शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

लोणंदनंतर खंडाळ्याला नगरपंचायतीचे वेध

By admin | Updated: November 27, 2015 00:13 IST

तालुक्याचे ठिकाण : औद्योगिकीकरणामुळे शहराचे विस्तारीकरण; मात्र विकासाला अडथळे

खंडाळा : खंडाळा शहराचा आवश्यक विकास साधण्यासाठी निधी उपलब्ध होणे गरजेचे आहे. त्यासाठी खंडाळा नगरपंचायतीचा निर्णय होणे अपेक्षित आहे. लोणंद नगरपंचायत झाल्यापासून खंडाळकरांच्या नजरा खंडाळ्याच्या नगरपंचायतीकडे लागलेल्या आहेत. तर तालुक्यात औद्योगिकीकरण वाढत असताना शहराचे विस्तारीकरण होवू लागले असलेतरी विकासाला अडथळे निर्माण होत आहेत.तालुक्याचे मुख्य ठिकाण म्हणून खंडाळा शहरात नेहमीच गजबज दिसून येते. खंडाळ्याला ऐतिहासिक आणि राजकीय वारसा तर आहेच; पण त्याचबरोबर खंबाटकीचा विलोभनीय सहवास आणि शिवकालीन घटनांचा स्पर्श, यामुळे खंडाळ्याचे वेगळे महत्त्व आहे. तालुक्याचे ठिकाण म्हणून दिवसेंदिवस खंडाळ्याचा विस्तार वाढत आहे. औद्योगिकीकरणामुळे आमूलाग्र घडलेला बदल, कामगारांची वाढलेली संख्या, यामुळे लोकसंख्येत आपोपच वाढ झाली आहे. खंडाळ्याची ग्रामपंचायत संपूर्ण शहराचा प्रशासकीय कारभार यशस्वीपणे सांभाळत आहे. मात्र शहराच्या विकासासाठी आवश्यक विकास साधण्यासाठी निधी उपलब्ध होणे गरजेचे आहे. त्यासाठी खंडाळा नगरपंचायतीचा निर्णय होणे अपेक्षित आहे. लोणंद नगरपंचायत झाल्यापासून खंडाळकरांच्या नजरा खंडाळ्याच्या नगरपंचायतीकडे लागलेल्या आहेत. राज्यातील तालुक्याच्या ठिकाणच्या ग्रामपंचायतींचे रूपांतर नगरपंचायतीत करण्याचा निर्णय आघाडी शासनाने घेतलेला आहे. मात्र, त्यावर अद्याप कार्यवाही झालेली नाही. युती शासन नव्याने सत्तेवर आल्यापासून लोणंद ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर केल्याची घोषणा करण्यात आली. त्यावर प्रशासकीय अंमलही सुरू झाला आहे. मात्र तालुक्याचे ठिकाण म्हणून खंडाळ्याची घोषणा होणे लोकांना अपेक्षित आहे. राज्य पातळीवर याबाबतच्या हालचाली वेगाने सुरू असल्याने खंडाळ्यातील जनतेच्या नजरा नगरपंचायतीच्या निर्णयाकडे लागल्या आहेत. त्यामुळे शहराचा साचेबद्ध विकास करणे शक्य होणार आहे. पुणे शहरापासून काही अंतरावरच असल्याने पुण्याचे नागरिक शिरवळ, खंडाळ्याकडे स्थलांतरीत होऊ लागले आहेत. या लोकांना सर्व सुविधा देण्यासाठी ग्रामपंचायतीचे नगरपंचायत मध्ये रुपांतर होणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी) गावातल्या इच्छुकांची आतापासूनच तयारी..खंडाळ्यात गेल्या पाच वर्षांत लोकांच्या राहण्याच्या संख्येत वाढ झाली आहे. औद्योगिकीकरणाने कामगार विसावलेले आहेत. बांधकाम व्यावसायिकांनी अपार्टमेंट सिस्टीम वाढवलेली आहे. साहजिकच शहराचेच विस्तारीकरण झपाट्याने होत आहे. नगरपंचायत झाल्यास सर्वच भागाचा समतोल विकास करणे सहज, सोपे जाणार आहे. यासाठी राजकीय पदाधिकारीही निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत. ग्रामपंचायतीवर ज्यांना काम करण्याची संधी मिळाली नाही, अशांनी नगरपंचायतीसाठी आत्ताच तयारीला सुरुवात केली आहे.