

ब्रिटिश राजवटीत सुमारे १९२० साली पुणे ते मिरज रेल्वे मार्ग तयार करण्यात आला होता. या मार्गावर शेणोली येथे उंच ...

ब्रिटिश राजवटीत सुमारे १९२० साली पुणे ते मिरज रेल्वे मार्ग तयार करण्यात आला होता. या मार्गावर शेणोली येथे उंच सखल भूभाग असल्याने तेथे मार्गालगतच्या शेतीतील माती उचलून त्याचा मार्गाला भराव करण्यात आला. त्यावेळी नैसर्गिक ओढ्यांचा निचरा होणारी ठिकाणे शाबूत ठेवण्यात आली होती. पुढे १९७० च्या दशकात पुन्हा झालेल्या नूतनीकरणावेळी फारसा बदल न करता काम झाले. त्यामुळे रेल्वे रूळ परिसरातील शेतांमध्ये पाणी साचून राहत नव्हते. मात्र, गत दोन ते तीन वर्षांत सुरू असलेल्या दुहेरीकरण व विद्युतीकरणाच्या कामावेळी पाण्याचा निचरा होणाऱ्या जागा पूर्णपणे भराव टाकून मोजण्यात आल्या आहेत. त्यामुळे रेल्वे रुळालगतची शेणोली हद्दीतील सुमारे तीस एकर शेती बाधित होण्याच्या मार्गावर आहे. या मार्गावरील भराव वाढल्याने पावसाळ्यात शेतीत पाणी साचत आहे. परिणामी पिके कुजत आहेत. या नुकसानीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. पाणी साचून राहत असल्याने पीक घेणे शेतकऱ्यांना अवघड झाले आहे. यामुळे क्षेत्र पडून ठेवावे लागत आहे. रेल्वे खात्याने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

- कोट

बाधित होणाऱ्या क्षेत्रानजीक रेल्वेने गटर बांधून पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे. अधिकाऱ्यांनी याबाबत स्थानिक शेतकऱ्यांशी चर्चा करून समन्वयाने मार्ग काढावा. सद्य:स्थितीत शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

- सुनील कणसे

शेतकरी, शेणोली

फोटो : १८केआरडी०१

कॅप्शन : शेणोली, ता. कऱ्हाड येथे रेल्वे रुळालगत शेतात पाणी साचून राहिल्याने नापिकीचा धोका आहे.