शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

लोणंदनंतर खंडाळ्याला नगरपंचायतीचे वेध

By admin | Updated: November 27, 2015 00:13 IST

तालुक्याचे ठिकाण : औद्योगिकीकरणामुळे शहराचे विस्तारीकरण; मात्र विकासाला अडथळे

खंडाळा : खंडाळा शहराचा आवश्यक विकास साधण्यासाठी निधी उपलब्ध होणे गरजेचे आहे. त्यासाठी खंडाळा नगरपंचायतीचा निर्णय होणे अपेक्षित आहे. लोणंद नगरपंचायत झाल्यापासून खंडाळकरांच्या नजरा खंडाळ्याच्या नगरपंचायतीकडे लागलेल्या आहेत. तर तालुक्यात औद्योगिकीकरण वाढत असताना शहराचे विस्तारीकरण होवू लागले असलेतरी विकासाला अडथळे निर्माण होत आहेत.तालुक्याचे मुख्य ठिकाण म्हणून खंडाळा शहरात नेहमीच गजबज दिसून येते. खंडाळ्याला ऐतिहासिक आणि राजकीय वारसा तर आहेच; पण त्याचबरोबर खंबाटकीचा विलोभनीय सहवास आणि शिवकालीन घटनांचा स्पर्श, यामुळे खंडाळ्याचे वेगळे महत्त्व आहे. तालुक्याचे ठिकाण म्हणून दिवसेंदिवस खंडाळ्याचा विस्तार वाढत आहे. औद्योगिकीकरणामुळे आमूलाग्र घडलेला बदल, कामगारांची वाढलेली संख्या, यामुळे लोकसंख्येत आपोपच वाढ झाली आहे. खंडाळ्याची ग्रामपंचायत संपूर्ण शहराचा प्रशासकीय कारभार यशस्वीपणे सांभाळत आहे. मात्र शहराच्या विकासासाठी आवश्यक विकास साधण्यासाठी निधी उपलब्ध होणे गरजेचे आहे. त्यासाठी खंडाळा नगरपंचायतीचा निर्णय होणे अपेक्षित आहे. लोणंद नगरपंचायत झाल्यापासून खंडाळकरांच्या नजरा खंडाळ्याच्या नगरपंचायतीकडे लागलेल्या आहेत. राज्यातील तालुक्याच्या ठिकाणच्या ग्रामपंचायतींचे रूपांतर नगरपंचायतीत करण्याचा निर्णय आघाडी शासनाने घेतलेला आहे. मात्र, त्यावर अद्याप कार्यवाही झालेली नाही. युती शासन नव्याने सत्तेवर आल्यापासून लोणंद ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर केल्याची घोषणा करण्यात आली. त्यावर प्रशासकीय अंमलही सुरू झाला आहे. मात्र तालुक्याचे ठिकाण म्हणून खंडाळ्याची घोषणा होणे लोकांना अपेक्षित आहे. राज्य पातळीवर याबाबतच्या हालचाली वेगाने सुरू असल्याने खंडाळ्यातील जनतेच्या नजरा नगरपंचायतीच्या निर्णयाकडे लागल्या आहेत. त्यामुळे शहराचा साचेबद्ध विकास करणे शक्य होणार आहे. पुणे शहरापासून काही अंतरावरच असल्याने पुण्याचे नागरिक शिरवळ, खंडाळ्याकडे स्थलांतरीत होऊ लागले आहेत. या लोकांना सर्व सुविधा देण्यासाठी ग्रामपंचायतीचे नगरपंचायत मध्ये रुपांतर होणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी) गावातल्या इच्छुकांची आतापासूनच तयारी..खंडाळ्यात गेल्या पाच वर्षांत लोकांच्या राहण्याच्या संख्येत वाढ झाली आहे. औद्योगिकीकरणाने कामगार विसावलेले आहेत. बांधकाम व्यावसायिकांनी अपार्टमेंट सिस्टीम वाढवलेली आहे. साहजिकच शहराचेच विस्तारीकरण झपाट्याने होत आहे. नगरपंचायत झाल्यास सर्वच भागाचा समतोल विकास करणे सहज, सोपे जाणार आहे. यासाठी राजकीय पदाधिकारीही निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत. ग्रामपंचायतीवर ज्यांना काम करण्याची संधी मिळाली नाही, अशांनी नगरपंचायतीसाठी आत्ताच तयारीला सुरुवात केली आहे.