शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

आगाशिवनगरच्या सांडपाण्याचा प्रश्न गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:13 IST

शहरात महत्त्वाकांक्षी सांडपाणी प्रक्रिया योजनेचे काम अंतिम टप्प्यात आहे. सांडपाण्याचा प्रश्न या योजनेमुळे कायमचा निकाली निघणार आहे. मात्र अजूनही ...

शहरात महत्त्वाकांक्षी सांडपाणी प्रक्रिया योजनेचे काम अंतिम टप्प्यात आहे. सांडपाण्याचा प्रश्न या योजनेमुळे कायमचा निकाली निघणार आहे. मात्र अजूनही आगाशिवनगर येथील काही भागात साधी गटरचीही सोय नसल्याने त्या परिसरातील सांडपाण्याचा प्रश्न सध्या ऐरणीवर आहे. तर कऱ्हाड-ढेबेवाडी रस्त्याच्या उत्तरेकडील कॉलन्यांमध्ये शेवटी अनेक ठिकाणी डबकी तयार होऊन शेतकऱ्यांच्या शेतात ते पाणी जात आहे. आगाशिवनगर येथील व्यंकटेश कॉलनी परिसरातील रहिवाशांच्या सांडपाण्याचा प्रश्न सध्या गंभीर बनला आहे. स्वच्छ सर्वेक्षण अभियानात देशात पहिल्या पाचमध्ये येण्याचा संकल्प पालिकेने केला आहे. मात्र, या संकल्पात आडकाठी येईल, अशा गैरसोयी सध्या वाढत आहेत.

सध्या हे सांडपाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावरून वाहत आहे. त्यामुळे परिसरातील शंभरावर कुटुंबांना डासांचा, डुकरांचा त्रास होऊ लागला आहे. या प्रश्नामुळे साथीच्या आजारांची भीतीही व्यक्त केली जात आहे.

- चौकट

रस्त्यासह विजेची सोयही नाही

झोपडपट्टीसारख्या ठिकाणी रस्त्यांची विजेची सोय आहे. मात्र, व्यंकटेश कॉलनीमध्ये विजेची, रस्त्याची सोय नाही. हा प्रश्न निकाली काढण्यासाठी स्थानिक रहिवाशांनी पालिकेकडे पाठपुरावा केला आहे. मात्र ठोस निर्णय न झाल्याने हा प्रश्न रखडला आहे. सांडपाणी वाहण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्यामुळे नागरिकांमधून चिंता व्यक्त होत आहे.

फोटो : ०२केआरडी०५

कॅप्शन : मलकापूर-आगाशिवनगर येथील व्यंकटेश कॉलनीमध्ये सांडपाणी रस्त्यावरूनच वाहत आहे. (छाया : माणीक डोंगरे)