शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

आदिवासींना समजावून घेतल्याने बदल प्रकाश आमटे : फलटण येथे मालोजीराजे ‘स्मृती पुरस्कार’ प्रदान

By admin | Updated: May 15, 2014 23:30 IST

फलटण : नक्षलवाद्यांचा जिल्हा म्हणून गडचिरोलीची वेगळी प्रतिमा निर्माण झाली असली तरी गेली सुमारे ६५ वर्षे या जिल्ह्यातील जंगलात वास्तव्य करुन

फलटण : नक्षलवाद्यांचा जिल्हा म्हणून गडचिरोलीची वेगळी प्रतिमा निर्माण झाली असली तरी गेली सुमारे ६५ वर्षे या जिल्ह्यातील जंगलात वास्तव्य करुन अदिवासींना समजावून घेवून केलेली मदत व मार्गदर्शनामुळे या जिल्ह्यात सकारात्मक वातावरण निर्माण होत आहे. देशाच्या विविध भागातून येणारे डॉक्टर्स तेथे सेवावृत्तीने काम करीत आहेत, असे प्रतिपादन पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे यांनी केले. येथील श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँकेच्या वतीने श्रीमंत मालोजीराजे स्मृती महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदाकिनी आमटे यांना ‘श्रीमंत मालोजीराजे स्मृती’ पुरस्काराने राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष रामराजे नाईक निंंबाळकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. २१ हजार रुपये रोख, सन्मान चिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ, पुष्पहार असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. पुरस्कार वितरणानंतर उपस्थित फलटणकरांनी व्यक्तीगतरित्या आणि संस्था, संघटनांच्यावतीने डॉ. आमटे दाम्पत्याच्या समाजसेवी कामासाठी उत्स्फूर्तपणे देणग्यांचे धनादेश त्यांच्याकडे स्वत:हून सुपूर्द केले. फलटणकरांच्यावतीने या कामासाठी लक्षावधी रुपये उपलब्ध करुन दिल्याने आमटे दाम्पत्य भारावून गेले. विदर्भात जमिनदार आणि शिकारी असलेले बाबा आमटे यांनी आनंदवन संस्थेच्या माध्यमातून कुष्टरोग्यांसाठी काम केले. त्यानंतर १९४६ मध्ये स्वत:ची सारी संपत्ती, बंगला, गाडी सोडून बाबा हे वरोरा जंगलात कुटुंबासह वास्तव्यास आले. त्यामुळे आम्हा दोघा भावांच्या शिक्षणाविषयी अस्थिरता वाटत होती. तथापी आम्ही उच्चशिक्षण घेतले, आपण एमबीबीएस पदवी घेतली. मात्र गरजा कमी करुन जंगलातील वास्तव्यात असलेल्या आनंदाने आपल्याला इतरत्र जाण्यास एकप्रकारे मज्जाव केला. तेव्हापासून गेली सुमारे ३६ वर्षे आम्ही दोघे आदिवासींना वैद्यकीय सेवा देण्याबरोबर त्यांच्यात राहण्यात आनंद मानत राहिलो. परिणामी आमच्याविषयी आदिवासींमध्ये विश्वास व आपुलकीचे नाते निर्माण झाले. तसेच नाते आम्ही इथल्या पशूपक्षांशी निर्माण केल्याने येथून अन्यत्र जाण्याचा विचारही मनात येत नाही. तीच भावना आमच्या मुलांची झाली असून त्यांनीही या कामात स्वत:ला झोकून दिल्याचे डॉ. प्रकाश आमटे यांनी स्पष्ट केले. जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष संजीवराजे नाईक-निंंबाळकर यांनी स्वागत व प्रास्तविक केले. प्रा. दीक्षित व प्रा. निलम देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. बँकेचे व्यवस्थापक नगरकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)